शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

मराठवाड्यासाठी आनंदवार्ता ! मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 15:26 IST

Marathwada Water Issue : गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित ठेवून शुक्रवारी जलसंपदामंत्री पाटील यांनी अतिरिक्त पाणी वापराच्या संचिकेवर सही केली.

ठळक मुद्देपूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी जलसंपदा विभागाने दूर केल्या आहेत.पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापरता येणार

औरंगाबाद : विजयादशमीच्या मुहूर्तावर मराठवाड्यासाठी आनंदाची ( Marathwada Water Issue)  बातमी आहे. मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी ( Central Godavari sub-basin) अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी दिली असून, यामुळे पाण्याविना रखडलेल्या अनेक प्रकल्पांची कामे मार्गी लागणार आहेत. पाणी वापराचा तंटा सुटल्याने नवीन प्रकल्पांची कामे होणे शक्य होणार आहे.

गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित ठेवून शुक्रवारी जलसंपदामंत्री पाटील यांनी अतिरिक्त पाणी वापराच्या संचिकेवर सही केली. पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी जलसंपदा विभागाने दूर केल्या आहेत. या त्रुटी दूर केल्यामुळे १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मंजुरी मिळाली. पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापर मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला करता येणार आहे. जे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते त्यातील काही प्रकल्पांत पाणी उपलब्धता आहे आणि उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले, तर सुरू करता येतील. या निर्णयामुळे बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील पाण्याचे प्रश्न व प्रकल्पांचे अडथळे दूर झाले आहेत.

विभागासाठी ऐतिहासिक निर्णय आहेगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी सांगितले, हा मराठवाड्यासाठी ऐतिहासिक निर्णय आहे. १९७५ पूर्वीचा पाणी वापर अबाधित ठेवून निर्णय झाला आहे. परभणी, नांदेड, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी याचा लाभ होणार असून, नवीन काही प्रकल्प यामुळे शक्य होणार आहेत.

रखडलेले प्रकल्प पूर्ण होतीलमराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यातील मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९७५ चा पाणी वापर संरक्षित होता. त्यातील त्रुटी दुरुस्त केल्याने १९.२९ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. या संचिकेवर आजच सही केली आहे. मराठवाड्याला याचा फायदा होणार आहे. हे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते. ते पूर्ण करता येतील. बीड, हिंगोली, नांदेड येथील प्रकल्पांच्या अडचणी दूर होतील.- जयंत पाटील, जलसंपदामंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाgodavariगोदावरीWaterपाणी