शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

जा बेटा...बदला घेऊनच परत ये; सुटीवर आलेल्या जवानाला आई-वडिलांनी तात्काळ केले रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 13:10 IST

सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील कौतिक काशीनाथ पांढरे यांची दोन मुले सैन्यात आहेत.

ठळक मुद्देहल्ल्याच्या ३ दिवसांपूर्वीच अविनाश हा सुटीवर गावी आला होता. देशभक्त आई-वडिलांनी सीमेवर जाण्यास सांगितले  ग्रामस्थांनी मिरवणूक काढून पाठविले सीमेवर

- कैलास पांढरे । 

औरंगाबाद : पुलवामा हल्ल्याची बातमी कळताच सुटी घेऊन गावी आलेल्या जवानाला त्याच्या आई-वडिलांनी सुटी न भोगता चक्क देशरक्षणासाठी कर्तव्यस्थळी जाण्याचा आग्रह केला. या जवानानेही आपल्या ४४ बांधवांच्या मृत्यूमुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लगेच गाव सोडले. जा बेटा जा...बदला घेऊनच परत ये, असे म्हणून आई -वडिलांसह गावकऱ्यांनी या जवानाला सत्कार करुन सीमेवर रवाना केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथे रविवारी घडली.

सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील कौतिक काशीनाथ पांढरे यांना चार मुले असून यातील दोन मुले सैन्यात आहेत. सुधाकर हा २००९ मध्ये सीआरपीएफमध्ये  भरती झाला, तर अविनाश हा २०१५ मध्ये भरती झाला. सुधाकर सध्या ओडिशामध्ये, तर अविनाश हा जम्मूमधील नौसेरा सेक्टरमध्ये देशसेवेसाठी अहोरात्र झटत आहे. हल्ल्याच्या ३ दिवसांपूर्वीच अविनाश हा सुटीवर गावी आला होता. आठ -दहा दिवस गावाकडे राहून परिवारासोबत आपली सुटी घालवायच्या इराद्याने आलेल्या अविनाशला हल्ल्याची खबर लागली. त्याच्या वडिलांनी अविनाशला कडाडून मिठी मारुन ‘बेटा अवी, तुला आता ड्युटीवर हजर व्हायला पाहिजे’ असे म्हणून रवाना होण्यास सांगितले. 

वडिलांच्या निर्णयाचे ग्रामस्थांनी भरभरुन कौतुक केले. ग्रामस्थांनी अविनाशची गावातून मिरवणूक काढून देशभक्तीपर घोषणा दिल्या व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून अविनाशचा हौसला बुलंद केला. यावेळी महिलांनीही अविनाशचे औक्षण करुन देशसेवेसाठी आशीर्वाद दिला. सध्या देशावर संकट आले असून मी माझी दोन्ही मुले देशसेवेसाठी अर्पण केली असून अशा परिस्थितीत सुटी भोगण्यापेक्षा देशरक्षणासाठी जाणे महत्त्वाचे आहे, असे सांगताना अविनाशच्या वडिलांना गहिवरुन आले होते. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंतून देशभक्तीची ज्योत तेजावत होती. हे दृश्य पाहून गावात देशभक्तीची लाट आली होती. अविनाशने सर्वांचा  निरोप घेऊन रविवारी रात्रीच गाव सोडले व तो सीमेवर लढण्यासाठी रवाना झाला.

दोन महिन्यांपूर्वीच झाला साखरपुडा अविनाशचा दोन महिन्यांपूर्वीच कन्नड तालुक्यातील पळशी येथील खोटे परिवारातील तरुणीशी साखरपुडा झाला असून जेव्हा मोठी सुटी मिळेल तेव्हाच त्यांचा शुभविवाह ठरविला जाईल, असे अविनाशच्या वडिलांनी सांगितले.

पहा व्हिडिओ :

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाBorderसीमारेषाSoldierसैनिकAurangabadऔरंगाबाद