शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जा बेटा...बदला घेऊनच परत ये; सुटीवर आलेल्या जवानाला आई-वडिलांनी तात्काळ केले रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 13:10 IST

सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील कौतिक काशीनाथ पांढरे यांची दोन मुले सैन्यात आहेत.

ठळक मुद्देहल्ल्याच्या ३ दिवसांपूर्वीच अविनाश हा सुटीवर गावी आला होता. देशभक्त आई-वडिलांनी सीमेवर जाण्यास सांगितले  ग्रामस्थांनी मिरवणूक काढून पाठविले सीमेवर

- कैलास पांढरे । 

औरंगाबाद : पुलवामा हल्ल्याची बातमी कळताच सुटी घेऊन गावी आलेल्या जवानाला त्याच्या आई-वडिलांनी सुटी न भोगता चक्क देशरक्षणासाठी कर्तव्यस्थळी जाण्याचा आग्रह केला. या जवानानेही आपल्या ४४ बांधवांच्या मृत्यूमुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लगेच गाव सोडले. जा बेटा जा...बदला घेऊनच परत ये, असे म्हणून आई -वडिलांसह गावकऱ्यांनी या जवानाला सत्कार करुन सीमेवर रवाना केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथे रविवारी घडली.

सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील कौतिक काशीनाथ पांढरे यांना चार मुले असून यातील दोन मुले सैन्यात आहेत. सुधाकर हा २००९ मध्ये सीआरपीएफमध्ये  भरती झाला, तर अविनाश हा २०१५ मध्ये भरती झाला. सुधाकर सध्या ओडिशामध्ये, तर अविनाश हा जम्मूमधील नौसेरा सेक्टरमध्ये देशसेवेसाठी अहोरात्र झटत आहे. हल्ल्याच्या ३ दिवसांपूर्वीच अविनाश हा सुटीवर गावी आला होता. आठ -दहा दिवस गावाकडे राहून परिवारासोबत आपली सुटी घालवायच्या इराद्याने आलेल्या अविनाशला हल्ल्याची खबर लागली. त्याच्या वडिलांनी अविनाशला कडाडून मिठी मारुन ‘बेटा अवी, तुला आता ड्युटीवर हजर व्हायला पाहिजे’ असे म्हणून रवाना होण्यास सांगितले. 

वडिलांच्या निर्णयाचे ग्रामस्थांनी भरभरुन कौतुक केले. ग्रामस्थांनी अविनाशची गावातून मिरवणूक काढून देशभक्तीपर घोषणा दिल्या व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून अविनाशचा हौसला बुलंद केला. यावेळी महिलांनीही अविनाशचे औक्षण करुन देशसेवेसाठी आशीर्वाद दिला. सध्या देशावर संकट आले असून मी माझी दोन्ही मुले देशसेवेसाठी अर्पण केली असून अशा परिस्थितीत सुटी भोगण्यापेक्षा देशरक्षणासाठी जाणे महत्त्वाचे आहे, असे सांगताना अविनाशच्या वडिलांना गहिवरुन आले होते. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंतून देशभक्तीची ज्योत तेजावत होती. हे दृश्य पाहून गावात देशभक्तीची लाट आली होती. अविनाशने सर्वांचा  निरोप घेऊन रविवारी रात्रीच गाव सोडले व तो सीमेवर लढण्यासाठी रवाना झाला.

दोन महिन्यांपूर्वीच झाला साखरपुडा अविनाशचा दोन महिन्यांपूर्वीच कन्नड तालुक्यातील पळशी येथील खोटे परिवारातील तरुणीशी साखरपुडा झाला असून जेव्हा मोठी सुटी मिळेल तेव्हाच त्यांचा शुभविवाह ठरविला जाईल, असे अविनाशच्या वडिलांनी सांगितले.

पहा व्हिडिओ :

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाBorderसीमारेषाSoldierसैनिकAurangabadऔरंगाबाद