शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

सत्ता नेत्यांच्या वंशावळीला,सामान्य शिवसैनिक अडगळीला;शिवसेनेच्या निषेध मेळाव्यात खदखद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:13 IST

पश्चिम व मध्य मतदारसंघातील बंडखोर आ. संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधातील निषेध मेळाव्यात हल्लाबोल

औरंगाबाद : शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना एकवटली असली तरी सामान्य शिवसैनिकांच्या मनातील खदखद कायम आहे. त्या खदखदीला उपजिल्हाप्रमुख जयवंत (बंडू) ओक यांनी सोमवारी वाचा फोडत सत्ता नेत्यांच्या वंशावळीला व सामान्य शिवसैनिक अडगळीला पडल्याची खंत व्यक्त केली.

पश्चिम व मध्य मतदारसंघातील बंडखोर आ.संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधातील निषेध मेळाव्यात ओक म्हणाले, ‘शिवसैनिक कोणत्याही अपेक्षा न ठेवता या आमदारांना तीन-तीनवेळा निवडून आणतात आणि ते बंडखोरी करतात. आमदार असो, वा नगरसेवक; त्यांना दोनच टर्म ठरवून द्या. जो काम करतो, त्यांना संधी द्या. नेत्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांकडेही पाहिले पाहिजे.

जवाहर कॉलनी रोडवरील एका सभागृहात गद्दार आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन, ऋषी खैरे, विजय वाघचौरे, हनुमान शिंदे, अनिल पोलकर, सुशील खेडकर आदींची उपस्थिती होती.

बंडखोरांची ईडीने चौकशी करावी- खैरेबंडखोर आमदारांना कोट्यवधी रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. आता ईडीने याबाबतही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते खैरे यांनी केली. ३८३ कोटी रुपयांच्या बीड बायपासच्या रस्त्यात सात कोटी रुपये आ. शिरसाट यांनी घेतल्याचे कंत्राटदाराकडून समजले आहे. जैस्वालांनी पैसे घेऊन गद्दारी केली आहे. त्या दाढीकडे (एकनाथ शिंदे) एवढे पैसे कुठून आले, याची ईडीने चौकशी करावी.

पक्षप्रमुखांना पत्र देण्याचे शहाणपण : दानवेपक्षप्रमुखांना पत्र देण्यापर्यंत आ. शिरसाट शहाणे झाले आहेत. ८ जूनच्या सभेत भाषण न करू दिल्याने नाराज झाले म्हणे. पक्षसभेचा कार्यक्रम कुठे ठरतो, हे त्यांना माहिती नाही काय, असा सवाल करत आ. दानवे यांनी शिरसाट यांच्या पत्राची चिरफाड करत त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचे खंडन केले.

२९ जूनला बंडखोरांविरोधात रॅली२९ रोजी बंडखोरांविरोधात शिवसेना रॅली काढणार असल्याचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी सांगितले. शहरात तीन बंडखोर आमदारांची कार्यालये आहेत. रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आ.संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयांसमोर रॅली जाईल. त्यांच्या कार्यालयांवर हल्ला करण्याचा उद्देश नाही. सिल्लोडमध्ये सत्तातरांविरोधात रॅली काढण्यात येईल, असे आ. दानवे म्हणाले.

उद्रेकाचा सामना करावा लागेल : घोसाळकरआ.शिरसाटांचा कारभार एकट्यापुरताच सुरू होता. हे बंडखोर ज्या दिवशी शहरात येतील, त्या दिवशी उद्रेकाचा सामना त्यांना करावा लागेल. त्या बंडखोरांना येथे गाडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत, असे संपर्कप्रमुख घोसाळकर म्हणाले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ