शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

बकरीच्या 'विरुगीरी' ने सा-यांना थकवले; औरंगाबाद बाजार समितीमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 18:02 IST

जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत फळभाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी दुपारी एका शेळीने गच्चीवरुन पत्र्याच्या शेडवर उडी मारली आणि सारा गोंधळ उडाला. तिला वाचविण्यासाठी पाच ते सहा युवकांनी प्रयत्न सुरु केले पण ती कोणाच्या हातीच लागेना.

ठळक मुद्देजाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत फळभाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी दुपारी एका शेळीने गच्चीवरुन पत्र्याच्या शेडवर उडी मारली तासभर त्या शेळीने सर्वांना हुलकावणी देत शेडवर ईकडून तिकडे पळत राहिली अखरे तिला पकडण्यात युवकांना यश आले.

औरंगाबाद : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत फळभाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी दुपारी एका शेळीने गच्चीवरुन पत्र्याच्या शेडवर उडी मारली आणि सारा गोंधळ उडाला. तिला वाचविण्यासाठी पाच ते सहा युवकांनी प्रयत्न सुरु केले पण ती कोणाच्या हातीच लागेना. एवढेच नव्हे तर तिने उडी मारली तर तिला पकडण्यासाठी शेकडोजण खाली उभे होते.  तासभर त्या शेळीने सर्वांना हुलकावणी देत शेडवर ईकडून तिकडे पळत राहिली अखरे तिला पकडण्यात युवकांना यश आले. आणि शेळीला सुखरुप दुकानांच्या गच्चीवरुन खाली आणण्यात आले. मात्र, यानिमित्ताने जमलेल्या व्यापा-यांना  शोले चित्रपटातील ‘वीरूगिरी’ची आठवण झाली. 

जाधववाडीत फळभाजीपाल्याचा आडत बाजारात फेकून दिलेल्या फळभाज्या खाण्यासाठी शेकडो मोकाट जनावरे फिरत असतात. म्हशी,बैल, गायी व शेळ्यांचा त्यात समावेश असतो. येथील आडत दुकानांच्यासमोर ओट्यावर शेतीमाल ठेवण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत.  शनिवारी  दुपारी ११ ते ११.१५ वाजेच्या सुमारास दुकाननंबर १११ व ११२ च्या वरील पत्र्याच्या शेडवर मोठा आवाज आला. यामुळे घाबरलेल्या व्यापारी व हमालांनी दुकानाच्या बाहेर धाव घेतली. तर त्यांना शेडवर बकरी  दिसून आली. ही बकरी जिन्यामधून  गच्चीवर गेली होती. गच्चीवरील भिंतीवर चढून तिने दुकानासमोरील पत्र्याच्या शेडवर उडी मारली. मात्र, तिथून तिला खाली उडी मारता येईना व भिंतीची उंची जास्त असल्याने तिथेही चढता येईना.

तिला वाचविण्यासाठी पाच ते सहा युवक गच्चीवर गेले. आधीच घाबरलेल्या शेळीने मग पत्र्यावरुन पळणे सुरु केले आणि पुन्हा दुकाननंबर ११२ पर्यंत आली तिथे पुढे  नव्हता पत्र्याच्या काठावर येऊन तिने ओरडने सुरु केले. खाली तिला वाचविण्यासाठी तो पर्यंत शेकडो लोक जमा झाले होते. वरतून ती खाली पडली तर काही जणांनी तिला वरतीच झेलण्याची तयारीही केली होती. तोपर्यंत दोन युवक शेडवर चढले त्यांना पाहून शेळी पुन्हा शेडवरून ईकडून-तिकडे पळू लागली. त्यात ती अनेकदा पत्र्याच्या काठावर येऊन थबकत होती.   खाली उडी मारते की काय, या भीतीने अनेकांची हृदयाचे ठोके वाढले होते. अखेर १२.०५ वाजेदरम्यान चार युवकांनी तिला पकडले व सुखरुप खाली आणून सोडले. उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला. 

आत्महत्या करायला ती काय मनुष्य आहे ? पत्र्याच्या शेडवर पडलेल्या बकरीला वाचविण्यासाठी काही युवक प्रयत्न करीत होते तेव्हा ति अनेकदा पळता-पळता शेडच्या काठावर येऊन थांबत होती. खाली उभे असणा-या अनेकांना ति  खाली पडते काय अशी भीती वाटत होती. त्यातही  कॉमेंटबाजी झाली. एक जण म्हटला ‘वह आदमी थोडी है क्या कुदने के लिए.’ दुसरा म्हणाला ‘ वह जान नही देंगी’.  तिसरा म्हणाला ‘जान तो आदमी देता है व बकरी हर हलात मे जिने का सोचेगी’ या कॉमेंटमुळे उपस्थितांमध्ये हास्य पिकले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद