शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कॉलेजियमकडून औरंगाबादच्या ॲड. किशाेर संतांची हायकोर्टात न्यायमूर्तीपदासाठी शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 12:53 IST

कुटुंबातील पहिले विधिज्ञ असलेले ॲड. किशोर संत बनणार उच्च न्यायालयात न्यायमूर्ती

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठातील ॲड. किशोर चंद्रकांत संत हे त्यांच्या कुटुंबातील विधि शाखेचे पहिलेच पदवीधर. त्यांनी पदवी घेतल्यानंतर औरंगाबादेत व्यवसाय सुरू केला. तब्बल ३० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी शिफारस केली आहे. त्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यानंतर ते उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होणार आहेत.

ॲड. संत हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण दिंडोरीतील जिल्हा परिषद आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण नाशिक येथील एचपीटी कॉलेज येथे झाले. त्यानंतर एनबीटी विधि महाविद्यालयातून त्यांनी पदवी पूर्ण केली. १९९१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रॅक्टिससाठी आले. खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ प्रवीण मंडलिक यांच्याकडे उमेदवारी सुरू केली. त्यानंतर निवृत्त न्यायाधीश भीमराव नाईक यांच्याकडे मुंबईला ज्युनियरशिप केली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव विद्यमान ज्येष्ठ विधिज्ञ विनीत नाईक यांच्याकडे उमेदवारी केली. १९९५ ला ते पुन्हा औरंगाबादला आले. तेव्हापासून औरंगाबाद खंडपीठात वकिली करीत आहेत. त्यांच्या पत्नी नीलिमा संत सध्या जालना येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या पीठासीन अधिकारी आहेत. 

ॲड. संत हे बिंदुमाधव जोशी यांनी स्थापन केलेल्या ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष होते. तसेच नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाबार्डचे मुंबई उच्च न्यायालयातील वकील, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मॅट आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत. महाराष्ट्र लॉ जर्नलच्या संपादकीय मंडळावर गेली २० वर्षे ते काम करीत आहेत. त्यांना दोन मुले असून, एका मुलाने विधि शाखेचे शिक्षण पूर्ण केले आहे. दुसरा मुलगा १२वीत आहे.

बी.एन. देशमुख आदर्शऔरंगाबादेत वकिली करताना न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांनी माझ्यासारख्या नवख्यांना खूप मदत केली. ते आमच्यासाठी आदर्श होते. त्याशिवाय बारच्या सदस्यांचाही आजच्या निवडीमध्ये मोठा वाटा आहे. त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच इथपर्यंतचा प्रवास झाला असल्याची प्रतिक्रिया ॲड. किशोर संत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

हजारो प्रकरणे निकालीॲड. संत यांनी लोक अदालतमध्ये आतापर्यंत हजारो प्रकरणे समन्वयाने निकाली काढली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक प्रकरणे ही महसूलच्या संदर्भातील होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ