शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

सरकारी कार्यालयांत मराठीचा वापर कमीच; भाषा संचालनालयाच्या तपासणी दौर्‍यातून आले समोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 15:46 IST

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन आता ५० वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा १०० टक्के वापर होत नसल्याचे चित्र आहे. भाषा संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामांमध्ये मराठीचा ८० ते ८५ टक्के वापर केला जातो. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही शासनाला १०० टक्के मराठी धोरण राबविण्यात अपयश आले असेच म्हणावे लागेल.

ठळक मुद्देमराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन आता ५० वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा १०० टक्के वापर होत नसल्याचे चित्र आहे.भाषा संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामांमध्ये मराठीचा ८० ते ८५ टक्के वापर केला जातो.

औरंगाबाद : मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन आता ५० वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा १०० टक्के वापर होत नसल्याचे चित्र आहे. भाषा संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामांमध्ये मराठीचा ८० ते ८५ टक्के वापर केला जातो. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही शासनाला १०० टक्के मराठी धोरण राबविण्यात अपयश आले असेच म्हणावे लागेल.

शासनाच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर होतो आहे किंवा नाही हे प्रत्यक्ष तपासणी करून त्याचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करण्याचे काम भाषा संचालनालयाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद येथील विभागीय भाषा संचालनालयातर्फे नुकतेच अहमदपूर येथील पंचायत समिती व उदगीर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची तपासणी करण्यात आली. साधारणत: सरकारी कार्यालयांमध्ये नाम किंवा पदनाम फलक, सूचना व निर्देश फलक, कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या, इंग्रजी उच्चारानुसार नामोल्लेख, रोख पुस्तिकेतील गोषवारे, अधिकार्‍यांचे शेरे, शिक्के, पत्रव्यवहार इंग्रजी भाषेतूनच करण्यात येतो, अशी माहिती संचालनालयाकडून मिळाली. यामध्ये न्यायालयासंबंधी प्रकरणांतील दस्तावेज यासारखे वर्जित प्रयोजने वगळण्यात येतात.

शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या कार्यालयांमध्ये मराठीचा शंभर टक्के वापर होत असल्याची खात्री करून घेण्यासाठी विभागीय कार्यालयाकडून संपूर्ण मराठवाड्यात कार्यालयीन तपासण्या केल्या जातात. तपासणीच्या वेळी मराठीकरणाच्या संदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन त्या- त्या कार्यालयांना करण्यात येते, अशी माहिती विभागीय सहायक भाषा संचालक चंद्रकांत पारकर यांनी दिली.वर्जित प्रयोजने वगळता इतर बाबतीत योग्य कारण नसताना मराठीचा वापर करण्यासंदर्भात जे अधिकारी किंवा कर्मचारी वारंवार समज देऊनही टाळाटाळ करतात त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा अधिकार सर्व विभागप्रमुखांना असतो. राजभाषा ही जनतेची भाषा असते. लोकशाहीच्या विकासासाठी लोकभाषेचा अवलंब करणे ही आजची गरज आहे, अशी भाषा संचालनालयाची भूमिका आहे.

मराठी ही आपुलकीचा भागमराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी कार्यालयांना विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. शासन केवळ नियम तयार करू शकते. परंतु शेवटी अंमलबजावणीच्या पातळीवर हे व्हावे.  - चंद्रकांत पारकर, विभागीय सहायक भाषा संचालक

टॅग्स :marathiमराठीAurangabadऔरंगाबाद