शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! पाणीपट्टी अर्ध्यावर, १५ एमएलडी पाण्यात वाढ; पालकमंत्री देसाई यांनी केल्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 19:26 IST

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय

औरंगाबाद : महापालिकेकडून सध्या दरवर्षी ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. पाणीपट्टीत पन्नास टक्के म्हणजे दोन हजार रुपये कपात करण्याची घोषणा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी केली. लवकरच शहराच्या पाणीपुरवठ्यात आणखी १५ एमएलडीने वाढ करण्यात येईल. पाणीपुरवठ्याचे वितरण सुरळीत व्हावे, यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नेमण्याचा निर्णयही पालकमंत्र्यांनी घेतला.

शहरातील पाणीटंचाई आणि मनपाकडून आतापर्यंत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. स्मार्ट सिटीच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजयसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत आस्तिककुमार पाण्डेय यांनी ४२ मुद्यांवर उपाययोजना राबवून ८ दिवसांत शहरात १५ एमएलडीने अतिरिक्त पाणी वाढणार असल्याचे सांगितले. शहरात समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही तो पर्यंत नागरिकांवर आकारण्यात आलेली ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करून ती २ हजार रुपये आकारण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. अनेक वसाहतींना आठवड्यातून एकदा पाणी मिळत असताना पाणीपट्टी ४ हजार रुपये घेतली जात असल्यामुळे नागरिकांकडून ओरड सुरू होती. आ. अंबादास दानवे, माजी सभापती राजू वैद्य यांनी दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री देसाई यांची भेट घेऊन पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करावी अशी मागणी केली होती. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी नमूद केले की, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ४ हजार रुपयांची पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करून २ हजार रुपये करण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मनपा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका