शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मातीतून निघालेले सोने मातीतच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 13:54 IST

जुई नदीकाठावरील शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

ठळक मुद्देअतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका 

- रघुनाथ सावळे

उंडणगाव (जि. औरंगाबाद) : सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरात तळहाताच्या फोडांप्रमाणे जगविलेली पिके अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत नदीच्या पुरात वाहून गेली. मातीतून निघालेले सोने मातीतच मिसळल्याने येथील बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, सध्या परिसरात प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू असले तरी आर्थिक मदत मिळणार कधी, याकडे हजारो शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

जवळपास २० दिवसांपासून परिसरात कधी रिमझिम तर कधी जोरदार वृष्टी झाल्याने येथील मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, ज्वारी आदी पिके हातातून गेली. सध्या येथील बहुतांश शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून, विशेषत: येथील जुई नदीकाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा अधिक फटका बसला आहे. नदीने रौद्ररूप धारण करून काठावरील मका, सोयाबीन, भाजीपाला ही सर्वच्या सर्व पिके आपल्या कवेत घेतल्याने बळीराजा अक्षरश: रस्त्यावर आला आहे.

उंडणगावसह खुल्लोड, विरगाव, वसई, जळकी, खंडाळा, मोहाळ आदी गावांत शेतकऱ्यांनी काढणी केलेले मक्याचे पीक अक्षरश: कुजले असून, कपाशीच्या कैऱ्यांना झाडावरच कोंब फुटले. तसेच सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मिरची, अद्रक आदी पिकांचे मातेरे झाले.  शेतांमध्ये पाणी साचलेले असल्याने येणाऱ्या रबी हंगामात पीक कसे येणार, या चिंतेत शेतकरी सापडला आहे.

गतवर्षी ११० क्विंटल पीक, यावर्षी मात्र हाती भोपळा उंडणगाव येथील महिला शेतकरी तान्हाबाई विठ्ठल नरवडे म्हणाल्या, गतवर्षी आम्ही मक्याचे ११० क्विंटल पीक घेतले होते. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने पूर्ण मका उद्ध्वस्त झाल्याने एक किलोभराही पीक शिल्लक राहिले नाही. याबाबत मक्यावर केलेला खर्चही निघणार नसल्याने पतीने या पिकासाठी घेतलेले कर्ज, उसनवारी कशी फेडणार याची सध्या चिंता आहे. 

नुकसानीचे आकडे मोठे परिसरातील जवळपास १०० टक्के पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानीचे आकडे हे खूपच मोठे आहेत. त्याचे गणित लावणे अशक्यच आहे. एकीकडे बळीराजा संकटात असताना महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचामुळे नुकसानभरपाई मिळेल किंवा नाही, याबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबादRainपाऊस