शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

मुलींनो तुमची सुरक्षा आता तुमच्याच हाती; वसतिगृहात गृहपाल, महिला सुरक्षारक्षकच नाहीत

By विजय सरवदे | Updated: July 24, 2023 12:59 IST

जिल्ह्यात १९ पैकी मुलींची ९ वसतिगृहे असून, कुठेही महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आल्याचे दिसत नाही.

छत्रपती संभाजीनगर : संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचे समाज कल्याण आयुक्तांचे आदेश आहेत. जिल्ह्यात १९ पैकी मुलींची ९ वसतिगृहे असून, कुठेही महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आल्याचे दिसत नाही. एवढेच नव्हे, तर गृहापालांनी वसतिगृहांमध्येच राहावे, हा निकषही गुंडाळून ठेवला जात असल्याचे चित्र आहे.

शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलींना निवासाची अडचण असते. बाहेर खोली घेऊन राहावे, तर सुरक्षेची हमी नसल्यामुळे पालक आपल्या मुलींना वसतिगृहालाच प्राधान्य देतात. इयत्ता दहावीपासून उच्च शिक्षणापर्यंत तसेच व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना समाज कल्याण वसतिगृहांत गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. सध्या या वसतिगृहांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली आहे. ३१ जुलै ही ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत आहे. असे असले तरी यापूर्वी प्रवेशित विद्यार्थी- विद्यार्थिनी वसतिगृहात राहात आहेत.

गेल्या महिन्यात मुंबईतील चर्नी रोड येथे सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात विद्यार्थिनीची हत्या झाल्याने मुलींच्या वसतिगृहांसाठी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे समाज कल्याण आयुक्तांनी राज्यातील प्रामुख्याने मुलींच्या शासकीय वसतिगृहांत महिला सुरक्षा नेमण्याचे आदेश जिल्हास्तरीय कार्यरत समाज कल्याण सहायक आयुक्तांना दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सहायक आयुक्तांनी चार-पाच दिवसांपूर्वी यासंदर्भात गृहपालांना तशा सूचना केल्या असल्याचे कार्यालयीन सूत्रांनी सांगितले. याबाबतच खातरजमा करण्यासाठी समाज कल्याण विभागाचेे सहायक आयुक्त पी. बी. वाबळे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, उपलब्ध झाले नाहीत. 

गृहपालांनी नेमून दिलेल्या वसतिगृहांच्या ठिकाणी राहाणे बंधनकारक आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांना कळतील व त्याचे वेळेत निराकरण होईल, असा त्यामागचा हेतू आहे. मात्र, अनेक वसतिगृहांत गृहपाल राहात नाहीत. जिल्ह्यात गृहपालांची अनेक पदे रिक्त असून, एकेकाकडे दोन-दोन, तीन-तीन वसतिगृहांचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. त्यानुसार त्यांना वसतिगृहात राहाण्याबाबतचे वेळापत्रक नेमून दिले आहे. पण, वेळापत्रकाची अंमलबजावणी होते का, हे पाहायला देखील या विभागाला वेळ नाही.

कुठे कोणती वसतिगृहे?जिल्ह्यात समाज कल्याण विभागाची १९ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून, यात छत्रपती संभाजीनगर शहरात मुलांसाठी (कंसात मुलींची वसतिगृहे) ७ (४), वैजापूर- १ (१), कन्नड- १ (१), पैठण- १, सिल्लोड- (१), गंगापूर- (१) आणि वाळूज येथे एक असे मुलांसाठी १०, तर मुलींची ९ वसतिगृहे आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी