शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी प्राथमिक शाळेकडून शासनाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:30 IST

खोकडपुरा येथील श्री शिवाजी प्राथमिकशाळेने संचमान्यता कायम राहून शिक्षकांची पदे टिकावीत, यासाठीच बनावट पटसंख्या दाखविल्याचा निष्कर्ष जि. प. च्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. तसेच वेतन अनुदान, वेतनेतर अनुदान, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त अनुदान घेऊन शासनाची फसवणूक केल्याचेही अहवालात स्पष्ट केले.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांनी तयार केला अहवाल : पदमान्यता कायम राखण्यासाठीच पटसंख्येची बनवाबनवी

औरंगाबाद : खोकडपुरा येथील श्री शिवाजी प्राथमिकशाळेने संचमान्यता कायम राहून शिक्षकांची पदे टिकावीत, यासाठीच बनावट पटसंख्या दाखविल्याचा निष्कर्ष जि. प. च्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. तसेच वेतन अनुदान, वेतनेतर अनुदान, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त अनुदान घेऊन शासनाची फसवणूक केल्याचेही अहवालात स्पष्ट केले. माध्यमिक शिक्षण विभागाने माध्यमिक शाळेच्या बनवाबनवीचा अहवाल तयार केला आहे.श्री शिवाजी  मोफत एज्युकेशन सोसायटी, कंधार संचलित खोकडपुरा येथील शिवाजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला लस देण्यासाठी सोमवारी (दि.३) रांजणगाव येथून एकाच बसमध्ये १२२ विद्यार्थ्यांना आणले होते. या बसला अपघात झाल्यामुळे शाळेची बनवेगिरी समोर आली. ४ डिसेंबर रोजी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल आणि माध्यमिकचे डॉ. बी.बी. चव्हाण यांनी भेट देत शाळेची झाडाझडती घेतली होती. यात धक्कादायक माहिती मिळाली. प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथीच्या एकूण १२ तुकड्या आहेत. यात ३ डिसेंबर रोजी एकूण ३५२ पैकी २३० विद्यार्थी उपस्थित दाखविले आहे, तर ४ डिसेंबर रोजीच्या पाहणीत शाळेत केवळ २२ विद्यार्थीच आढळून आले. यातील २७४ विद्यार्थ्यांचे रहिवासी पत्ते हे रांजणगाव परिसरातील आहेत. प्राथमिक शाळेत १४ शिक्षक कार्यरत असून, त्यातील दोन शिक्षक विनाअनुदानित आहेत. त्यांना मान्यता देण्यात आलेली नाही, असेही प्राथमिकच्या अहवालात म्हटले आहे. माध्यमिक शिक्षण विभागानेही शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा अहवाल तयार केल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी.चव्हाण यांनी दिली.प्राथमिक शाळेतील त्रुटी- शालेय परिवहन समितीची स्थापना नाही- शालेय व्यवस्थापन समितीचे अभिलेखे उपलब्ध नाहीत.- शाळेने पालक सभा घेतलेली नाही.- पालकांना विद्यार्थ्यांच्या स्थलांतराबाबत लेखी सूचना दिलेल्या नाहीत.- पाठ्यपुस्तकांचे योग्यपणे वाटप नाही.-क्रीडा, अध्ययन, अध्यापन साहित्य उपलब्ध नाही.- ग्रंथालय नोंदवहीवर १४४ पुस्तके पण विद्यार्थ्यांना एकही दिलेले नाही.-१ लाख ६० हजार ८१८ रुपयांचे वेतनेतर अनुदान खर्चाबाबत अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नाही.प्राथमिक शिक्षण विभागाने काढलेले निष्कर्ष- खोकडपुरा येथील प्राथमिक शाळेत रांजणगाव, ता. गंगापूरयेथील २७४ विद्यार्थ्यांची नोंद.- औरंगाबादेतील ७७ विद्यार्थी असून, तपासणीत २२ विद्यार्थीच हजर.- शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा एकाच इमारतीत दोन सत्रात भरवतात. इमारतीची मालकी माध्यमिककडे.- पहिली ते चौथीच्या प्रत्येकी ३ तुकड्या. प्रत्यक्षात प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्यांच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थी हजेरी पट तपासणीसाठी उपलब्ध. तिसºया तुकडीचे हजेरीपटच उपलब्ध नाही.- शाळेने संचमान्यतेमध्ये शिक्षकांची पदे टिकविण्यासाठीच पटसंख्या खोटी दर्शविली.- वेतन अनुदान, वेतनेतर अनुदान, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त अनुदान लाभ घेऊन शासनाची फसवणूक़--शाळेची मान्यता रद्दची शिफारस होणारश्री शिवाजी हायस्कूलमधील प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शाळांची मान्यता रद्द करावी, अशी शिफारस शिक्षण संचालकांना केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाºयांनी दिली. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण म्हणाले, माध्यमिकचा अहवाल तयार केला आहे. त्याआधारे मान्यता रद्द करण्याची शिफारस येत्या दोन दिवसांत केली जाईल. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल म्हणाले, अहवाल अंतिम केला आहे. येत्या दोन दिवसांत शाळेची मान्यता रद्दचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद