शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

मुंबईला जाणे आता अजून सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 18:44 IST

एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली असून दि. १५  ऑक्टोबरपासून  आठवड्यातून ४ दिवस हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेणार आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.

औरंगाबाद : एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही मुंबई-औरंगाबाद-मुंबईविमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली असून दि. १५  ऑक्टोबरपासून  आठवड्यातून ४ दिवस हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेणार आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.

१९ जूनपासून इंडिगोने सर्वप्रथम औरंगाबादहून दिल्लीसाठी विमानसेवा सुरु केली. त्यानंतर इंडिगोने १५ जुलैपासून हैद्राबादसाठी विमानसेवा सुरू केली. सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबई विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन इंडिगोने केले होते. परंतु स्लॉटच्या कारणावरून ही विमानसेवा सुरू होणे लांबणीवर पडले होते. मात्र आता ही प्रतिक्षा संपून दि. १५ ऑक्टोबरपासून इंडिगोचीही मंगळवार, गुरुवार, शनिवारी आणि रविवारी मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत आहे.

इंडिगोच्या उड्डाण वेळा-

मुंबईहून दुपारी ११.३५ वाजता उड्डाण घेऊन दुपारी १२.३५ वाजता इंडिगोचे विमान औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर दुपारी १.१० वाजता औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि दुपारी २.१० वाजता हे विमान मुंबईत पोहोचेल.

बंगळुरु विमानसेवेसाठी प्रयत्न

औरंगाबादहून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरु होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. किमान छोट्या विमानाद्वारे आठवड्यातून ३ दिवस ही विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली आहे. लवकरच ही सेवा सुरु होईल, अशी आशा आहे.

- सुनीत कोठारी, उद्योजक

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबादMumbaiमुंबई