शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

प्राधापक भरतीचा शासन निर्णय आज रात्रीपर्यंत निघणार: उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 18:22 IST

Uday Samant : प्राध्यापकांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून करावी या आणि इतर मागण्यांवर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेत आहे.

औरंगाबाद : राज्यभरातील महाविद्यालये व अकृषि विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीच्या निर्णयास उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant ) व या विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी औरंगाबादेत आज सकाळी मान्यता दिली असून यासंदर्भात उदय सामंत यांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शासन निर्णय जारी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ औरंगाबाद’ या उपक्रमासाठी उदय सामंत पहाटेच औरंगाबादेत दाखल झाले. या उपक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यात सुमारे साडेचार हजार प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय उच्चस्तरीय समितीने घेतला होता. यातील १६०० प्राध्यापकांची भरती पूर्ण झाली होती. उर्वरित पदभरतीला कोवीडमुळे मान्यता मिळत नव्हती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने उर्वरित उर्वरित २०८८ प्राध्यापकांची भरती येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी आम्ही शासन निर्णयात अट घातलेली आहे. 

प्राध्यापकांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून करावी, केंद्रीय पद्धतीने करावी, विषयनिहाय करावी तसेच संवर्गनिहाय करावी, अशा मागण्या आल्यामुळे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून येत्या आठ दिवसांत या समितीची बैठक होणार असून त्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ही सामंत यांनी दिली. 

१०० टक्के प्राचार्यांच्या भरतीला मान्यता

संबंधित महाविद्यालयांनी प्राध्यापक भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी, भरतीची प्रक्रिया रखडली जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचना देखिल शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आली आहे.४ मे २०२० पर्यंतची प्राचार्यांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही अट बदलण्यात आली असून १०० टक्के प्राचार्यांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची भरती का केली जात नाही. त्याचा आढावा उच्चशिक्षण व उच्च तंत्रशिक्षण या दोन्ही विभागांच्या संचालकांनी घ्यावा व संबंधित महाविद्यालयांना प्राचार्यांच्या भरतीसाठी सूचना द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्राध्यापकांच्या भरतीनंतर लगेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीलाही मान्यता देण्यात येणार आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतProfessorप्राध्यापकAurangabadऔरंगाबाद