शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अनुदानासाठी ‘कलेक्टर’कडे धाव

By admin | Updated: May 30, 2014 00:35 IST

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील काही शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादी आली नाहीत.

 हिंगोली : सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील काही शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादी आली नाहीत. दरम्यान तहसील कार्यालयाच्या सांगण्यावरून ब्राह्मणवाडा येथील सरसकट सर्वच शेतकर्‍यांचे अनुदान वाटप गोरेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेने बंद केले आहे. त्यामुळे थांबविण्यात आलेले अनुदान वाटप तात्काळ सुरू करण्याची मागणी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. अनुदानाच्या यादीत नावे आली नसल्याने ब्राह्मणवाडा येथील काही शेतकर्‍यांनी सेनगाव येथील तहसील कार्यालयाकडे धाव घेतली होती. त्यावेळी तहसीलच्या सांगण्यावरून गोरेगाव येथील शाखेने शेतकर्‍यांचे अनुदान वाटप बंद केले. येत्या खरीप हंगामासाठी खत, बियाणे खरेदीसाठी उपयोगी पडणार्‍या अनुदानाची रक्कम थांबल्यामुळे गुरूवारी काही शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेवून मागणीचे निवेदन दिले. त्यात चुकून राहिलेल्या शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. परंतु काही शेतकर्‍यांसाठी उर्वरित २४८ लाभार्थ्यांचे अनुदान वाटप रोखून धरण्यात येवू नये. त्यामुळे गोरेगाव शाखेला अनुदान वाटप सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी या निवेदनात केली आहे. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या या निवेदनावर ज्ञानबा वायचाळ, भगवान वायचाळ, शिवाजी वायचाळ, शिवाजी मेटकर, संजय पंडीत, दिलीप वायचाळ, जनार्धन वैद्य, उद्धव वायचाळ, जेमन कव्हर, संतोष आडे आदींची नावे आहेत. (प्रतिनिधी)