शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

सरकारचे कामकाज काही जिल्ह्यांपुरतेच मर्यादित; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका 

By सुमेध उघडे | Updated: November 23, 2020 14:26 IST

उर्वरित महाराष्ट्राकडे सरकारचे साफ दुर्लक्ष

ठळक मुद्देसरकारमध्ये समन्वय नाहीय, ज्याला जे वाटेल ते बोलले जातकाही लोक कुठेच शांत राहत नाहीत

औरंगाबाद : राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, ज्याला जे वाटेल ते बोलले जात आहे. विविध मंत्र्यांनी दिलेले प्रस्ताव फेटाळले जातात. सरकारचे कामकाज केवळ काही जिल्ह्यांपुरतीच मर्यादित असून उर्वरित महाराष्ट्राकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

पदवीधर मतदार संघाच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. पत्रकारांची संवाद साधताना फडणवीस पुढे म्हणाले, राज्य सरकार केवळ काही जिल्ह्यांसाठी काम करत आहे. आमच्या सरकारच्या काळात मराठवाड्याला प्राथमिकता देण्यात आली. औरंगाबादच्या पाणी पुरवठा योजनेस निधी दिला. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मंजूर केली. मात्र, या सरकारने वॉटर ग्रीड योजना स्थगित केली. जनता रस्त्यावर उतरेल म्हणून ही योजना रद्द न करता स्थगिती दिली. सरकारने विदर्भ आणि मराठवाड्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. सरकार राज्यातील काही जिल्ह्यांपुरतेच काम करीत असून विदर्भ, मराठवाड्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे,  असा आरोपही त्यांनी यावेळी केला.  

काही लोक कुठेच शांत राहत नाहीतपदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून नाराज जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप सोडली याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, काही लॉक कुठेच शांत बसत नाही.मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांच्याबद्दल नाराजी आहे. भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

सरकार मध्ये समन्वय नाहीसरकारमध्ये समन्वय नाही, ज्याला जे वाटेल ते बोले जाते. मंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावावर विचार न करता ते फेटाळले जातात, अशी टीकाही फडणवीस यांनी वीज बिल माफीच्या प्रस्तावावर निर्णय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केली. कोरोनासाठी उभारलेली यंत्रणा पूर्ण सक्षमतेने कार्यान्वित ठेवावी,  लवकर लस येईल अशी आशा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

आता दिवसा शपथविधी होणार एक वर्षांपूर्वीच्या पहाटेच्या शपथविधी बद्दल देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनी, आता शपथविधी पहाटे पहायला मिळणार नाही, जाहीर करू असे म्हटले. तसेच असल्या गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारBJPभाजपा