शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

थरार ! ड्रेनेजच्या उघड्या चेंबरमध्ये पडला तरुण, २० फुटावरील दुसऱ्या चेंबरमधून काढले बाहेर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 12:38 IST

Rain in Aurangabad : जय भवानीनगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे या भागात झाली घटना

ठळक मुद्दे३० सेकंदाचा भयंकर थरार, दैव बलवत्तर म्हणून वाचला जीवदोन वर्षांपूर्वी याच पद्धतीने व्यक्तीचा मृत्यू

औरंगाबाद : शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातील उघड्या ड्रेनेज चेंबरमध्ये १८ वर्षीय पादचारी तरुण पडला. दक्ष नागरिकांनी अवघ्या ३० सेकंदात दुसऱ्या चेंबरमधून त्याला बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले. जयभवानीनगरात रात्री ८ वाजेच्या सुमारास घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.

जय भवानीनगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या १५० कोटी रुपयांच्या योजनेतून हे काम करण्यात येत आहे. जय भवानीनगर चौकात दरवर्षी पावसाळ्यात चारही बाजूने विविध वसाहतींमधील वाहून येणारे पाणी जमा होते. मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम आहे. रस्त्याचे काम करण्यापूर्वी येथे ६०० मि.मी. व्यासाची ड्रेनेजलाईन टाकण्यात येत आहे. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर चौकात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. मुख्य रस्त्यावरील उघडे ड्रेनेज चेंबर पाण्यात बुडाले. याच भागात राहणारा तरुण मोरेश प्रकाश सूळ (१८) हा पायी जात असताना अचानक या ड्रेनेज चेंबरमध्ये पडला. हे दृश्य परिसरात उभ्या नागरिकांनी बघितले. त्यांनी आरडाओरड करून मोरेश याला वाचविण्याचा प्रयत्न केला. २० फूट अंतरावरील दुसऱ्या चेंबरमधून त्याला बाहेर काढण्यात आले. नशीब बलवत्तर असल्याने मोरेश बालंबाल बचावला. अवघ्या तीस सेकंदाच्या घटनेने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.

दोन वर्षांपूर्वी याच पद्धतीने व्यक्तीचा मृत्यूदोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर राजकीय मंडळींनी प्रचंड टीकेची झोड उठवली; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आताही या भागात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पूल उभारण्याची मागणी करण्यात येत असताना फक्त दोन पाईप टाकून काम उरकण्याचा प्रयत्न मनपाकडून सुरू आहे, असा आरोप माजी नगरसेवक बालाजी मुंडे यांनी केला.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद