शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

खाजगी दूध संकलकांना ‘अच्छे दिन’

By admin | Updated: May 27, 2017 23:49 IST

उस्मानाबाद : दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी वेळ, कमी पैशात हक्काचे पैसे देणारा पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाकडे पाहिले जाते.

विशाल सोनटक्के । लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी वेळ, कमी पैशात हक्काचे पैसे देणारा पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाकडे पाहिले जाते. या व्यवसायाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम करण्याचे काम केले आहे. मात्र मागील काही वर्षांत जिल्ह्यातील शासकीय आणि सहकारी केंद्रांना घरघर लागली असून, खाजगी दूध संकलकांना मात्र ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे. शासकीय केंद्रामध्ये प्रतिदिन ५२५, सहकारी केंद्रामध्ये प्रतिदिन ९ हजार ५३८ लिटर दुधाची प्रतिदिन हाताळणी होत असताना जिल्ह्यातील खाजगी संकलन केंद्राकडे मात्र दररोज सव्वाचार लाखांहून अधिक लिटर दुधाचे संकलन केले जात असल्याचे खुद्द शासकीय आकडेवारीच सांगते.सिंचनाचे मर्यादित क्षेत्र. त्यामुळे जिल्ह्यातील शेती पावसावरच अवलंबून आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळेच शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याची आवश्यकता आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात पशुधनाची संख्या चांगली आहे. जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ६८३ गाय वर्गाचे पशुधन आहे, तर १ लाख ७२ हजार ५६४ म्हैस वर्ग असून, १ लाख ७८ हजार ६६० एवढी शेळ्यांची संख्या आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक ८९ हजार ३५२ गायी भूम तालुक्यातील शेतकऱ्यांकडे असून, उस्मानाबाद तालुक्यातही ७७ हजार ३०६, तुळजापूर ५७ हजार ३७८, कळंब ८५ हजार ७७०, वाशी ५१ हजार ११६, परंडा ५६ हजार ७८३, लोहारा २७ हजार ४७, तर उमरगा तालुक्यात ४९ हजार ९३१ गायींची संख्या आहे. म्हैस वर्ग पशुधनाचा विचार केला असता, जिल्ह्यात सर्वाधिक म्हशी तुळजापूर तालुक्यात आहे. तेथे ४१ हजार ५१८ पशुधन आहे. त्या पाठोपाठ उस्मानाबाद तालुक्यातील शेतकरीही तब्बल ३९ हजार १२० म्हशींचे पालन करतात. कळंब तालुक्यात २० हजार ९७१, वाशी १० हजार २१९, भूम १२ हजार २७९, परंडा १० हजार ९९३, लोहारा १४ हजार ९२१, तर उमरगा तालुक्यातील शेतकरी २२ हजार ५४३ म्हशींचे संगोपन करतात. पशुधनाची ही संख्या पाहता जिल्ह्यात दुग्ध उत्पादन तसेच प्रक्रिया उद्योगाला मोठ्या संधी आहेत. मात्र याकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येते.