शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘त्या’ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करा

By admin | Updated: June 16, 2014 00:13 IST

परभणी : ज्या शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत, अशा गरजू शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी दिल्या़

परभणी : ज्या शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत, अशा गरजू शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी दिल्या़ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते़ सिंह म्हणाले, जिल्ह्यामध्ये शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली होती़ ती तत्काळ पूर्ण करावित़ शेततळे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या़ राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध घटकांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना झाला पाहिजे़ यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा़ पेरू पिकाव्यतिरिक्त पपई, केळी, आंबा आदी पिकांवर प्रक्रिया करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे़ पेरूची घन लागवड पद्धतीने १५ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे़ झरी येथे फळउद्योग सुरू असून, त्या ठिकाणी आंबा व पेरू या फळ पिकांवर प्रक्रिया केली जाते़ हळद पिकाचे युनिट स्थापन करणे, हळदीचे पावडर व पानांपासून तेल काढण्याचा उद्योग सुरू करणे, हरितगृह, शेडनेट हाऊसमधील फुल शेतीचे उत्पादन या विषयावर प्रशिक्षणासाठी परभणी, गंगाखेड व पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे पाठविण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)जांब, पोखर्णीत पॅक हाऊसगंगाखेड तालुक्यातील मरडसगाव येथे ८ आणि परभणी तालुक्यातील जांब व पोखर्णी येथे प्रत्येकी ५ पॅक हाऊस झाले आहेत़ या पॅक हाऊसचा वापर संत्रा, मोसंबी तसेच भाजीपाला पिकासाठी केला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली़ महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान २०१४-१५ अंतर्गत जल संधारण विभाग, लघूसिंचन विभाग व जिल्हा परिषदेच्या विविध योजनेतून बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती, पाझर तलाव, गाव तलाव, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची दुरुस्ती, बळकटीकरण आदी कामे करावेत़ शेतकऱ्यांना अपघात विमाशेती व्यवसाय करताना व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यांवरील अपघात, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही अपघातामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मृत्यू ओढावतो़ काहींना अपंगत्व येते, घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते़ अशा आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजना लागू केली आहे़, अशी माहिती बैठकीत देण्यात आली़