शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शहवासीयांनो, सुवार्ता...हर्सूल तलावात वर्षभर बोटिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 12:41 IST

मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास नागरिक आणि पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येईल. यासंदर्भातील डीपीआर लवकरच महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येणार

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या नमामि गंगा योजनेत औरंगाबाद शहरातील खाम आणि सुखना नदीचा समावेश यापूर्वीच करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत लवकरच खाम नदीत म्हणजेच हर्सूल तलावात नागरिकांना आणि पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येईल, अशी माहिती गुरुवारी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.

मागील वर्षभरापासून महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटी, इको सत्त्व, छावणी परिषद आणि शहरातील विविध स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत सात किलोमीटर लांब नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. लोखंडी पुलाजवळ सुशोभीकरण करण्यात आले. या कामांचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी महापालिकेने आजपर्यंत एक रुपयाही खर्च केला नाही. भविष्यात पात्रातील पाणी स्वच्छ करणे, ड्रेनेज जोडण्या बंद करणे इ. कामे करण्यात येणार आहेत. खाम नदीत वेगवेगळ्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून पाणी येते. हे कोल्हापुरी बंधारे दुरुस्त करण्यात येतील. खाम नदीत म्हणजेच हर्सूल तलावात बाराही महिने पाणी साचून राहावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास नागरिक आणि पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येईल. यासंदर्भातील डीपीआर लवकरच महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येणार आहे, असे पाण्डेय यांनी सांगितले.

यापूर्वी सलीम अली सरोवरात प्रयत्न अयशस्वीमहापालिका प्रशासनाने यापूर्वी सलीम अली सरोवरात बोटिंगचा प्रयोग केला होता; मात्र तो काही महिन्यांतच बंद पडला. सरोवरातील दूषित पाणी पूर्णपणे शुद्ध झाल्यावरच महापालिका प्रशासन बोटिंगचा विचार करू शकते. सरोवराशी संबंधित एक याचिका खंडपीठात दाखल आहे. त्यामुळे प्रशासनाला कोणताही निर्णय घेता येत नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाtourismपर्यटनhersul lakeहर्सूल तलाव