शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

शहवासीयांनो, सुवार्ता...हर्सूल तलावात वर्षभर बोटिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 12:41 IST

मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास नागरिक आणि पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येईल. यासंदर्भातील डीपीआर लवकरच महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येणार

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या नमामि गंगा योजनेत औरंगाबाद शहरातील खाम आणि सुखना नदीचा समावेश यापूर्वीच करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत लवकरच खाम नदीत म्हणजेच हर्सूल तलावात नागरिकांना आणि पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येईल, अशी माहिती गुरुवारी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.

मागील वर्षभरापासून महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटी, इको सत्त्व, छावणी परिषद आणि शहरातील विविध स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत सात किलोमीटर लांब नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. लोखंडी पुलाजवळ सुशोभीकरण करण्यात आले. या कामांचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी महापालिकेने आजपर्यंत एक रुपयाही खर्च केला नाही. भविष्यात पात्रातील पाणी स्वच्छ करणे, ड्रेनेज जोडण्या बंद करणे इ. कामे करण्यात येणार आहेत. खाम नदीत वेगवेगळ्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून पाणी येते. हे कोल्हापुरी बंधारे दुरुस्त करण्यात येतील. खाम नदीत म्हणजेच हर्सूल तलावात बाराही महिने पाणी साचून राहावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास नागरिक आणि पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येईल. यासंदर्भातील डीपीआर लवकरच महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येणार आहे, असे पाण्डेय यांनी सांगितले.

यापूर्वी सलीम अली सरोवरात प्रयत्न अयशस्वीमहापालिका प्रशासनाने यापूर्वी सलीम अली सरोवरात बोटिंगचा प्रयोग केला होता; मात्र तो काही महिन्यांतच बंद पडला. सरोवरातील दूषित पाणी पूर्णपणे शुद्ध झाल्यावरच महापालिका प्रशासन बोटिंगचा विचार करू शकते. सरोवराशी संबंधित एक याचिका खंडपीठात दाखल आहे. त्यामुळे प्रशासनाला कोणताही निर्णय घेता येत नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाtourismपर्यटनhersul lakeहर्सूल तलाव