शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजियमकडून औरंगाबादच्या ॲड. किशाेर संतांची हायकोर्टात न्यायमूर्तीपदासाठी शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 12:53 IST

कुटुंबातील पहिले विधिज्ञ असलेले ॲड. किशोर संत बनणार उच्च न्यायालयात न्यायमूर्ती

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठातील ॲड. किशोर चंद्रकांत संत हे त्यांच्या कुटुंबातील विधि शाखेचे पहिलेच पदवीधर. त्यांनी पदवी घेतल्यानंतर औरंगाबादेत व्यवसाय सुरू केला. तब्बल ३० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी शिफारस केली आहे. त्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यानंतर ते उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होणार आहेत.

ॲड. संत हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण दिंडोरीतील जिल्हा परिषद आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण नाशिक येथील एचपीटी कॉलेज येथे झाले. त्यानंतर एनबीटी विधि महाविद्यालयातून त्यांनी पदवी पूर्ण केली. १९९१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रॅक्टिससाठी आले. खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ प्रवीण मंडलिक यांच्याकडे उमेदवारी सुरू केली. त्यानंतर निवृत्त न्यायाधीश भीमराव नाईक यांच्याकडे मुंबईला ज्युनियरशिप केली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव विद्यमान ज्येष्ठ विधिज्ञ विनीत नाईक यांच्याकडे उमेदवारी केली. १९९५ ला ते पुन्हा औरंगाबादला आले. तेव्हापासून औरंगाबाद खंडपीठात वकिली करीत आहेत. त्यांच्या पत्नी नीलिमा संत सध्या जालना येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या पीठासीन अधिकारी आहेत. 

ॲड. संत हे बिंदुमाधव जोशी यांनी स्थापन केलेल्या ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष होते. तसेच नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाबार्डचे मुंबई उच्च न्यायालयातील वकील, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मॅट आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत. महाराष्ट्र लॉ जर्नलच्या संपादकीय मंडळावर गेली २० वर्षे ते काम करीत आहेत. त्यांना दोन मुले असून, एका मुलाने विधि शाखेचे शिक्षण पूर्ण केले आहे. दुसरा मुलगा १२वीत आहे.

बी.एन. देशमुख आदर्शऔरंगाबादेत वकिली करताना न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांनी माझ्यासारख्या नवख्यांना खूप मदत केली. ते आमच्यासाठी आदर्श होते. त्याशिवाय बारच्या सदस्यांचाही आजच्या निवडीमध्ये मोठा वाटा आहे. त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच इथपर्यंतचा प्रवास झाला असल्याची प्रतिक्रिया ॲड. किशोर संत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

हजारो प्रकरणे निकालीॲड. संत यांनी लोक अदालतमध्ये आतापर्यंत हजारो प्रकरणे समन्वयाने निकाली काढली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक प्रकरणे ही महसूलच्या संदर्भातील होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ