शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

समांतर जलवाहिनीबाबत शासन सकारात्मक; मनपाने मानसिकता बदलावी : मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 16:47 IST

समांतर पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.

औरंगाबाद : समांतर पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी समांतर जलवाहिनीची संपूर्ण माहिती घेत या कामाची सुरुवात झाली पाहिजे अन्यथा पुढील दहा वर्षात शहराला पाणी मिळणार नाही असे म्हटले.  

आजच्या व्हिसीसाठी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार इम्तियाज जलील, संजय सिरसाट, अतुल सावे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समांतर जलवाहिनी संदर्भात सर्व बाबी जाणून घेतल्या. एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, जलवाहिनीच्या कामाबद्दल मनपाने सकारात्मक असावे, अन्यथा पुढच्या दहा वर्षात शहराला पाणी मिळणार नाही.

यासोबतच मुख्यमंत्री म्हणाले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आता दुसऱ्या कोणत्या कंपनीकडून याचे काम करून घेणे उचित नाही. मनपाने या योजनेला गांभीर्याने घ्यावे, राज्य सरकार याबाबत सकारात्मक असून मनपाने आपली मानसिकता बदलावी. 

दरम्यान, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा ठराव मनपाने घेतल्यानंतर त्या कराराला नवसंजीवनी देण्याचा विचार पालिका सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. करार रद्द केल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी कंपनीने समांतर योजनेच्या कराराला नवसंजीवनी देण्याचा प्रस्ताव मनपाकडे सादर केला आहे. राज्य सरकारने समांतर योजनेची मूळ माहिती घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

अनुदान बँकेत पडून समांतरच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव मांडला आहे. परंतु गेल्या पाच सभेमध्ये या प्रस्तावावर चर्चा न होताच सभा तहकूब झाली. प्रशासनाच्या प्रस्तावामध्ये दरवाढ झाल्यामुळे कंपनीला द्यावे लागणारे फरकाचे ११५ कोटी रुपये, जीएसटीचे १७४ कोटी, असे २८९ कोटी रुपये राज्य सरकारकडून अनुदान स्वरुपात मिळावे,अशी मागणी आहे. मूळ समांतर योजना ७९२ कोटींची असून, केंद्र ,राज्याने दिलेले अनुदान बँकेत पडून आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादChief Ministerमुख्यमंत्री