शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

शहर बससाठी आता मिळणार स्मार्ट कार्ड; सव्वावर्षातील पावणे ८ कोटींचा तोटा कमी करण्यावर उपयायोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 18:29 IST

लॉकडाऊनपासून गेले सहा महिने एसटी जागेवरच 

ठळक मुद्देतिकिटाचा दर सर्वात कमी शहर बसच्या प्रवाशांना आता स्मार्ट कार्ड दिले जाणारया कार्डला टॉपअपसुद्धा  करता येणार आहे.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सुरू करण्यात आलेल्या शहर बसने सव्वावर्ष औरंगाबादकरांची सेवा केली. या कालावधीत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला तब्बल ७ कोटी ८७ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. लॉकडाऊनमुळे मागील सहा महिन्यांपासून ही सेवा बंद असली तरी भविष्यात पुन्हा मोठा तोटा सहन करावा लागणार नाही, यासाठी काही व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहर बसच्या प्रवाशांना आता स्मार्ट कार्ड दिले जाणार असून, या कार्डला टॉपअपसुद्धा  करता येणार आहे. हे कार्ड रिचार्जदेखील करता येणार आहे.

ऐतिहासिक  औरंगाबाद शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एसटी महामंडळाने जवळपास बंदच केली होती. औरंगाबादकरांना खाजगी प्रवासी वाहतुकीशिवाय पर्याय उरलेला नव्हता. शहराची सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन महापालिकेसाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. २६ जानेवारी २०१८ रोजी या बससेवेचा शुभारंभ झाला. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील व देशातील इतर शहरांतील सिटी बसच्या तुलनेत कमी तिकीट दर ठेवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. आजही तो निर्णय कायम आहे.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सिटी बसच्या तिकीट दराचे प्रमाण ५३ टक्के आहे. एसटी महामंडळाच्या तिकीट दराचे प्रमाण ६३ टक्के असून, नागपूर येथील सिटी बसच्या तिकीट दराचे प्रमाण ७७ टक्के आहे. मध्यंतरीच्या काळात डिझेलचे दर वाढत गेले; पण औरंगाबादच्या स्मार्ट बसचे तिकीट दर मात्र वाढवण्यात आले नाहीत. या सिटी बसच्या तिकीट दराची सुरुवात पाच रुपयांपासून होते. दोन स्टेजसाठी (टप्प्यांसाठी) पाच रुपये तिकीट आकारले जाते. दोन किलोमीटरसाठी दोन रुपये आकारले जातात. कमी तिकीट दरामुळे स्मार्ट बसला वर्षाला ७ कोटी ८७ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबद्दलचा आढावा संचालक मंडळाने घेतला आणि तिकीट दर स्थिर ठेवण्याचे देखील ठरविण्यात आले. सिटी बसचा होणारा तोटा अन्य मार्गाने भरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला देखील मान्यता दिली.

स्मार्ट कार्डची उपाययोजनाशहर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता स्मार्ट कार्डची योजना आखण्यात आली आहे. याचा उपयोग प्रामुख्याने विद्यार्थ्यांना होणार आहे. स्मार्ट कार्डवर टॉपअप मारता येणार असून, हे कार्ड रिचार्ज देखील करता येणार आहे. त्याशिवाय कंडक्टर्सला अँड्रॉईड बेस्ड् मशीन तिकिटासाठी दिले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशाला केवळ तीन सेकंदात तिकीट मिळेल. या मशीनमध्ये कार्ड पेमेंट करण्याचीदेखील सुविधा आहे. या मशीनचे प्रशिक्षण सोमवारी वाहकांना देण्यात आले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटी