शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालकांना दिलासा देणारी बातमी; लम्पीमुळे दगावलेल्या पशुधनासाठी अर्थसाहाय्य पूर्ववत

By विजय सरवदे | Updated: July 22, 2023 13:13 IST

प्रस्ताव सादर करण्याचे जि. प. पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगामुळे दगावलेल्या गोवंशीय पशुधनाच्या पालकांना दिले जाणारे अर्थसाहाय्य मार्च महिन्यापासून थांबविण्यात आले होते. मात्र, विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात यावर सरकारला धारेवर धरण्यात आल्यानंतर ते अर्थसाहाय्य पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. तथापि, यासाठी पशुपालकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जि. प. पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जानेवारी-फेब्रुवारीपासून जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी अधून-मधून काही प्रमाणात तो डोके वर काढतच राहिला. दरम्यान, या आजारामुळे दगावलेल्या गोवंशीय पशुधनाच्या पालकांना शासन निर्णयानुसार ३१ मार्चपर्यंत अर्थसाहाय्य देण्यात आले. त्यानंतर ते थांबविण्यात आले. त्यामुळे मार्चनंतर दगावलेल्या जनावरांचे पालक आर्थिक संकटात सापडले. आता रोखलेले अर्थसाहाय्य सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतल्यामुळे या पशुपालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. प्राप्त माहितीनुसार या आजाराने आतापर्यंत १ हजार ३१९ पशुधन दगावले. त्यापैकी १ हजार २८४ पशुधनाच्या पालकांना ३ कोटी ३० लाख ३९ हजार रुपये एवढे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.

साधारणपणे सप्टेंबर २०२२ पासून लम्पी आजाराने अख्खा जिल्हा कवेत घेतला. यामुळे १२ हजारांहून अधिक जनावरे बाधित झाली. त्यापैकी १ हजार ३१९ जनावरे दगावली. उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या. सध्याही या आजाराला वेशीबाहेरच ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मिशन मोडवर गोठा स्वच्छता मोहीम, फवारणी करण्यात येत आहे. लसीकरणावरही भर देण्यात आला आहे. शिल्लक ५५ हजार तसेच आठ दिवसांपूर्वी प्राप्त २ लाख १५ हजार लसी अशा एकूण २ लाख ६५ हजार लसी जनावरांना देण्यात येत आहेत. आजपर्यंत १ लाख ३० हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

मार्चपर्यंत ३ कोटींचे अर्थसाहाय्य वाटपलम्पीमुळे मयत गायीसाठी ३० हजार रुपये, बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार, तर वासराचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य संबंधित पशुपालकांना देण्यात येते. यानुसार मार्चपर्यंत १२८४ जनावरांच्या पालकांना ३ कोटी ३० लाख ३९ हजार रुपये एवढे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी