शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गायरान जमिनीसाठी तहसीलदारांना घेराव

By admin | Updated: June 1, 2014 00:27 IST

परंडा : शासनाने तालुक्यातील सोनगिरी येथील गायरान जमीन कसण्यासाठी द्यावी, अशी मागणी करीत पारधी समाजातील महिला पुरुषांनी येथील प्रभारी तहसीलदार पाडळे यांना घेराव घातला.

परंडा : कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी शासनाने तालुक्यातील सोनगिरी येथील गायरान जमीन कसण्यासाठी द्यावी, अशी मागणी करीत पारधी समाजातील महिला पुरुषांनी येथील प्रभारी तहसीलदार एस. एस. पाडळे यांना शनिवारी घेराव घातला. तसेच २ जूनपर्यंत याबाबत निर्णय नाही झाल्यास तहसीलसमोर उपोषणाचा इशाराही यावेळी देण्यात आला. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास तहसील कार्यालयात पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने छायाचित्रासह मतदार याद्यांच्या निरंतर मतदार नोदणीसबंधी बैठक सुरू होती. याचवेळी पारधी समाजातील चितरंग्या वांग्या पवार, राहूल चितरंग्या पवार, गणेश चितरंग्या पवार, मनिबाई चितरंग्या पवार, उषाबाई येवरड्या पवार, रुपाली राहुल पवार, गुड्डी गणेश पवार, चिवळाबाई तयाशा काळे, माधुरी काळे यांनी तहसीलदारांच्या दालनात प्रवेश केला. यावेळी त्यांनी ‘अम्हाला जगू द्या, अम्हाला जगण्याची संधी द्या,’ अशी घोषणाबाजी करीत सोनगिरी येथील गायरान जमीन कसण्यासाठी देण्याची मागणी केली. यावेळी पारधी समाजातील महिलांनी प्रभारी तहसीलदार एस. एस. पाडळे यांना घेराव घालून तब्बल अर्धा तास बैठकीचे कामकाज रोखून ठेवले. निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार कुलकर्णी, समाजसेवक तु. दा. गंगावणे यांनी मध्यस्थी करुन आंदोलनकर्त्याना शांत केले. रितसर लेखी निवेदन द्या, यावर विचार केला जाईल. आपले म्हणणे शासनाकडे कळवू, असे अश्वासन प्रभारी तहसीलदार पाडळे यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले. दरम्यान, प्रशासनाने २ जूनपर्यत जमीन न दिल्यास तहसीलसमोर मुला-बाळासह व जनावरांसह बेमुदत अमरण उमोषणास बसणार असल्याचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिले. यावर नऊ जणांच्या सह्या आहेत. (वार्ताहर) संसारोपयोगी वस्तू परत करण्याची मागणी २२ मे रोजी सोनगिरी येथील गायरान जमिनीमधील अतिक्रमण काढल्यानतंर प्रशासनाने संसारोपयोगी वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. त्याही परत मिळाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. यावर सदरील वस्तू सोनगिरी ग्रामपंचयातीच्या ताब्यात असून, त्या परत करण्याच्या सूचना ग्रामसेवकास दिल्या जातील, असे पाडळे यांनी सांगितले. जमिनीचा फेरफार ग्रामपंचायतीच्या नावे याबाबत बोलताना प्रभारी तहसीलदार एस. एस. पाडळे म्हणाले, सोनगिरी येथील गायरान जमीन ही ग्रामपंचयातीच्या मालकी हक्कास अनुसरुन आहे. या जमिनीचा फेरफार दस्त ग्रामपंचयातीच्या नावे आहे. यामुळे त्यावर अतिक्रमण करणे कायदेशीररित्या उचित नाही. निवेदनधारकांच्या मागण्या शासनास कळविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.