शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

खुशखबर! पाणीपट्टी अर्ध्यावर, १५ एमएलडी पाण्यात वाढ; पालकमंत्री देसाई यांनी केल्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 19:26 IST

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय

औरंगाबाद : महापालिकेकडून सध्या दरवर्षी ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. पाणीपट्टीत पन्नास टक्के म्हणजे दोन हजार रुपये कपात करण्याची घोषणा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी केली. लवकरच शहराच्या पाणीपुरवठ्यात आणखी १५ एमएलडीने वाढ करण्यात येईल. पाणीपुरवठ्याचे वितरण सुरळीत व्हावे, यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नेमण्याचा निर्णयही पालकमंत्र्यांनी घेतला.

शहरातील पाणीटंचाई आणि मनपाकडून आतापर्यंत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. स्मार्ट सिटीच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजयसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत आस्तिककुमार पाण्डेय यांनी ४२ मुद्यांवर उपाययोजना राबवून ८ दिवसांत शहरात १५ एमएलडीने अतिरिक्त पाणी वाढणार असल्याचे सांगितले. शहरात समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही तो पर्यंत नागरिकांवर आकारण्यात आलेली ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करून ती २ हजार रुपये आकारण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. अनेक वसाहतींना आठवड्यातून एकदा पाणी मिळत असताना पाणीपट्टी ४ हजार रुपये घेतली जात असल्यामुळे नागरिकांकडून ओरड सुरू होती. आ. अंबादास दानवे, माजी सभापती राजू वैद्य यांनी दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री देसाई यांची भेट घेऊन पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करावी अशी मागणी केली होती. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी नमूद केले की, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ४ हजार रुपयांची पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करून २ हजार रुपये करण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मनपा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका