शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालकांना दिलासा देणारी बातमी; लम्पीमुळे दगावलेल्या पशुधनासाठी अर्थसाहाय्य पूर्ववत

By विजय सरवदे | Updated: July 22, 2023 13:13 IST

प्रस्ताव सादर करण्याचे जि. प. पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगामुळे दगावलेल्या गोवंशीय पशुधनाच्या पालकांना दिले जाणारे अर्थसाहाय्य मार्च महिन्यापासून थांबविण्यात आले होते. मात्र, विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात यावर सरकारला धारेवर धरण्यात आल्यानंतर ते अर्थसाहाय्य पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. तथापि, यासाठी पशुपालकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जि. प. पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जानेवारी-फेब्रुवारीपासून जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी अधून-मधून काही प्रमाणात तो डोके वर काढतच राहिला. दरम्यान, या आजारामुळे दगावलेल्या गोवंशीय पशुधनाच्या पालकांना शासन निर्णयानुसार ३१ मार्चपर्यंत अर्थसाहाय्य देण्यात आले. त्यानंतर ते थांबविण्यात आले. त्यामुळे मार्चनंतर दगावलेल्या जनावरांचे पालक आर्थिक संकटात सापडले. आता रोखलेले अर्थसाहाय्य सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतल्यामुळे या पशुपालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. प्राप्त माहितीनुसार या आजाराने आतापर्यंत १ हजार ३१९ पशुधन दगावले. त्यापैकी १ हजार २८४ पशुधनाच्या पालकांना ३ कोटी ३० लाख ३९ हजार रुपये एवढे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.

साधारणपणे सप्टेंबर २०२२ पासून लम्पी आजाराने अख्खा जिल्हा कवेत घेतला. यामुळे १२ हजारांहून अधिक जनावरे बाधित झाली. त्यापैकी १ हजार ३१९ जनावरे दगावली. उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या. सध्याही या आजाराला वेशीबाहेरच ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मिशन मोडवर गोठा स्वच्छता मोहीम, फवारणी करण्यात येत आहे. लसीकरणावरही भर देण्यात आला आहे. शिल्लक ५५ हजार तसेच आठ दिवसांपूर्वी प्राप्त २ लाख १५ हजार लसी अशा एकूण २ लाख ६५ हजार लसी जनावरांना देण्यात येत आहेत. आजपर्यंत १ लाख ३० हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

मार्चपर्यंत ३ कोटींचे अर्थसाहाय्य वाटपलम्पीमुळे मयत गायीसाठी ३० हजार रुपये, बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार, तर वासराचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य संबंधित पशुपालकांना देण्यात येते. यानुसार मार्चपर्यंत १२८४ जनावरांच्या पालकांना ३ कोटी ३० लाख ३९ हजार रुपये एवढे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी