शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्या मराठवाड्यासाठी गोदामायने घेतली धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 11:53 IST

नांदूर-मधमेश्वरमधून ५८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

ठळक मुद्देमराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नाशिकवरून गोदावरी, दारणा या नद्यांनी धाव घेतली

- अझहर शेख   

औरंगाबाद/नाशिक : मराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा खालावलेला असताना तहानलेल्या मराठवाड्यातील औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पुन्हा नाशिकवरून गोदावरी, दारणा या नद्यांनी धाव घेतली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबेकश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांत रविवारपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे भावली, दारणासह गंगापूर धरणातूनही हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदा-कादवा संगमावर असलेल्या नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्याचे पाचही दरवाजे मंगळवारी (दि.३०) उघडण्यात आले. हे सर्व पाणी जायकवाडीच्या दिशेने वेगाने जात आहे.रविवारपासून (दि.२८) इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. यामुळे इगतपुरीतील भावली धरण शंभर टक्के भरले असून, शनिवारपासून (दि.२७) ४८१ क्युसेकने त्यामधून विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच दारणामधूनही १ हजार क्युसेकने विसर्गाला प्रारंभ करण्यात आला. दारणाचा साठा ८५ टक्के झाला आहे.

मंगळवारी दारणामधून १३ हजार, गंगापूर धरणातून ८ हजार ८३३ आणि भावलीमधून ९४८ क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ५८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. एखाद्या समुद्राला भरती यावी आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांनी उंचच उंच उसळ्या घ्याव्या याप्रमाणे दृश्य नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यासमोर पहावयास मिळाले. प्रचंड वेगाने ५८ हजार क्युसेक (१६४ कोटी १९ लाख ८० हजार लिटर प्रति सेकंद) इतके पाणी जायकवाडीच्या दिशेने गोदापात्रातून प्रवाहित झाले आहे. दारणा, भावली गंगापूर धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात एकत्र येते. येथून हजारो क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात निश्चितच वाढ होणार आहे.

गोदावरीने गाठली धोक्याची पातळीगोदावरीमध्ये गंगापूरमधून मंगळवारी दुपारी ८ हजार ८३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच शहरातदेखील संततधार पहाटेपासून सुरू असल्यामुळे पंचवटी रामकुंडापासून पुढे नदीपात्रात ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी नदीपात्रात प्रवाहित झाले. त्यामुळे गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून, निफाड तालुक्यातील गोदाकाठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सायंकाळपर्यंत याच वेगाने विसर्ग सुरू होता. पाणलोटक्षेत्रात पाऊस वाढल्यास विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :godavariगोदावरीJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसMarathwadaमराठवाडा