शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

‘गोल्डन ट्रँगल’ तीन यंत्रणांच्या कचाट्यात; मराठवाड्यासाठी घोषणा केलेल्या रस्त्यांची कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:24 IST

कोणती यंत्रणा कोणते काम करीत आहे, याचे उत्तर कुणीही देण्यास तयार नाही. 

ठळक मुद्दे- चौपदरीकरणाची कामे द्विपदरी 

औरंगाबाद : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्लॅनमधील सुमारे १४ हजार कोटींची कामे ‘पीडब्ल्यूडी’,‘एनएचएआय’ आणि ‘एमएसआरडीसी’कडे वर्ग केली. मात्र, ही कामे या सर्व विभागांच्या कचाट्यात अडकली आहेत. कोणती यंत्रणा कोणते काम करीत आहे, याचे उत्तर कुणीही देण्यास तयार नाही. 

चौपदरीकरणासाठी नियोजित केलेल्या रस्त्यांवर १० हजार वाहनांपेक्षा जास्त वाहतूक असूनही ते रस्ते द्विपदरी, तीनपदरी करण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या घोषणेला २५ डिसेंबर रोजी ३ वर्षे पूर्ण झाली. सदरील कामांवर एकत्रितपणे कोणत्याही संस्थेचे नियंत्रण नसल्यामुळे कुठे काय चालले आहे, हे काही समजण्यास मार्ग नाही. गोल्डन ट्रँगल कामांच्या घोषणेनंतर वर्षभरातच त्या कामांचे तुकडे पाडण्यात आले. सीआरएफ, एनएचएआय, पीडब्ल्यूडी आणि आता एमएसआरडीसी मिळून हा दळणवळण विकास कार्यक्रम राबविण्याचे ठरले असून, सर्व कामे प्रगतिपथावर असल्याचा दावा केला जात आहे. गडकरींच्या घोषणेतील बहुतांश रस्ते द्वि आणि तीनपदरीकरणात वर्ग केली आहेत. सोलापूर ते धुळे महामार्गदेखील आणखी एक ते दीड वर्ष पूर्ण होणे शक्य नाही. एमएसआरडीसीकडे वर्ग केलेली कामे प्रगतिपथावर आहेत. एनएचएआय आणि पीडब्ल्यूडीकडील कामांबाबत काही सांगता येणार नाही, असे एमएसआरडीसी सूत्रांनी सांगितले. 

कुणीच काही सांगेना१८ हजार कोटी रुपयांच्या अनेक रस्त्यांच्या कामांंची खिचडी झाली आहे. औरंगाबाद ते फुलंब्रीमार्गे सिल्लोड ते पहूर ते जळगाव हा १५५ कि़मी.चा १५५० कोटींचा रस्ता एमएसआरडीसीच्या यादीत आहे. औरंगाबाद ते सिल्लोड ते अजिंठा ते पहूरमार्गे जामनेर ते मुक्ताईनगर हा ४०१ कि़मी. रस्ता ४ हजार १० कोटींतून होईल, असे सांगण्यात आले. त्या कामाचे काय झाले, हे जाहीरपणे कुणीही सांगत नाही. औरंगाबाद ते वैजापूर ते नाशिक १८३ कि़मी. रस्ता १८३० कोटींतून होईल, असे सांगण्यात आले. त्याचे पुढे काय झाले, माहिती नाही. औरंगाबाद ते वैजापूर ते कोपरगावमार्गे शिर्डी हा १५० कि़मी. रस्ता १५०० कोटींतून होईल, असे जाहीर करण्यात आले. औरंगाबाद ते परभणी या १२५० कोटींच्या १२५ कि़मी. रस्त्याचा आहे. हाच रस्ता खामगांव ते सांगोला यामार्गे असून ४५०० कोटींतून ४५० कि़मी. तो रस्ता करण्याचे दाखविण्यात आले. ही कामे सुरू आहेत का? हे सांगण्यास संबंधित विभाग पुढे येत नाही, तर सेना-भाजपचे लोकप्रतिनिधी गप्प आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गAurangabadऔरंगाबाद