शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दहावी, बारावीत ५० टक्के गुणांची अट; मुक्त विद्यापीठाच्या पदवीधारकांना ‘स्वाधार’ मिळेना

By विजय सरवदे | Updated: January 31, 2024 13:11 IST

नियमानुसार ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी दहावी, बारावी आणि पदवी शिक्षणात ५० गुण किंवा त्याहून अधिक गुण मिळणे आवश्यक आहे.

छत्रपती संभाजीनगर : दहावी, बारावी आणि पदवी शिक्षणात ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती देण्याचा नियम आहे. मुक्त विद्यापीठाचे काही पदवीधारक या नियमात बसत नसल्यामुळे समाजकल्याण विभागाने त्यांना अपात्र केले आहे. दरम्यान, अशा विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मिळते, मग ‘स्वाधार’चा लाभ का नाही, असा जाब परिवर्तनवादी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला आहे.

परिवर्तनवादी चळवळीचे अध्यक्ष राहुल मकासरे यांचे म्हणणे आहे की, मुक्त विद्यापीठाची पदवी घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. यापैकी अनेकांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालयाकडे ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. मात्र, वर्ष होत आले तरीही या विद्यार्थ्यांचा ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी विचार झालेला नाही, याचा जाब समाजकल्याण अधिकाऱ्यांंना विचारण्यात आला. जर ८ फेब्रुवारीपर्यंत या शिष्यवृत्तीचा विचार झाला नाही, तर समाजकल्याण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मकासरे यांनी दिला आहे.

दरम्यान, समाजकल्याण विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, नियमानुसार ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी दहावी, बारावी आणि पदवी शिक्षणात ५० गुण किंवा त्याहून अधिक गुण मिळणे आवश्यक आहे. मात्र, दहावी किंवा बारावीचे शिक्षण न घेताच काहींनी केवळ प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे आम्ही विभागीय शिक्षण मंडळाकडे दहावी- बारावीची परीक्षा आणि मुक्त विद्यापीठाची प्रवेश परीक्षा या सारख्याच आहे का, याचे मार्गदर्शन मागविणार आहोत. त्यानंतर समाजकल्याण आयुक्तालयाकडेदेखील यासंबंधीचे मार्गदर्शन घेत आहोत. तोपर्यंत या विद्यार्थ्यांना अपात्र यादीत टाकण्यात आले आहे.

चालू शैक्षणिक वर्षाचे ८ हजार अर्जचालू शैक्षणिक वर्षासाठी (२०२३-२४) विद्यार्थ्यांकडून ‘स्वाधार’साठी अर्ज मागविण्यात आले असून आतापर्यंत ८ हजारांहून अधिक अर्जांचे वितरण झाले असून अनेक अर्ज प्राप्तही झाले आहेत. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज वितरण व जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय, सन २०२२-२३ वर्षातील २३८० विद्यार्थ्यांची १० कोटी ८७ लाख रुपयांची ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीची बिले कोषागार कार्यालयात दाखल करण्यात आली आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षण