शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजियमकडून औरंगाबादच्या ॲड. किशाेर संतांची हायकोर्टात न्यायमूर्तीपदासाठी शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 12:53 IST

कुटुंबातील पहिले विधिज्ञ असलेले ॲड. किशोर संत बनणार उच्च न्यायालयात न्यायमूर्ती

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठातील ॲड. किशोर चंद्रकांत संत हे त्यांच्या कुटुंबातील विधि शाखेचे पहिलेच पदवीधर. त्यांनी पदवी घेतल्यानंतर औरंगाबादेत व्यवसाय सुरू केला. तब्बल ३० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी शिफारस केली आहे. त्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यानंतर ते उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होणार आहेत.

ॲड. संत हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण दिंडोरीतील जिल्हा परिषद आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण नाशिक येथील एचपीटी कॉलेज येथे झाले. त्यानंतर एनबीटी विधि महाविद्यालयातून त्यांनी पदवी पूर्ण केली. १९९१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रॅक्टिससाठी आले. खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ प्रवीण मंडलिक यांच्याकडे उमेदवारी सुरू केली. त्यानंतर निवृत्त न्यायाधीश भीमराव नाईक यांच्याकडे मुंबईला ज्युनियरशिप केली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव विद्यमान ज्येष्ठ विधिज्ञ विनीत नाईक यांच्याकडे उमेदवारी केली. १९९५ ला ते पुन्हा औरंगाबादला आले. तेव्हापासून औरंगाबाद खंडपीठात वकिली करीत आहेत. त्यांच्या पत्नी नीलिमा संत सध्या जालना येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या पीठासीन अधिकारी आहेत. 

ॲड. संत हे बिंदुमाधव जोशी यांनी स्थापन केलेल्या ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष होते. तसेच नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाबार्डचे मुंबई उच्च न्यायालयातील वकील, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मॅट आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत. महाराष्ट्र लॉ जर्नलच्या संपादकीय मंडळावर गेली २० वर्षे ते काम करीत आहेत. त्यांना दोन मुले असून, एका मुलाने विधि शाखेचे शिक्षण पूर्ण केले आहे. दुसरा मुलगा १२वीत आहे.

बी.एन. देशमुख आदर्शऔरंगाबादेत वकिली करताना न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांनी माझ्यासारख्या नवख्यांना खूप मदत केली. ते आमच्यासाठी आदर्श होते. त्याशिवाय बारच्या सदस्यांचाही आजच्या निवडीमध्ये मोठा वाटा आहे. त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच इथपर्यंतचा प्रवास झाला असल्याची प्रतिक्रिया ॲड. किशोर संत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

हजारो प्रकरणे निकालीॲड. संत यांनी लोक अदालतमध्ये आतापर्यंत हजारो प्रकरणे समन्वयाने निकाली काढली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक प्रकरणे ही महसूलच्या संदर्भातील होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ