शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लागा तयारीला! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने इच्छुक खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 18:55 IST

सर्वोच्च न्यायालयाने मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया दोन आठवड्यांत सुरू करा, असे आदेश दिले.

औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला दोन आठवड्यांत सुरुवात करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने जि.प. आणि ९ पं.स. निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या असलेल्या उमेदवारांमध्ये आनंद पसरला असून, निवडणुकीच्या तारखेविषयी त्यांच्यात चर्चा सुरू झाली.

जि.प.च्या गत पंचवार्षिक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची मुदत २० मार्च रोजी समाप्त झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) आरक्षण रद्द केल्याने, सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका घेतली. दरम्यान, राज्य सरकारने कायद्यात दुरुस्ती करून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार स्वत:कडे घेतले. यानंतर, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण कसे योग्य आहे, हे मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती.

न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारने समर्पित आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे काम सुरू असताना, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया दोन आठवड्यांत सुरू करा, असे आदेश दिले. या आदेशामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होण्याचे संकेत आहेत. गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या भावी उमेदवारांना आनंद झाला. अनेक इच्छुक जि. प.त भेटले. तेव्हा पावसाळ्यानंतर ही निवडणूक होईल, असे काहींचे मत होते, तर राज्य सरकार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेणार नाही, असे बोलत होते.

जि.प.च्या ७० सर्कल तर पं.स.च्या १४० गणांसाठी निवडणूकराज्य सरकारने राज्यातील जि.प. आणि पं.स. सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला. यामुळे जि.प.चे ८ गट (सर्कल) वाढ होऊन एकूण सदस्य संख्या ७० झाली आहे, तसेच जिल्ह्यात ९ पंचायत समित्यांमध्ये सदस्यांची संख्या १२४ वरून १४० करण्यात आलेली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयAurangabadऔरंगाबाद