शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

लागा तयारीला! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने इच्छुक खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 18:55 IST

सर्वोच्च न्यायालयाने मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया दोन आठवड्यांत सुरू करा, असे आदेश दिले.

औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला दोन आठवड्यांत सुरुवात करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने जि.प. आणि ९ पं.स. निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या असलेल्या उमेदवारांमध्ये आनंद पसरला असून, निवडणुकीच्या तारखेविषयी त्यांच्यात चर्चा सुरू झाली.

जि.प.च्या गत पंचवार्षिक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची मुदत २० मार्च रोजी समाप्त झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) आरक्षण रद्द केल्याने, सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका घेतली. दरम्यान, राज्य सरकारने कायद्यात दुरुस्ती करून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार स्वत:कडे घेतले. यानंतर, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण कसे योग्य आहे, हे मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती.

न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारने समर्पित आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे काम सुरू असताना, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया दोन आठवड्यांत सुरू करा, असे आदेश दिले. या आदेशामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होण्याचे संकेत आहेत. गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या भावी उमेदवारांना आनंद झाला. अनेक इच्छुक जि. प.त भेटले. तेव्हा पावसाळ्यानंतर ही निवडणूक होईल, असे काहींचे मत होते, तर राज्य सरकार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेणार नाही, असे बोलत होते.

जि.प.च्या ७० सर्कल तर पं.स.च्या १४० गणांसाठी निवडणूकराज्य सरकारने राज्यातील जि.प. आणि पं.स. सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला. यामुळे जि.प.चे ८ गट (सर्कल) वाढ होऊन एकूण सदस्य संख्या ७० झाली आहे, तसेच जिल्ह्यात ९ पंचायत समित्यांमध्ये सदस्यांची संख्या १२४ वरून १४० करण्यात आलेली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयAurangabadऔरंगाबाद