शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

सरकारचे कामकाज काही जिल्ह्यांपुरतेच मर्यादित; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका 

By सुमेध उघडे | Updated: November 23, 2020 14:26 IST

उर्वरित महाराष्ट्राकडे सरकारचे साफ दुर्लक्ष

ठळक मुद्देसरकारमध्ये समन्वय नाहीय, ज्याला जे वाटेल ते बोलले जातकाही लोक कुठेच शांत राहत नाहीत

औरंगाबाद : राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, ज्याला जे वाटेल ते बोलले जात आहे. विविध मंत्र्यांनी दिलेले प्रस्ताव फेटाळले जातात. सरकारचे कामकाज केवळ काही जिल्ह्यांपुरतीच मर्यादित असून उर्वरित महाराष्ट्राकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

पदवीधर मतदार संघाच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. पत्रकारांची संवाद साधताना फडणवीस पुढे म्हणाले, राज्य सरकार केवळ काही जिल्ह्यांसाठी काम करत आहे. आमच्या सरकारच्या काळात मराठवाड्याला प्राथमिकता देण्यात आली. औरंगाबादच्या पाणी पुरवठा योजनेस निधी दिला. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मंजूर केली. मात्र, या सरकारने वॉटर ग्रीड योजना स्थगित केली. जनता रस्त्यावर उतरेल म्हणून ही योजना रद्द न करता स्थगिती दिली. सरकारने विदर्भ आणि मराठवाड्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. सरकार राज्यातील काही जिल्ह्यांपुरतेच काम करीत असून विदर्भ, मराठवाड्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे,  असा आरोपही त्यांनी यावेळी केला.  

काही लोक कुठेच शांत राहत नाहीतपदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून नाराज जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप सोडली याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, काही लॉक कुठेच शांत बसत नाही.मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांच्याबद्दल नाराजी आहे. भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

सरकार मध्ये समन्वय नाहीसरकारमध्ये समन्वय नाही, ज्याला जे वाटेल ते बोले जाते. मंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावावर विचार न करता ते फेटाळले जातात, अशी टीकाही फडणवीस यांनी वीज बिल माफीच्या प्रस्तावावर निर्णय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केली. कोरोनासाठी उभारलेली यंत्रणा पूर्ण सक्षमतेने कार्यान्वित ठेवावी,  लवकर लस येईल अशी आशा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

आता दिवसा शपथविधी होणार एक वर्षांपूर्वीच्या पहाटेच्या शपथविधी बद्दल देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनी, आता शपथविधी पहाटे पहायला मिळणार नाही, जाहीर करू असे म्हटले. तसेच असल्या गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारBJPभाजपा