शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला जाणे आता अजून सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 18:44 IST

एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली असून दि. १५  ऑक्टोबरपासून  आठवड्यातून ४ दिवस हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेणार आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.

औरंगाबाद : एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही मुंबई-औरंगाबाद-मुंबईविमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली असून दि. १५  ऑक्टोबरपासून  आठवड्यातून ४ दिवस हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेणार आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.

१९ जूनपासून इंडिगोने सर्वप्रथम औरंगाबादहून दिल्लीसाठी विमानसेवा सुरु केली. त्यानंतर इंडिगोने १५ जुलैपासून हैद्राबादसाठी विमानसेवा सुरू केली. सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबई विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन इंडिगोने केले होते. परंतु स्लॉटच्या कारणावरून ही विमानसेवा सुरू होणे लांबणीवर पडले होते. मात्र आता ही प्रतिक्षा संपून दि. १५ ऑक्टोबरपासून इंडिगोचीही मंगळवार, गुरुवार, शनिवारी आणि रविवारी मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत आहे.

इंडिगोच्या उड्डाण वेळा-

मुंबईहून दुपारी ११.३५ वाजता उड्डाण घेऊन दुपारी १२.३५ वाजता इंडिगोचे विमान औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर दुपारी १.१० वाजता औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि दुपारी २.१० वाजता हे विमान मुंबईत पोहोचेल.

बंगळुरु विमानसेवेसाठी प्रयत्न

औरंगाबादहून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरु होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. किमान छोट्या विमानाद्वारे आठवड्यातून ३ दिवस ही विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली आहे. लवकरच ही सेवा सुरु होईल, अशी आशा आहे.

- सुनीत कोठारी, उद्योजक

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबादMumbaiमुंबई