शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

१५ बोगींच्या रेल्वेने आले महाव्यवस्थापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:18 AM

: रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री टायर बोगीतून प्रवास करून प्रवाशांत मिसळावे, असे आदेश वर्षभरापूर्वी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले होते; परंतु दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बुधवारी औरंगाबादेत अधिकारी-कर्मचाºयांच्या फौजफाट्यासह १५ बोगींच्या रेल्वेने दाखल झाले. यावेळी या रेल्वेला ‘सलून’ जोडण्यात आलेले होते.

ठळक मुद्देव्हीआयपी संस्कृ ती कायम : रेल्वेला सलूनही जोडलेले, रेल्वेमंत्र्यांच्या आदेशाला खोडा

औरंगाबाद : रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री टायर बोगीतून प्रवास करून प्रवाशांत मिसळावे, असे आदेश वर्षभरापूर्वी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले होते; परंतु दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बुधवारी औरंगाबादेत अधिकारी-कर्मचाºयांच्या फौजफाट्यासह १५ बोगींच्या रेल्वेने दाखल झाले. यावेळी या रेल्वेला ‘सलून’ जोडण्यात आलेले होते. त्यामुळे रेल्वेत अद्यापही व्हीआयपी संस्कृती कायम असल्याचे पाहायला मिळाले.रेल्वेचे अधिकारी जेव्हा प्रवास करतात तेव्हा त्यांचा राजेशाही थाट दिसतो. त्यांच्यासाठी रेल्वेला विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज असे सलून अथवा ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’ची बोगी जोडली जाते; परंतु अधिकाºयांनी ही शानशोकी बंद करावी आणि रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री टायर बोगीतून प्रवास करून प्रवाशांत मिसळावे, असे आदेश आॅक्टोबर २०१७ मध्ये पीयूष गोयल यांनी दिले होते. रेल्वे अधिकाºयांचा पाहणी दौरा म्हणजे हा केवळ देवदर्शन, पर्यटन असे समीकरणच बनले होते. रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानंतर यावर चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार अधिकाºयांनी काही दिवस सर्वसामान्य प्रवाशांबरोबर प्रवास करून सूचनेचे पालन सुरू केले होते; परंतु पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाल्याचे पाहायला मिळत आहे.दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी रुजू झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी विनोदकुमार यादव औरंगाबादच्या पहिल्याच दौºयात विशेष सलूनने दाखल झाले होते. आता पुन्हा एकदा वार्षिक निरीक्षणासाठी ते बुधवारी औरंगाबादेत आले. यावेळी निरीक्षणासाठी १५ बोगींच्या रेल्वेने ते दाखल झाले. या रेल्वेला लाल रंगाची सलूनदेखील जोडण्यात आल्याचे पाहायला मिळाले. देशातील सर्वात मोठा सेवा उद्योग असूनही परंपरेने रूढ झालेली ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले होते; परंतु त्यास खोडा बसत असल्याचे दिसते.एका बोगीसाठी ३० हजारांचा खर्चपाहणी दौºयासाठी वापरण्यात येणाºया एका बोगीसाठी किमान ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे १५ बोगींच्या वापरातून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे दिसते. रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले, निरीक्षणासाठी विविधअधिकारी असतात. महाव्यवस्थपक काही बाबींची पाहणी करतात; परंतु संबंधित विभागाचे अधिकारी संपूर्ण बाबींची तपासणी करतात. त्यामुळे बोगींचा वापर करावा लागतो. त्यास मंजुरीही असते.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन