शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्या मराठवाड्यासाठी गोदामायने घेतली धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 11:53 IST

नांदूर-मधमेश्वरमधून ५८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

ठळक मुद्देमराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नाशिकवरून गोदावरी, दारणा या नद्यांनी धाव घेतली

- अझहर शेख   

औरंगाबाद/नाशिक : मराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा खालावलेला असताना तहानलेल्या मराठवाड्यातील औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पुन्हा नाशिकवरून गोदावरी, दारणा या नद्यांनी धाव घेतली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबेकश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांत रविवारपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे भावली, दारणासह गंगापूर धरणातूनही हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदा-कादवा संगमावर असलेल्या नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्याचे पाचही दरवाजे मंगळवारी (दि.३०) उघडण्यात आले. हे सर्व पाणी जायकवाडीच्या दिशेने वेगाने जात आहे.रविवारपासून (दि.२८) इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. यामुळे इगतपुरीतील भावली धरण शंभर टक्के भरले असून, शनिवारपासून (दि.२७) ४८१ क्युसेकने त्यामधून विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच दारणामधूनही १ हजार क्युसेकने विसर्गाला प्रारंभ करण्यात आला. दारणाचा साठा ८५ टक्के झाला आहे.

मंगळवारी दारणामधून १३ हजार, गंगापूर धरणातून ८ हजार ८३३ आणि भावलीमधून ९४८ क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ५८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. एखाद्या समुद्राला भरती यावी आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांनी उंचच उंच उसळ्या घ्याव्या याप्रमाणे दृश्य नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यासमोर पहावयास मिळाले. प्रचंड वेगाने ५८ हजार क्युसेक (१६४ कोटी १९ लाख ८० हजार लिटर प्रति सेकंद) इतके पाणी जायकवाडीच्या दिशेने गोदापात्रातून प्रवाहित झाले आहे. दारणा, भावली गंगापूर धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात एकत्र येते. येथून हजारो क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात निश्चितच वाढ होणार आहे.

गोदावरीने गाठली धोक्याची पातळीगोदावरीमध्ये गंगापूरमधून मंगळवारी दुपारी ८ हजार ८३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच शहरातदेखील संततधार पहाटेपासून सुरू असल्यामुळे पंचवटी रामकुंडापासून पुढे नदीपात्रात ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी नदीपात्रात प्रवाहित झाले. त्यामुळे गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून, निफाड तालुक्यातील गोदाकाठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सायंकाळपर्यंत याच वेगाने विसर्ग सुरू होता. पाणलोटक्षेत्रात पाऊस वाढल्यास विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :godavariगोदावरीJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसMarathwadaमराठवाडा