शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर पदस्थापनेची प्रक्रिया नव्याने होणार

By admin | Updated: July 23, 2014 00:20 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची पदस्थापना देण्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया आता संपूर्णपणे नव्याने करण्याचा निर्णय

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची पदस्थापना देण्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया आता संपूर्णपणे नव्याने करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील १८७ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची पदस्थापना देण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. यासंदर्भात तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार पदवीसह बीएडची पदवी मिळविलेल्या शिक्षकांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी आठ दिवसांपूर्वीच बीएडचा निकाल लागलेल्या मुक्त विद्यापीठाच्या शिक्षकांनाही या प्रक्रियेत संधी हवी होती. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारीच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे अधिकार वापरून तालुकास्तरावरच शिक्षकांना पदस्थापना देत असल्याचे व यामुळे घोडाबाजार वाढल्याचे वृत्त २२ जुलै रोजी ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केले. याच विषयावर मंगळवारी सकाळी शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व्हीडिओ कॉन्फरंस घेतली. त्यामध्ये यासंदर्भात वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या. संपूर्ण राज्यस्तरावर ही प्रक्रिया एकाच पद्धतीने व्हावी, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात यापूर्वी सुरू करण्यात आलेली पदवीधर पदस्थापनेची प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे यांनी घेतला आहे. आता ही संपूर्ण प्रक्रियाच आता नव्याने पार पाडली जाणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावरून सूचना येणार आहेत. त्यानंतरच प्राथमिक पदवीधर शिक्षकांना पदस्थापना देण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आता वेळ लागण्याची शक्यता आहे.
आता पदवीधारकांनाही संधी
यापूर्वीच्या प्रक्रियेत पदवीनंतर बीएड उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना पदवीधरची पदस्थापना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र या निर्णयामध्ये लवचिकता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फक्त पदवी मिळविलेल्या शिक्षकांनाही आता पदवीधरची पदस्थापना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा शिक्षकांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी या शिक्षकांमधून पदवीधरची पदस्थापना देण्याकरीता गुणवत्तापूर्व शिक्षकांची परीक्षेद्वारे निवड करण्याची संधी जिल्हा परिषदेकडे आहे. त्यामुळे आता परीक्षेद्वारेच पदोन्नतीसाठी शिक्षकांची निवड करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
कळमनुरीत १५ जणांचे आक्षेप
कळमनुरी तालुक्यातील ४९ पदवीधर शिक्षकांना पदस्थापना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी मंगळवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत १५ जणांनी आक्षेप नोंदविले आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी. सोनुने यांनी सांगितले.