शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

भिकेचे नव्हे तर सरकारला हक्काचे पाणी द्यावेच लागेल; पाणी प्रश्नांवर मराठवाड्यातील आमदार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 16:51 IST

सरकारला जायकवाडीला हक्काचे पाणी द्यावेच लागेल अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील आमदार औरंगाबादेत एकत्र आले. 

औरंगाबाद : पाणी प्रश्नावर मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही, सरकारला जायकवाडीला हक्काचे पाणी द्यावेच लागेल अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील आमदार औरंगाबादेत एकत्र आले. 

हक्काच्या पाण्यासंदर्भात शहरात मराठवाड्यातील आमदारांच्या एका बैठकीचे आज आयोजन करण्यात आले. यास १४ आमदारांची उपस्थिती होती. यावेळी आमदारांनी आक्रमक भूमिका घेत जायकवाडीत भिकेचे पाणी नको तर हक्काचे पाणी हवे आणि ते सरकारला द्यावेच लागेल अशी भूमिका घेतली.तसेच समन्यायी पाणी वाटपची तातडीने अंमलबजावणी करावी आणि मराठवाड्यातील अर्धवट सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी आमदारांनी केली. 

मराठवाडा राजकीय नेतृत्वाबाबत कमनशिबी मराठवाड्याच्या हक्काच्या लढाईचे रणशिंग फुंकण्यासाठी फक्त १४ आमदारांनी हजेरी लावली. राजकीय नेतृत्वाबात मराठवाडा नेहमीच कमनशिबी ठरलाय. पाण्याची लढाई मोठ रुप घेणार असे चित्र निर्माण होणार आहे.

जायकवाडीत अवघा ३३% जलसाठायंदा पावसाने दगा दिल्यामुळे जायकवाडी धरणात अवघा ३३.७२ टक्के साठा राहिला आहे. गतवर्षी जायकवाडी शंभर टक्के भरले होते. परंतु गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ६६.२८ टक्क्यांनी कमी साठा आहे. परिणामी आगामी काळात भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे आहेत.मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून १७२ दलघमी म्हणजे ७ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय आठवडा उलटूनही घेण्यात आलेला नाही. या जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरील धरणांतील पाणी जायकवाडीत सोडण्यास विलंब होत आहे. त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदार एकत्र आले आहेत. 

मुंबईत अधिकाऱ्यांची बैठकजायकवाडीत वरील धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात मुंबईत आज बैठक होत आहे. या बैठकीस महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांच्यासह नगर, नाशिकचे अभियंते उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीState Governmentराज्य सरकारNashikनाशिकAhmednagarअहमदनगर