शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यासाठी आनंदवार्ता ! मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 15:26 IST

Marathwada Water Issue : गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित ठेवून शुक्रवारी जलसंपदामंत्री पाटील यांनी अतिरिक्त पाणी वापराच्या संचिकेवर सही केली.

ठळक मुद्देपूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी जलसंपदा विभागाने दूर केल्या आहेत.पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापरता येणार

औरंगाबाद : विजयादशमीच्या मुहूर्तावर मराठवाड्यासाठी आनंदाची ( Marathwada Water Issue)  बातमी आहे. मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी ( Central Godavari sub-basin) अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी दिली असून, यामुळे पाण्याविना रखडलेल्या अनेक प्रकल्पांची कामे मार्गी लागणार आहेत. पाणी वापराचा तंटा सुटल्याने नवीन प्रकल्पांची कामे होणे शक्य होणार आहे.

गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित ठेवून शुक्रवारी जलसंपदामंत्री पाटील यांनी अतिरिक्त पाणी वापराच्या संचिकेवर सही केली. पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी जलसंपदा विभागाने दूर केल्या आहेत. या त्रुटी दूर केल्यामुळे १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मंजुरी मिळाली. पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापर मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला करता येणार आहे. जे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते त्यातील काही प्रकल्पांत पाणी उपलब्धता आहे आणि उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले, तर सुरू करता येतील. या निर्णयामुळे बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील पाण्याचे प्रश्न व प्रकल्पांचे अडथळे दूर झाले आहेत.

विभागासाठी ऐतिहासिक निर्णय आहेगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी सांगितले, हा मराठवाड्यासाठी ऐतिहासिक निर्णय आहे. १९७५ पूर्वीचा पाणी वापर अबाधित ठेवून निर्णय झाला आहे. परभणी, नांदेड, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी याचा लाभ होणार असून, नवीन काही प्रकल्प यामुळे शक्य होणार आहेत.

रखडलेले प्रकल्प पूर्ण होतीलमराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यातील मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९७५ चा पाणी वापर संरक्षित होता. त्यातील त्रुटी दुरुस्त केल्याने १९.२९ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. या संचिकेवर आजच सही केली आहे. मराठवाड्याला याचा फायदा होणार आहे. हे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते. ते पूर्ण करता येतील. बीड, हिंगोली, नांदेड येथील प्रकल्पांच्या अडचणी दूर होतील.- जयंत पाटील, जलसंपदामंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाgodavariगोदावरीWaterपाणी