शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! पाणीपट्टी अर्ध्यावर, १५ एमएलडी पाण्यात वाढ; पालकमंत्री देसाई यांनी केल्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 19:26 IST

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय

औरंगाबाद : महापालिकेकडून सध्या दरवर्षी ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. पाणीपट्टीत पन्नास टक्के म्हणजे दोन हजार रुपये कपात करण्याची घोषणा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी केली. लवकरच शहराच्या पाणीपुरवठ्यात आणखी १५ एमएलडीने वाढ करण्यात येईल. पाणीपुरवठ्याचे वितरण सुरळीत व्हावे, यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नेमण्याचा निर्णयही पालकमंत्र्यांनी घेतला.

शहरातील पाणीटंचाई आणि मनपाकडून आतापर्यंत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. स्मार्ट सिटीच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजयसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत आस्तिककुमार पाण्डेय यांनी ४२ मुद्यांवर उपाययोजना राबवून ८ दिवसांत शहरात १५ एमएलडीने अतिरिक्त पाणी वाढणार असल्याचे सांगितले. शहरात समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही तो पर्यंत नागरिकांवर आकारण्यात आलेली ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करून ती २ हजार रुपये आकारण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. अनेक वसाहतींना आठवड्यातून एकदा पाणी मिळत असताना पाणीपट्टी ४ हजार रुपये घेतली जात असल्यामुळे नागरिकांकडून ओरड सुरू होती. आ. अंबादास दानवे, माजी सभापती राजू वैद्य यांनी दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री देसाई यांची भेट घेऊन पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करावी अशी मागणी केली होती. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी नमूद केले की, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ४ हजार रुपयांची पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करून २ हजार रुपये करण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मनपा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका