शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सरकारने नोकरी द्यावी, नाहीतर चालते व्हावे : कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 17:09 IST

सरकारने या बेरोजगारांना नोकरी द्यावी, नाहीतर चालते झाले पाहिजे, असा इशारा आ. कपिल पाटील यांनी येथे दिला.

औरंगाबाद : राज्यातील सरकार खाजगीकरण, कंत्राटीकरण आणि आऊटसोर्सिंगच्या बाजूने आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा तात्काळ भरल्या पाहिजे. त्यासाठी पात्रताधारक बेरोजगारांची मोट बांधून राज्यभर आंदोलन उभे करावे लागेल. सरकारने या बेरोजगारांना नोकरी द्यावी, नाहीतर चालते झाले पाहिजे, असा इशारा आ. कपिल पाटील यांनी येथे दिला.

डी.टी.एड., बी. एड. स्टुडंट असोसिएशनची शिक्षक भरतीसंदर्भात रविवारी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आ. पाटील बोलत होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष प्राजक्ता गोडसे, परमेश्वर इंगोले, सरचिटणीस प्रा. राम जाधव, प्रशांत शिंदे, प्रा. विजय भणगे, प्रा. नामदेव शिंदे, जमीर शेख आदींची उपस्थिती होती. 

यावेळी आ. पाटील म्हणाले, शिक्षक भरतीसाठी पात्रताधारकांची रेंगाळेली भरती प्रक्रिया हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. जो जास्त पैसे देतो, त्याला नोकरी आणि ज्याला काही येत नाही, तो नोकरीत येतो, अशी वाईट अवस्था आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी असे तीनही विषय एकाच शिक्षकाला शिकविण्याची वेळ येत आहे. रिक्त असलेल्या जागा तात्काळ भरल्या पाहिजे. त्यासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागेल, असे आ. पाटील म्हणाले. संतोष मगर म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून पात्र असूनही नोकरीसाठी लढत आहे. नेमकी भरती केव्हा होणार, हे अजूनही स्पष्ट होत नाही.

नोकरभरतीचा हा गोंधळ गिनीज बुकमध्ये नोंदविला पाहिजे. शिक्षक भरतीसंदर्भात विधिमंडळात आवाज बुलंद झाला पाहिजे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक करताना प्रा. प्रशांत शिंदे म्हणाले, शिक्षक भरतीसंदर्भात शिक्षणसंस्था न्यायालयात गेल्या आहेत. संस्थांसंदर्भात न्यायालय निर्णय घेईल. तोपर्यंत जि.प.सह स्थानिक संस्थांतील भरती झाली पाहिजे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असे ते म्हणाले.

३० टक्के कपातच्शिक्षण विभागात मागच्या दाराने ३० टक्के नोकरी कपात लावली जात आहे. शिक्षक भरतीबरोबर या कपातीला, खाजगीकरण, आऊटसोर्सिंग, कंत्राटीकरणालाही विरोध केला पाहिजे. तरुणांनी खाजगी क्षेत्रातील नोकऱ्याही मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही आ. कपिल पाटील म्हणाले.

२०१९ मध्ये सरकारला घालवावे लागेलच्फोडा आणि झोडा ही संस्कृती प्रमाण मानणारे आज सत्तेवर आहेत. परंतु बेरोजगारांनी आपापसात भांडता कामा नये. आधीचे सरकार किमान ऐकून घेत असे, असे म्हणत राज्य सरकार आणि शिक्षणमंत्र्यांवर आ. पाटील यांनी टीका केली. २०१९ मध्ये या सरकारला घालवावे लागेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रState Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारीStudentविद्यार्थी