शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

वैजापुरात साईभक्तीचे मंगलमय सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:23 IST

साईची वारी, शिर्डीच्या दारी : पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी

वैजापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री साईभक्त बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या ‘साईची वारी, शिर्डीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत शहरातील मोठ्या संख्येने साईभक्तांनी वैजापूर ते शिर्डी पायी दिंडीमध्ये सहभाग नोंदविला. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर सार्इंचाच जयघोष ऐकू येत होता.सार्इंच्या गजरात दंग झालेल्या वैजापूरकरांमुळे रविवारी शहराला शिर्डीची शोभा आली होती. वृक्षलागवड ,स्वच्छता, पर्यावरण असे विविध विषय हाती घेऊन वारकऱ्यांसोबत माळकरी आणि टाळकरी विद्यार्थीही दिंडीमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, नयनरम्य पालखी सोहळ्याने वैजापूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. टाळ-मृदंगामुळे वातावरणात सार्इंचाच गजर ऐकू येत होता. विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत वारकºयांच्या सेवेसाठी रस्त्यावर स्टॉल लावले होते. पहाटे चार वाजता शहरातील महादेव मंदिरापासून साईबाबांच्या पालखीसह शिर्डी दिंडीस सुरुवात झाली.यावेळी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, संस्थेचे अध्यक्ष विशाल संचेती, कैलास साखरे, योगिता साखरे, राजेंद्र लालसरे, रेवती लालसरे, आशाबाई आगळे, प्रशांत गायकवाड, नितिन लुनावत, शुभम् लालसरे, मनोज दौडे, सुधीर लालसरे, पारस घाटे, उमेश वाळेकर, धोंडीरामसिंह राजपूत, शैलेश पोंदे यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली. नागपूर-मुंबई महामार्गावरील आठ तासांच्या प्रवासादरम्यान वैजापूर पालिका, साईभक्त, महादेव मित्र मंडळ व इतर संस्थांच्या वतीने दिंडीतील भाविकांसाठी चहा, नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रविवारी दुपारी दिंडी शिर्डीत पोहोचल्यानंतर या भाविकांसाठी साई संस्थानने दर्शनाची व्यवस्था केली होती.४२ कि. मी. पायी दिंडीपहाटे चार वाजता शहरातील महादेव मंदिरापासून साईबाबांच्या पालखीसह शिर्डी दिंडीस सुरुवात झाली. तब्बल ४२ कि.मी. अंतर आठ ते नऊ तासात पूर्ण करण्यात आले. पालखी वैजापुरातून जाणार म्हणून रस्ते झाडून पुसून ठेवल्यासारखे दिसत होते. पालखी मार्गावर सडे रांगोळ्या काढलेल्या होत्या. वातावरणात एक वेगळाच उत्साह होता. बेलगाव, सटाणा, कोपरगाव मार्गे दुपारी साईभक्त शिर्डीला पोहोचले.नजर जाईल तिथपर्यंत भक्तसागरपायी दिंडीत दहा वर्षांपासून ते सत्तर वर्षे वयोगटातील भक्तांचा जनसागर रस्त्यावर दिसत होता. कोणी गप्पा टप्पा करत तर कुणी भजन म्हणत, काही तर मौन पाळत भक्तिभावाने निघाले. अर्ध्यापेक्षा जास्त भक्त अनवाणी पायाने चालत होते. पहाटेच्या वेळेस थंड वारा मन उल्हासित करत होता. डोक्यामध्ये विचारचक्र चालू झाले होते. सारे जण साईच्या दर्शनासाठी उतावीळ झाले होते. रस्त्यात ठिकठिकाणी खिचडी, पोहे, पाणी वाटप केले जात होते.

टॅग्स :saibabaसाईबाबाSocialसामाजिक