शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

टँकर लॉबीकडून ‘जीपीएस’प्रणालीचे धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 15:46 IST

जि.प. स्थायी समिती सभेत सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर

ठळक मुद्दे ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी जवळपास हजार टँकर गुंतलेले आहेतटँकर लॉबी खोट्या फेऱ्या दाखवून लाखो रुपयांचा निधी हडप करीत आहे.

औरंगाबाद : जिल्हा सध्या दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. संपूर्ण जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई आहे. यावर उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी जवळपास हजार टँकर गुंतलेले आहेत; पण टँकर लॉबी खोट्या फेऱ्या दाखवून लाखो रुपयांचा निधी हडप करीत आहे. टँकरला ‘जीपीएस’प्रणाली सक्तीची करण्यात आली; परंतु प्रशासनाचे पाठबळ असल्यामुळे टँकर लॉबीने ‘जीपीएस’प्रणालीचे धिंडवडे काढले आहेत, असे आरोप करीत मंगळवारी जि.प. स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर रजेवर असल्यामुळे मंगळवारी उपाध्यक्ष केशव तायडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी रमेश बोरनारे, किशोर बलांडे, मधुकर वालतुरे, अविनाश गलांडे, जितेंद्र जैस्वाल या सदस्यांनी अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरींच्या बिलासाठी शेतकऱ्यांना गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहेत, हा मुद्दा उपस्थित करून टँकर घोटाळ्याच्या चर्चेला तोंड फोडले. एकेका टँकरला पाणीपुरवठ्यासाठी तीन-तीन फेऱ्यांचे आदेश आहेत. मात्र, अनेक टँकर फक्त एकाच फेरीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करतात आणि तीन-तीन फेऱ्यांचे बिल उचलतात. टँकरला ‘जीपीएस’प्रणाली जोडण्याची सक्ती आहे. याची पडताळणी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे कोणतीच सक्षम यंत्रणा नाही. टँकरला ‘जीपीएस’ जोडलेले आहे का, हेही कोणी पाहत नाही. रमेश बोरनारे म्हणाले की, टँकर एका ठिकाणी उभे करून ‘जीपीएस’ यंत्रणा मोटारसायकलच्या डिक्कीत टाकून ती फिरवता येते. असे करूनही टँकर लॉबी शासनाची दिशाभूल करीत नसावी कशावरून.

अविनाश गलांडे म्हणाले की, टँकरचे बिल अदा करण्यासाठी अधिकारी उत्साही असतात; परंतु शेतकऱ्यांच्या विहीर अधिग्रहणाच्या बिलाबाबत प्रशासनाची भूमिका उदासीन असते. तेव्हा प्रशासनाच्या वतीने फुलंब्रीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, विहीर अधिग्रहणाचे आदेश तहसील कार्यालयाच्या पातळीवर प्रलंबित होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या बिलांना विलंब झाला. यावर सदस्य गलांडे व बोरणारे म्हणाले, टँकर आणि विहीर अधिग्रहणाचे आदेश एकाचवेळी काढले जावेत. सदस्यांचे हे आरोप ऐकल्यानंतर सभेचे अध्यक्ष केशव तायडे म्हणाले की, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल.

सरपंच, ग्रामसेवकांविरुद्ध कारवाई कराफुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथे विविध योजनांच्या माध्यमातून २२ घरकुले उभारण्यात आली. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक व रोजगारसेवकांनी जवळचे मित्र, नातेवाईकांची नावे दर्शवून खोट्या जॉबकार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांचा अपहार केल्याचे चौकशी समितीमध्ये सिद्ध झाले आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून अपहारित रक्कम वसूल करण्यात यावी, असा निर्णय सभाध्यक्ष केशव तायडे यांनी दिला. जि.प. सदस्य रमेश गायकवाड, अविनाश गलांडे व किशोर बलांडे यांनी या मुद्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदWaterपाणी