शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शहवासीयांनो, सुवार्ता...हर्सूल तलावात वर्षभर बोटिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 12:41 IST

मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास नागरिक आणि पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येईल. यासंदर्भातील डीपीआर लवकरच महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येणार

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या नमामि गंगा योजनेत औरंगाबाद शहरातील खाम आणि सुखना नदीचा समावेश यापूर्वीच करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत लवकरच खाम नदीत म्हणजेच हर्सूल तलावात नागरिकांना आणि पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येईल, अशी माहिती गुरुवारी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.

मागील वर्षभरापासून महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटी, इको सत्त्व, छावणी परिषद आणि शहरातील विविध स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत सात किलोमीटर लांब नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. लोखंडी पुलाजवळ सुशोभीकरण करण्यात आले. या कामांचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी महापालिकेने आजपर्यंत एक रुपयाही खर्च केला नाही. भविष्यात पात्रातील पाणी स्वच्छ करणे, ड्रेनेज जोडण्या बंद करणे इ. कामे करण्यात येणार आहेत. खाम नदीत वेगवेगळ्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून पाणी येते. हे कोल्हापुरी बंधारे दुरुस्त करण्यात येतील. खाम नदीत म्हणजेच हर्सूल तलावात बाराही महिने पाणी साचून राहावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास नागरिक आणि पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येईल. यासंदर्भातील डीपीआर लवकरच महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येणार आहे, असे पाण्डेय यांनी सांगितले.

यापूर्वी सलीम अली सरोवरात प्रयत्न अयशस्वीमहापालिका प्रशासनाने यापूर्वी सलीम अली सरोवरात बोटिंगचा प्रयोग केला होता; मात्र तो काही महिन्यांतच बंद पडला. सरोवरातील दूषित पाणी पूर्णपणे शुद्ध झाल्यावरच महापालिका प्रशासन बोटिंगचा विचार करू शकते. सरोवराशी संबंधित एक याचिका खंडपीठात दाखल आहे. त्यामुळे प्रशासनाला कोणताही निर्णय घेता येत नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाtourismपर्यटनhersul lakeहर्सूल तलाव