शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयांत मराठीचा वापर कमीच; भाषा संचालनालयाच्या तपासणी दौर्‍यातून आले समोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 15:46 IST

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन आता ५० वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा १०० टक्के वापर होत नसल्याचे चित्र आहे. भाषा संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामांमध्ये मराठीचा ८० ते ८५ टक्के वापर केला जातो. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही शासनाला १०० टक्के मराठी धोरण राबविण्यात अपयश आले असेच म्हणावे लागेल.

ठळक मुद्देमराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन आता ५० वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा १०० टक्के वापर होत नसल्याचे चित्र आहे.भाषा संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामांमध्ये मराठीचा ८० ते ८५ टक्के वापर केला जातो.

औरंगाबाद : मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन आता ५० वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा १०० टक्के वापर होत नसल्याचे चित्र आहे. भाषा संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामांमध्ये मराठीचा ८० ते ८५ टक्के वापर केला जातो. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही शासनाला १०० टक्के मराठी धोरण राबविण्यात अपयश आले असेच म्हणावे लागेल.

शासनाच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर होतो आहे किंवा नाही हे प्रत्यक्ष तपासणी करून त्याचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करण्याचे काम भाषा संचालनालयाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद येथील विभागीय भाषा संचालनालयातर्फे नुकतेच अहमदपूर येथील पंचायत समिती व उदगीर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची तपासणी करण्यात आली. साधारणत: सरकारी कार्यालयांमध्ये नाम किंवा पदनाम फलक, सूचना व निर्देश फलक, कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या, इंग्रजी उच्चारानुसार नामोल्लेख, रोख पुस्तिकेतील गोषवारे, अधिकार्‍यांचे शेरे, शिक्के, पत्रव्यवहार इंग्रजी भाषेतूनच करण्यात येतो, अशी माहिती संचालनालयाकडून मिळाली. यामध्ये न्यायालयासंबंधी प्रकरणांतील दस्तावेज यासारखे वर्जित प्रयोजने वगळण्यात येतात.

शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या कार्यालयांमध्ये मराठीचा शंभर टक्के वापर होत असल्याची खात्री करून घेण्यासाठी विभागीय कार्यालयाकडून संपूर्ण मराठवाड्यात कार्यालयीन तपासण्या केल्या जातात. तपासणीच्या वेळी मराठीकरणाच्या संदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन त्या- त्या कार्यालयांना करण्यात येते, अशी माहिती विभागीय सहायक भाषा संचालक चंद्रकांत पारकर यांनी दिली.वर्जित प्रयोजने वगळता इतर बाबतीत योग्य कारण नसताना मराठीचा वापर करण्यासंदर्भात जे अधिकारी किंवा कर्मचारी वारंवार समज देऊनही टाळाटाळ करतात त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा अधिकार सर्व विभागप्रमुखांना असतो. राजभाषा ही जनतेची भाषा असते. लोकशाहीच्या विकासासाठी लोकभाषेचा अवलंब करणे ही आजची गरज आहे, अशी भाषा संचालनालयाची भूमिका आहे.

मराठी ही आपुलकीचा भागमराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी कार्यालयांना विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. शासन केवळ नियम तयार करू शकते. परंतु शेवटी अंमलबजावणीच्या पातळीवर हे व्हावे.  - चंद्रकांत पारकर, विभागीय सहायक भाषा संचालक

टॅग्स :marathiमराठीAurangabadऔरंगाबाद