शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

हातातोंडाशी आलेला घास हिसकावला: वादळाच्या तडाख्याने केळीची बाग उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 11:49 IST

  गांधेलीतील घटना : काढणीसाठी आली होती केळी, क्षणात झाले होत्याचे नव्हते; शेतकरी आर्थिक संकटात  औरंगाबाद : पावसाने दगा ...

 

गांधेलीतील घटना : काढणीसाठी आली होती केळी, क्षणात झाले होत्याचे नव्हते; शेतकरी आर्थिक संकटात औरंगाबाद : पावसाने दगा दिल्याने दुष्काळाचे संकट, पाण्याची परिस्थितीही गंभीर, पैशांची अडचण तर पाचवीला पुजलेली. तरीही या सगळ्यांवर मात करून शेतात केळी पिकाची लागवड केली. लेकराप्रमाणे बाग जोपासली. काही दिवसांत काढणीला आलेली केळी भरघोस उत्पन्न देणार होती. परंतु वादळी वाºयाने केळीची बाग आडवी केली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. या अस्मानी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.गांधेली येथील शेतकरी सय्यद अख्तर सय्यद शब्बीर यांच्यावर हे संकट कोसळले आहे. गांधेलीत २ एकरपैकी काही क्षेत्रात त्यांनी केळीची जवळपास २ हजार झाडे  लावली होती. अल्प पावसामुळे पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ ओढावली. अशा परिस्थितीत ठिंबक सिंचनाचा वापर करून केळीची बाग जोपासली. रात्रीचा दिवस करून बाग वाढविली. बाग चांगली फुलली होती. गेल्या काही दिवसांत केळी काढण्यालायक झालेली होती. त्यामुळे आगामी काही दिवसांत झाडांवरून केळी काढण्याची तयारी सुरू होती. त्यातून येणाºया रकमेतून विविध कामे करण्याचे स्वप्नही रंगले होते. मात्र, निसर्गाला हे मान्य नव्हते. रणरणत्या उन्हात २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा सुटला. या वाºयाने त्यांची केळीची बाग अवघ्या काही क्षणात आडवी झाली. झाडांवरील केळीचे घड जमिनीवर कोसळले. त्यामुळे डाग लागल्याने ही केळी कोणी घेण्यास तयार नाही. या आपत्तीची पाहणी, पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी तहसील कार्यालयाकडे केली आहे. 

१.२० लाखांच्या उसनवारीतून बागसय्यद अख्तर यांनी केळीच्या बागेसाठी नातेवाईकांकडून १.२० लाख रुपये उसने घेतले होते. स्वत: जवळचे ८० हजार, असे २ लाख रुपये बागेसाठी खर्च केले. अवघ्या काही दिवसांत किमान ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार होते. परंतु वादळी वाºयामुळे हे उत्पन्न हातातून गेले. आता नातेवाईकांचे उसने पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाचा तडाखाउन्हामुळे केळी बागेला तडाखा बसत होता. पाणीपातळी खोल गेल्याने आधीच मेटाकुटीला आलो होतो. उष्णतेचे संकट केळीला मारक ठरत होते. त्यात कशीबशी तग धरून बाग वाढविली. मात्र पैसा, मेहनत वाया गेल्याचे सय्यद अख्तर सय्यद शब्बीर म्हणाले.

 

टॅग्स :Natureनिसर्गMedicalवैद्यकीय