शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

शहर बससाठी आता मिळणार स्मार्ट कार्ड; सव्वावर्षातील पावणे ८ कोटींचा तोटा कमी करण्यावर उपयायोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 18:29 IST

लॉकडाऊनपासून गेले सहा महिने एसटी जागेवरच 

ठळक मुद्देतिकिटाचा दर सर्वात कमी शहर बसच्या प्रवाशांना आता स्मार्ट कार्ड दिले जाणारया कार्डला टॉपअपसुद्धा  करता येणार आहे.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सुरू करण्यात आलेल्या शहर बसने सव्वावर्ष औरंगाबादकरांची सेवा केली. या कालावधीत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला तब्बल ७ कोटी ८७ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. लॉकडाऊनमुळे मागील सहा महिन्यांपासून ही सेवा बंद असली तरी भविष्यात पुन्हा मोठा तोटा सहन करावा लागणार नाही, यासाठी काही व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहर बसच्या प्रवाशांना आता स्मार्ट कार्ड दिले जाणार असून, या कार्डला टॉपअपसुद्धा  करता येणार आहे. हे कार्ड रिचार्जदेखील करता येणार आहे.

ऐतिहासिक  औरंगाबाद शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एसटी महामंडळाने जवळपास बंदच केली होती. औरंगाबादकरांना खाजगी प्रवासी वाहतुकीशिवाय पर्याय उरलेला नव्हता. शहराची सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन महापालिकेसाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. २६ जानेवारी २०१८ रोजी या बससेवेचा शुभारंभ झाला. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील व देशातील इतर शहरांतील सिटी बसच्या तुलनेत कमी तिकीट दर ठेवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. आजही तो निर्णय कायम आहे.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सिटी बसच्या तिकीट दराचे प्रमाण ५३ टक्के आहे. एसटी महामंडळाच्या तिकीट दराचे प्रमाण ६३ टक्के असून, नागपूर येथील सिटी बसच्या तिकीट दराचे प्रमाण ७७ टक्के आहे. मध्यंतरीच्या काळात डिझेलचे दर वाढत गेले; पण औरंगाबादच्या स्मार्ट बसचे तिकीट दर मात्र वाढवण्यात आले नाहीत. या सिटी बसच्या तिकीट दराची सुरुवात पाच रुपयांपासून होते. दोन स्टेजसाठी (टप्प्यांसाठी) पाच रुपये तिकीट आकारले जाते. दोन किलोमीटरसाठी दोन रुपये आकारले जातात. कमी तिकीट दरामुळे स्मार्ट बसला वर्षाला ७ कोटी ८७ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबद्दलचा आढावा संचालक मंडळाने घेतला आणि तिकीट दर स्थिर ठेवण्याचे देखील ठरविण्यात आले. सिटी बसचा होणारा तोटा अन्य मार्गाने भरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला देखील मान्यता दिली.

स्मार्ट कार्डची उपाययोजनाशहर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता स्मार्ट कार्डची योजना आखण्यात आली आहे. याचा उपयोग प्रामुख्याने विद्यार्थ्यांना होणार आहे. स्मार्ट कार्डवर टॉपअप मारता येणार असून, हे कार्ड रिचार्ज देखील करता येणार आहे. त्याशिवाय कंडक्टर्सला अँड्रॉईड बेस्ड् मशीन तिकिटासाठी दिले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशाला केवळ तीन सेकंदात तिकीट मिळेल. या मशीनमध्ये कार्ड पेमेंट करण्याचीदेखील सुविधा आहे. या मशीनचे प्रशिक्षण सोमवारी वाहकांना देण्यात आले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटी