शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

खूशखबर.. पुन्हा गाठता येणार दीड तासात बंगळुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 18:16 IST

१५ एप्रिलपासून विमानसेवेच्या हालचाली

औरंगाबाद : औरंगाबादहून पुन्हा एकदा दीड तासात बंगळुरू गाठता येणार आहे. इंडिगोची सकाळच्या वेळेत ही विमानसेवा १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा सुरू होण्याच्या हालचाली असल्याची माहिती विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली.

कोरोनापूर्वी स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांकडून बंगळुरूसाठी विमानसेवा दिली जात होती, परंतु कोरोनाचा फटका बसला आणि बंगळुरूची हवाई कनेक्टिव्हिटी तुटली. आयटी हब म्हणून बंगळुरूची ओळख आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षणासाठी औरंगाबादहून बंगळुरूला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

नोव्हेंबर, २०१९ मध्ये पहिल्यांदा बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू झाली होती. त्यास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कोरोनामुळे त्यात खंड पडला. आता प्रवाशांचीही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

बहुतांश प्रवासी बंगळुरू विमानसेवेसाठी शिर्डी विमानतळ गाठतात. औरंगाबादहून ही सेवा पुन्हा नव्याने विमानसेवा सुरू झाल्यास शिर्डीला जाण्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार नाही. ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात दुजोरा दिला नाही.

स्पाइस जेट, जेट एअरवेजची प्रतीक्षास्पाइस जेट, जेट एअरवेजकडून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू केली जाईल, असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात येत होते, परंतु या दोन्ही कंपन्यांच्या विमानसेवेची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

सकाळच्या वेळेत विमानसेवा गरजेचीऔरंगाबादहून सकाळच्या वेळेत विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे इतर विमानतळांवर पोहोचल्यानंतर इतर कनेक्टिंग फ्लाइटने प्रवास करणे सोपे होते, असे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जसवंतसिंग म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटन