शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

प्राधापक भरतीचा शासन निर्णय आज रात्रीपर्यंत निघणार: उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 18:22 IST

Uday Samant : प्राध्यापकांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून करावी या आणि इतर मागण्यांवर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेत आहे.

औरंगाबाद : राज्यभरातील महाविद्यालये व अकृषि विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीच्या निर्णयास उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant ) व या विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी औरंगाबादेत आज सकाळी मान्यता दिली असून यासंदर्भात उदय सामंत यांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शासन निर्णय जारी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ औरंगाबाद’ या उपक्रमासाठी उदय सामंत पहाटेच औरंगाबादेत दाखल झाले. या उपक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यात सुमारे साडेचार हजार प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय उच्चस्तरीय समितीने घेतला होता. यातील १६०० प्राध्यापकांची भरती पूर्ण झाली होती. उर्वरित पदभरतीला कोवीडमुळे मान्यता मिळत नव्हती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने उर्वरित उर्वरित २०८८ प्राध्यापकांची भरती येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी आम्ही शासन निर्णयात अट घातलेली आहे. 

प्राध्यापकांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून करावी, केंद्रीय पद्धतीने करावी, विषयनिहाय करावी तसेच संवर्गनिहाय करावी, अशा मागण्या आल्यामुळे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून येत्या आठ दिवसांत या समितीची बैठक होणार असून त्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ही सामंत यांनी दिली. 

१०० टक्के प्राचार्यांच्या भरतीला मान्यता

संबंधित महाविद्यालयांनी प्राध्यापक भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी, भरतीची प्रक्रिया रखडली जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचना देखिल शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आली आहे.४ मे २०२० पर्यंतची प्राचार्यांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही अट बदलण्यात आली असून १०० टक्के प्राचार्यांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची भरती का केली जात नाही. त्याचा आढावा उच्चशिक्षण व उच्च तंत्रशिक्षण या दोन्ही विभागांच्या संचालकांनी घ्यावा व संबंधित महाविद्यालयांना प्राचार्यांच्या भरतीसाठी सूचना द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्राध्यापकांच्या भरतीनंतर लगेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीलाही मान्यता देण्यात येणार आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतProfessorप्राध्यापकAurangabadऔरंगाबाद