शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुलींनो तुमची सुरक्षा आता तुमच्याच हाती; वसतिगृहात गृहपाल, महिला सुरक्षारक्षकच नाहीत

By विजय सरवदे | Updated: July 24, 2023 12:59 IST

जिल्ह्यात १९ पैकी मुलींची ९ वसतिगृहे असून, कुठेही महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आल्याचे दिसत नाही.

छत्रपती संभाजीनगर : संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचे समाज कल्याण आयुक्तांचे आदेश आहेत. जिल्ह्यात १९ पैकी मुलींची ९ वसतिगृहे असून, कुठेही महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आल्याचे दिसत नाही. एवढेच नव्हे, तर गृहापालांनी वसतिगृहांमध्येच राहावे, हा निकषही गुंडाळून ठेवला जात असल्याचे चित्र आहे.

शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलींना निवासाची अडचण असते. बाहेर खोली घेऊन राहावे, तर सुरक्षेची हमी नसल्यामुळे पालक आपल्या मुलींना वसतिगृहालाच प्राधान्य देतात. इयत्ता दहावीपासून उच्च शिक्षणापर्यंत तसेच व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना समाज कल्याण वसतिगृहांत गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. सध्या या वसतिगृहांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली आहे. ३१ जुलै ही ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत आहे. असे असले तरी यापूर्वी प्रवेशित विद्यार्थी- विद्यार्थिनी वसतिगृहात राहात आहेत.

गेल्या महिन्यात मुंबईतील चर्नी रोड येथे सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात विद्यार्थिनीची हत्या झाल्याने मुलींच्या वसतिगृहांसाठी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे समाज कल्याण आयुक्तांनी राज्यातील प्रामुख्याने मुलींच्या शासकीय वसतिगृहांत महिला सुरक्षा नेमण्याचे आदेश जिल्हास्तरीय कार्यरत समाज कल्याण सहायक आयुक्तांना दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सहायक आयुक्तांनी चार-पाच दिवसांपूर्वी यासंदर्भात गृहपालांना तशा सूचना केल्या असल्याचे कार्यालयीन सूत्रांनी सांगितले. याबाबतच खातरजमा करण्यासाठी समाज कल्याण विभागाचेे सहायक आयुक्त पी. बी. वाबळे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, उपलब्ध झाले नाहीत. 

गृहपालांनी नेमून दिलेल्या वसतिगृहांच्या ठिकाणी राहाणे बंधनकारक आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांना कळतील व त्याचे वेळेत निराकरण होईल, असा त्यामागचा हेतू आहे. मात्र, अनेक वसतिगृहांत गृहपाल राहात नाहीत. जिल्ह्यात गृहपालांची अनेक पदे रिक्त असून, एकेकाकडे दोन-दोन, तीन-तीन वसतिगृहांचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. त्यानुसार त्यांना वसतिगृहात राहाण्याबाबतचे वेळापत्रक नेमून दिले आहे. पण, वेळापत्रकाची अंमलबजावणी होते का, हे पाहायला देखील या विभागाला वेळ नाही.

कुठे कोणती वसतिगृहे?जिल्ह्यात समाज कल्याण विभागाची १९ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून, यात छत्रपती संभाजीनगर शहरात मुलांसाठी (कंसात मुलींची वसतिगृहे) ७ (४), वैजापूर- १ (१), कन्नड- १ (१), पैठण- १, सिल्लोड- (१), गंगापूर- (१) आणि वाळूज येथे एक असे मुलांसाठी १०, तर मुलींची ९ वसतिगृहे आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी