शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

पशुपालकांना दिलासा देणारी बातमी; लम्पीमुळे दगावलेल्या पशुधनासाठी अर्थसाहाय्य पूर्ववत

By विजय सरवदे | Updated: July 22, 2023 13:13 IST

प्रस्ताव सादर करण्याचे जि. प. पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगामुळे दगावलेल्या गोवंशीय पशुधनाच्या पालकांना दिले जाणारे अर्थसाहाय्य मार्च महिन्यापासून थांबविण्यात आले होते. मात्र, विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात यावर सरकारला धारेवर धरण्यात आल्यानंतर ते अर्थसाहाय्य पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. तथापि, यासाठी पशुपालकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जि. प. पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जानेवारी-फेब्रुवारीपासून जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी अधून-मधून काही प्रमाणात तो डोके वर काढतच राहिला. दरम्यान, या आजारामुळे दगावलेल्या गोवंशीय पशुधनाच्या पालकांना शासन निर्णयानुसार ३१ मार्चपर्यंत अर्थसाहाय्य देण्यात आले. त्यानंतर ते थांबविण्यात आले. त्यामुळे मार्चनंतर दगावलेल्या जनावरांचे पालक आर्थिक संकटात सापडले. आता रोखलेले अर्थसाहाय्य सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतल्यामुळे या पशुपालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. प्राप्त माहितीनुसार या आजाराने आतापर्यंत १ हजार ३१९ पशुधन दगावले. त्यापैकी १ हजार २८४ पशुधनाच्या पालकांना ३ कोटी ३० लाख ३९ हजार रुपये एवढे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.

साधारणपणे सप्टेंबर २०२२ पासून लम्पी आजाराने अख्खा जिल्हा कवेत घेतला. यामुळे १२ हजारांहून अधिक जनावरे बाधित झाली. त्यापैकी १ हजार ३१९ जनावरे दगावली. उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या. सध्याही या आजाराला वेशीबाहेरच ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मिशन मोडवर गोठा स्वच्छता मोहीम, फवारणी करण्यात येत आहे. लसीकरणावरही भर देण्यात आला आहे. शिल्लक ५५ हजार तसेच आठ दिवसांपूर्वी प्राप्त २ लाख १५ हजार लसी अशा एकूण २ लाख ६५ हजार लसी जनावरांना देण्यात येत आहेत. आजपर्यंत १ लाख ३० हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

मार्चपर्यंत ३ कोटींचे अर्थसाहाय्य वाटपलम्पीमुळे मयत गायीसाठी ३० हजार रुपये, बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार, तर वासराचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य संबंधित पशुपालकांना देण्यात येते. यानुसार मार्चपर्यंत १२८४ जनावरांच्या पालकांना ३ कोटी ३० लाख ३९ हजार रुपये एवढे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी