शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

‘त्या’ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करा

By admin | Updated: June 16, 2014 00:13 IST

परभणी : ज्या शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत, अशा गरजू शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी दिल्या़

परभणी : ज्या शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत, अशा गरजू शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी दिल्या़ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते़ सिंह म्हणाले, जिल्ह्यामध्ये शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली होती़ ती तत्काळ पूर्ण करावित़ शेततळे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या़ राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध घटकांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना झाला पाहिजे़ यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा़ पेरू पिकाव्यतिरिक्त पपई, केळी, आंबा आदी पिकांवर प्रक्रिया करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे़ पेरूची घन लागवड पद्धतीने १५ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे़ झरी येथे फळउद्योग सुरू असून, त्या ठिकाणी आंबा व पेरू या फळ पिकांवर प्रक्रिया केली जाते़ हळद पिकाचे युनिट स्थापन करणे, हळदीचे पावडर व पानांपासून तेल काढण्याचा उद्योग सुरू करणे, हरितगृह, शेडनेट हाऊसमधील फुल शेतीचे उत्पादन या विषयावर प्रशिक्षणासाठी परभणी, गंगाखेड व पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे पाठविण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)जांब, पोखर्णीत पॅक हाऊसगंगाखेड तालुक्यातील मरडसगाव येथे ८ आणि परभणी तालुक्यातील जांब व पोखर्णी येथे प्रत्येकी ५ पॅक हाऊस झाले आहेत़ या पॅक हाऊसचा वापर संत्रा, मोसंबी तसेच भाजीपाला पिकासाठी केला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली़ महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान २०१४-१५ अंतर्गत जल संधारण विभाग, लघूसिंचन विभाग व जिल्हा परिषदेच्या विविध योजनेतून बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती, पाझर तलाव, गाव तलाव, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची दुरुस्ती, बळकटीकरण आदी कामे करावेत़ शेतकऱ्यांना अपघात विमाशेती व्यवसाय करताना व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यांवरील अपघात, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही अपघातामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मृत्यू ओढावतो़ काहींना अपंगत्व येते, घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते़ अशा आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजना लागू केली आहे़, अशी माहिती बैठकीत देण्यात आली़