शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मराठवाड्यासाठी आनंदवार्ता ! मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 15:26 IST

Marathwada Water Issue : गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित ठेवून शुक्रवारी जलसंपदामंत्री पाटील यांनी अतिरिक्त पाणी वापराच्या संचिकेवर सही केली.

ठळक मुद्देपूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी जलसंपदा विभागाने दूर केल्या आहेत.पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापरता येणार

औरंगाबाद : विजयादशमीच्या मुहूर्तावर मराठवाड्यासाठी आनंदाची ( Marathwada Water Issue)  बातमी आहे. मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी ( Central Godavari sub-basin) अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी दिली असून, यामुळे पाण्याविना रखडलेल्या अनेक प्रकल्पांची कामे मार्गी लागणार आहेत. पाणी वापराचा तंटा सुटल्याने नवीन प्रकल्पांची कामे होणे शक्य होणार आहे.

गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित ठेवून शुक्रवारी जलसंपदामंत्री पाटील यांनी अतिरिक्त पाणी वापराच्या संचिकेवर सही केली. पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी जलसंपदा विभागाने दूर केल्या आहेत. या त्रुटी दूर केल्यामुळे १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मंजुरी मिळाली. पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापर मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला करता येणार आहे. जे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते त्यातील काही प्रकल्पांत पाणी उपलब्धता आहे आणि उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले, तर सुरू करता येतील. या निर्णयामुळे बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील पाण्याचे प्रश्न व प्रकल्पांचे अडथळे दूर झाले आहेत.

विभागासाठी ऐतिहासिक निर्णय आहेगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी सांगितले, हा मराठवाड्यासाठी ऐतिहासिक निर्णय आहे. १९७५ पूर्वीचा पाणी वापर अबाधित ठेवून निर्णय झाला आहे. परभणी, नांदेड, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी याचा लाभ होणार असून, नवीन काही प्रकल्प यामुळे शक्य होणार आहेत.

रखडलेले प्रकल्प पूर्ण होतीलमराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यातील मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९७५ चा पाणी वापर संरक्षित होता. त्यातील त्रुटी दुरुस्त केल्याने १९.२९ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. या संचिकेवर आजच सही केली आहे. मराठवाड्याला याचा फायदा होणार आहे. हे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते. ते पूर्ण करता येतील. बीड, हिंगोली, नांदेड येथील प्रकल्पांच्या अडचणी दूर होतील.- जयंत पाटील, जलसंपदामंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाgodavariगोदावरीWaterपाणी