शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन प्रेयसीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 17:32 IST

रेल्वेस्टेशन रस्त्यावरील अयोध्यानगरी मैदानावर घडला प्रकार

ठळक मुद्देएक महिन्यानंतर फिर्याद 

औरंगाबाद : तरुणाने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन प्रेयसीवर कारमध्ये बलात्कार केल्याची घटना २९ आॅक्टोबर रोजी क्रांतीचौक परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेने २५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. विक्की गोपाल राठोड (२५, रा.पद्मपाणी कॉलनी), असे गुन्हा नोंद झालेल्या प्रियकर तरुणाचे नाव आहे. विक्की राठोडच्या नातेवाईकाची रेल्वेस्टेशन परिसरात हॉटेल आहे. सहा महिन्यांपूर्वी २८ वर्षीय तरुणी नातेवाईकांसह जेवण्यासाठी गेली होती. तेव्हा विक्की त्यांना भेटला होता. यावेळी विक्कीने तरुणीला त्याचे कार्ड दिले आणि त्यांची हॉटेल घरपोच डिलिव्हरी देते, असे सांगितले होते. 

विक्कीच्या मोबाईलवरून पीडितेने जेवणाची आॅर्डर दिली होती. यामुळे तिचा मोबाईल नंबरही त्याच्याकडे गेला होता. तेव्हापासून ते तिच्याशी सतत बोलत. यानंतर त्यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यावेळी पीडितेने त्याला आपल्या प्रेमाचे भविष्य काय, असे विचारले असता त्याने तिला लग्न करणार असे सांगितले होते. २९ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजता विक्कीने पीडितेला क्रांती चौकाजवळील खाऊ गल्ली येथे भेटायला बोलावले. पीडिता तेथे दुचाकीने गेल्यानंतर आरोपीने तिला त्याच्या कारमध्ये बसविले. यानंतर त्याने मोकळ्या मैदानावर कार नेऊन उभी केली. तेथे त्याने तिला शीतपेय पिण्यास दिले. 

शीतपेय घेतल्यानंतर तिला गुंगी आल्यावर विक्कीने तिच्यावर कारमध्येच अत्याचार केला. अर्धवट बेशुद्ध तरुणीला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने विक्कीच्या कानशिलात लगावली आणि याविषयी जाब विचारला. तेव्हा त्याने तिच्यासोबत लवकरच लग्न करणार असल्याचे सांगून तिला गप्प केले. यानंतर त्याने तिला वेळोवेळी भेटायला बोलावून आणि लग्नाचे आमिष दाखवून रेल्वेस्टेशन रस्त्यावरील अयोध्यानगरी मैदानावर कारमध्ये बसून नेऊन अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. 

लग्न केल्यानंतर घरात घेण्यास नकारपीडितेने आरोपीकडे लग्नाचा तगादा लावल्यानंतर गारखेडा परिसरात एकेठिकाणी ५ नोव्हेंबर रोजी आर्यसमाज पद्धतीने लग्न केले. यानंतर त्याने पीडितेला तिच्या आई-वडिलांच्या घरी नेऊन सोडले आणि घरातील नातेवाईकांना लग्न केल्याचे सांगून तुला नेण्यासाठी येतो असे म्हणाला. दुसऱ्या दिवशी त्याने फोन करून आपले लग्न नातेवाईकांना मान्य नसल्याचे सांगितले.