शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

थरार ! ड्रेनेजच्या उघड्या चेंबरमध्ये पडला तरुण, २० फुटावरील दुसऱ्या चेंबरमधून काढले बाहेर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 12:38 IST

Rain in Aurangabad : जय भवानीनगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे या भागात झाली घटना

ठळक मुद्दे३० सेकंदाचा भयंकर थरार, दैव बलवत्तर म्हणून वाचला जीवदोन वर्षांपूर्वी याच पद्धतीने व्यक्तीचा मृत्यू

औरंगाबाद : शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातील उघड्या ड्रेनेज चेंबरमध्ये १८ वर्षीय पादचारी तरुण पडला. दक्ष नागरिकांनी अवघ्या ३० सेकंदात दुसऱ्या चेंबरमधून त्याला बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले. जयभवानीनगरात रात्री ८ वाजेच्या सुमारास घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.

जय भवानीनगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या १५० कोटी रुपयांच्या योजनेतून हे काम करण्यात येत आहे. जय भवानीनगर चौकात दरवर्षी पावसाळ्यात चारही बाजूने विविध वसाहतींमधील वाहून येणारे पाणी जमा होते. मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम आहे. रस्त्याचे काम करण्यापूर्वी येथे ६०० मि.मी. व्यासाची ड्रेनेजलाईन टाकण्यात येत आहे. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर चौकात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. मुख्य रस्त्यावरील उघडे ड्रेनेज चेंबर पाण्यात बुडाले. याच भागात राहणारा तरुण मोरेश प्रकाश सूळ (१८) हा पायी जात असताना अचानक या ड्रेनेज चेंबरमध्ये पडला. हे दृश्य परिसरात उभ्या नागरिकांनी बघितले. त्यांनी आरडाओरड करून मोरेश याला वाचविण्याचा प्रयत्न केला. २० फूट अंतरावरील दुसऱ्या चेंबरमधून त्याला बाहेर काढण्यात आले. नशीब बलवत्तर असल्याने मोरेश बालंबाल बचावला. अवघ्या तीस सेकंदाच्या घटनेने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.

दोन वर्षांपूर्वी याच पद्धतीने व्यक्तीचा मृत्यूदोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर राजकीय मंडळींनी प्रचंड टीकेची झोड उठवली; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आताही या भागात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पूल उभारण्याची मागणी करण्यात येत असताना फक्त दोन पाईप टाकून काम उरकण्याचा प्रयत्न मनपाकडून सुरू आहे, असा आरोप माजी नगरसेवक बालाजी मुंडे यांनी केला.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद