शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

शहर बससाठी आता मिळणार स्मार्ट कार्ड; सव्वावर्षातील पावणे ८ कोटींचा तोटा कमी करण्यावर उपयायोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 18:29 IST

लॉकडाऊनपासून गेले सहा महिने एसटी जागेवरच 

ठळक मुद्देतिकिटाचा दर सर्वात कमी शहर बसच्या प्रवाशांना आता स्मार्ट कार्ड दिले जाणारया कार्डला टॉपअपसुद्धा  करता येणार आहे.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सुरू करण्यात आलेल्या शहर बसने सव्वावर्ष औरंगाबादकरांची सेवा केली. या कालावधीत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला तब्बल ७ कोटी ८७ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. लॉकडाऊनमुळे मागील सहा महिन्यांपासून ही सेवा बंद असली तरी भविष्यात पुन्हा मोठा तोटा सहन करावा लागणार नाही, यासाठी काही व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहर बसच्या प्रवाशांना आता स्मार्ट कार्ड दिले जाणार असून, या कार्डला टॉपअपसुद्धा  करता येणार आहे. हे कार्ड रिचार्जदेखील करता येणार आहे.

ऐतिहासिक  औरंगाबाद शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एसटी महामंडळाने जवळपास बंदच केली होती. औरंगाबादकरांना खाजगी प्रवासी वाहतुकीशिवाय पर्याय उरलेला नव्हता. शहराची सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन महापालिकेसाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. २६ जानेवारी २०१८ रोजी या बससेवेचा शुभारंभ झाला. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील व देशातील इतर शहरांतील सिटी बसच्या तुलनेत कमी तिकीट दर ठेवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. आजही तो निर्णय कायम आहे.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सिटी बसच्या तिकीट दराचे प्रमाण ५३ टक्के आहे. एसटी महामंडळाच्या तिकीट दराचे प्रमाण ६३ टक्के असून, नागपूर येथील सिटी बसच्या तिकीट दराचे प्रमाण ७७ टक्के आहे. मध्यंतरीच्या काळात डिझेलचे दर वाढत गेले; पण औरंगाबादच्या स्मार्ट बसचे तिकीट दर मात्र वाढवण्यात आले नाहीत. या सिटी बसच्या तिकीट दराची सुरुवात पाच रुपयांपासून होते. दोन स्टेजसाठी (टप्प्यांसाठी) पाच रुपये तिकीट आकारले जाते. दोन किलोमीटरसाठी दोन रुपये आकारले जातात. कमी तिकीट दरामुळे स्मार्ट बसला वर्षाला ७ कोटी ८७ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबद्दलचा आढावा संचालक मंडळाने घेतला आणि तिकीट दर स्थिर ठेवण्याचे देखील ठरविण्यात आले. सिटी बसचा होणारा तोटा अन्य मार्गाने भरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला देखील मान्यता दिली.

स्मार्ट कार्डची उपाययोजनाशहर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता स्मार्ट कार्डची योजना आखण्यात आली आहे. याचा उपयोग प्रामुख्याने विद्यार्थ्यांना होणार आहे. स्मार्ट कार्डवर टॉपअप मारता येणार असून, हे कार्ड रिचार्ज देखील करता येणार आहे. त्याशिवाय कंडक्टर्सला अँड्रॉईड बेस्ड् मशीन तिकिटासाठी दिले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशाला केवळ तीन सेकंदात तिकीट मिळेल. या मशीनमध्ये कार्ड पेमेंट करण्याचीदेखील सुविधा आहे. या मशीनचे प्रशिक्षण सोमवारी वाहकांना देण्यात आले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटी