शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

आनंदाची बातमी ! मराठवाड्यात औरंगाबादची भूजल पातळी सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 18:42 IST

Aurangabad has the highest groundwater level in Marathwada जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत ७६ तालुक्यातील ८७५ विहिरीतील पाणी पातळी तपासण्यात आली आहे

ठळक मुद्देमागील ५ वर्षांच्या तुलनेत २.०३ ने भूजल पातळी वाढली

औरंगाबाद : मागील पावसाळ्यात मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला होता. आता पाऊस पुरे, अशी म्हणण्याची वेळ लोकांवर आली होती. परिणामी, भूजल पातळीत वाढ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक भूजल वाढल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाने मागील जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत ७६ तालुक्यातील ८७५ विहिरीतील पाणी पातळी तपासली. हा अहवाल समोर आला आहे. मराठवाड्यात मागील ५ वर्षांतील जानेवारी महिन्यातील भूजल पातळी ७.८९ मीटर असते. या जानेवारीत ६.६५ मीटर भूजल पातळी राहिली, म्हणजे १.०५ मीटरने भूजल पातळी मराठवाड्यात वाढली. यातही औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २.०३ मीटर भूजल पातळी वाढली, तर सर्वात कमी भूजल पातळी लातूर जिल्ह्यात -०.४३ एवढी वाढली आहे. जालना जिल्ह्यात १.९१ मीटर, परभणी १ मीटर, हिंगोली ०.३९ मीटर, नांदेड १.६३ मीटर, उस्मानाबाद १.१९ मीटर तर बीड जिल्ह्यात ०.६६ मीटरने भूजलपातळी वाढली. परभणी, गंगाखेड, किनवट व चाकूर या तालुक्यात अन्य तालुक्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. कृषी विद्यापीठाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान साधारणपणे ७२२.५ मिमी पाऊस पडतो. मात्र, मागील वर्षी सरासरीपेक्षा १६.९ टक्के अधिक पाऊस झाला. भूजलपातळी वाढली, तरी पाण्याचा अतिवापर टाळावा, पाणी जपून वापरावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सध्या तरी नाही पाणीटंचाईमराठवाड्यात जानेवारी महिन्यात कुठेच १ मीटरपेक्षा खाली भूजल पातळी गेली नाही. यामुळे सध्या तरी पाणीटंचाईसारखी परिस्थिती नसल्याचे भूजल पातळीच्या सर्वेक्षणातून दिसून येते. मात्र, यापुढे पाण्याचा किती उपसा होतो, यावरून मार्च महिन्यात किती भूजल पातळी खाली गेली. याचा सर्वेक्षण केल्यावर उन्हाळ्यात मेपर्यंत काय परिस्थिती राहील, हे कळले.- डॉ.एम.डी. देशमुख, उपसंचालिका, प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीRainपाऊस