शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

प्राधापक भरतीचा शासन निर्णय आज रात्रीपर्यंत निघणार: उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 18:22 IST

Uday Samant : प्राध्यापकांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून करावी या आणि इतर मागण्यांवर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेत आहे.

औरंगाबाद : राज्यभरातील महाविद्यालये व अकृषि विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीच्या निर्णयास उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant ) व या विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी औरंगाबादेत आज सकाळी मान्यता दिली असून यासंदर्भात उदय सामंत यांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शासन निर्णय जारी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ औरंगाबाद’ या उपक्रमासाठी उदय सामंत पहाटेच औरंगाबादेत दाखल झाले. या उपक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यात सुमारे साडेचार हजार प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय उच्चस्तरीय समितीने घेतला होता. यातील १६०० प्राध्यापकांची भरती पूर्ण झाली होती. उर्वरित पदभरतीला कोवीडमुळे मान्यता मिळत नव्हती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने उर्वरित उर्वरित २०८८ प्राध्यापकांची भरती येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी आम्ही शासन निर्णयात अट घातलेली आहे. 

प्राध्यापकांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून करावी, केंद्रीय पद्धतीने करावी, विषयनिहाय करावी तसेच संवर्गनिहाय करावी, अशा मागण्या आल्यामुळे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून येत्या आठ दिवसांत या समितीची बैठक होणार असून त्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ही सामंत यांनी दिली. 

१०० टक्के प्राचार्यांच्या भरतीला मान्यता

संबंधित महाविद्यालयांनी प्राध्यापक भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी, भरतीची प्रक्रिया रखडली जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचना देखिल शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आली आहे.४ मे २०२० पर्यंतची प्राचार्यांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही अट बदलण्यात आली असून १०० टक्के प्राचार्यांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची भरती का केली जात नाही. त्याचा आढावा उच्चशिक्षण व उच्च तंत्रशिक्षण या दोन्ही विभागांच्या संचालकांनी घ्यावा व संबंधित महाविद्यालयांना प्राचार्यांच्या भरतीसाठी सूचना द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्राध्यापकांच्या भरतीनंतर लगेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीलाही मान्यता देण्यात येणार आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतProfessorप्राध्यापकAurangabadऔरंगाबाद