शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

मातीतून निघालेले सोने मातीतच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 13:54 IST

जुई नदीकाठावरील शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

ठळक मुद्देअतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका 

- रघुनाथ सावळे

उंडणगाव (जि. औरंगाबाद) : सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरात तळहाताच्या फोडांप्रमाणे जगविलेली पिके अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत नदीच्या पुरात वाहून गेली. मातीतून निघालेले सोने मातीतच मिसळल्याने येथील बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, सध्या परिसरात प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू असले तरी आर्थिक मदत मिळणार कधी, याकडे हजारो शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

जवळपास २० दिवसांपासून परिसरात कधी रिमझिम तर कधी जोरदार वृष्टी झाल्याने येथील मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, ज्वारी आदी पिके हातातून गेली. सध्या येथील बहुतांश शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून, विशेषत: येथील जुई नदीकाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा अधिक फटका बसला आहे. नदीने रौद्ररूप धारण करून काठावरील मका, सोयाबीन, भाजीपाला ही सर्वच्या सर्व पिके आपल्या कवेत घेतल्याने बळीराजा अक्षरश: रस्त्यावर आला आहे.

उंडणगावसह खुल्लोड, विरगाव, वसई, जळकी, खंडाळा, मोहाळ आदी गावांत शेतकऱ्यांनी काढणी केलेले मक्याचे पीक अक्षरश: कुजले असून, कपाशीच्या कैऱ्यांना झाडावरच कोंब फुटले. तसेच सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मिरची, अद्रक आदी पिकांचे मातेरे झाले.  शेतांमध्ये पाणी साचलेले असल्याने येणाऱ्या रबी हंगामात पीक कसे येणार, या चिंतेत शेतकरी सापडला आहे.

गतवर्षी ११० क्विंटल पीक, यावर्षी मात्र हाती भोपळा उंडणगाव येथील महिला शेतकरी तान्हाबाई विठ्ठल नरवडे म्हणाल्या, गतवर्षी आम्ही मक्याचे ११० क्विंटल पीक घेतले होते. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने पूर्ण मका उद्ध्वस्त झाल्याने एक किलोभराही पीक शिल्लक राहिले नाही. याबाबत मक्यावर केलेला खर्चही निघणार नसल्याने पतीने या पिकासाठी घेतलेले कर्ज, उसनवारी कशी फेडणार याची सध्या चिंता आहे. 

नुकसानीचे आकडे मोठे परिसरातील जवळपास १०० टक्के पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानीचे आकडे हे खूपच मोठे आहेत. त्याचे गणित लावणे अशक्यच आहे. एकीकडे बळीराजा संकटात असताना महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचामुळे नुकसानभरपाई मिळेल किंवा नाही, याबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबादRainपाऊस