शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

सत्ता नेत्यांच्या वंशावळीला,सामान्य शिवसैनिक अडगळीला;शिवसेनेच्या निषेध मेळाव्यात खदखद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:13 IST

पश्चिम व मध्य मतदारसंघातील बंडखोर आ. संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधातील निषेध मेळाव्यात हल्लाबोल

औरंगाबाद : शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना एकवटली असली तरी सामान्य शिवसैनिकांच्या मनातील खदखद कायम आहे. त्या खदखदीला उपजिल्हाप्रमुख जयवंत (बंडू) ओक यांनी सोमवारी वाचा फोडत सत्ता नेत्यांच्या वंशावळीला व सामान्य शिवसैनिक अडगळीला पडल्याची खंत व्यक्त केली.

पश्चिम व मध्य मतदारसंघातील बंडखोर आ.संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधातील निषेध मेळाव्यात ओक म्हणाले, ‘शिवसैनिक कोणत्याही अपेक्षा न ठेवता या आमदारांना तीन-तीनवेळा निवडून आणतात आणि ते बंडखोरी करतात. आमदार असो, वा नगरसेवक; त्यांना दोनच टर्म ठरवून द्या. जो काम करतो, त्यांना संधी द्या. नेत्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांकडेही पाहिले पाहिजे.

जवाहर कॉलनी रोडवरील एका सभागृहात गद्दार आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन, ऋषी खैरे, विजय वाघचौरे, हनुमान शिंदे, अनिल पोलकर, सुशील खेडकर आदींची उपस्थिती होती.

बंडखोरांची ईडीने चौकशी करावी- खैरेबंडखोर आमदारांना कोट्यवधी रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. आता ईडीने याबाबतही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते खैरे यांनी केली. ३८३ कोटी रुपयांच्या बीड बायपासच्या रस्त्यात सात कोटी रुपये आ. शिरसाट यांनी घेतल्याचे कंत्राटदाराकडून समजले आहे. जैस्वालांनी पैसे घेऊन गद्दारी केली आहे. त्या दाढीकडे (एकनाथ शिंदे) एवढे पैसे कुठून आले, याची ईडीने चौकशी करावी.

पक्षप्रमुखांना पत्र देण्याचे शहाणपण : दानवेपक्षप्रमुखांना पत्र देण्यापर्यंत आ. शिरसाट शहाणे झाले आहेत. ८ जूनच्या सभेत भाषण न करू दिल्याने नाराज झाले म्हणे. पक्षसभेचा कार्यक्रम कुठे ठरतो, हे त्यांना माहिती नाही काय, असा सवाल करत आ. दानवे यांनी शिरसाट यांच्या पत्राची चिरफाड करत त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचे खंडन केले.

२९ जूनला बंडखोरांविरोधात रॅली२९ रोजी बंडखोरांविरोधात शिवसेना रॅली काढणार असल्याचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी सांगितले. शहरात तीन बंडखोर आमदारांची कार्यालये आहेत. रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आ.संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयांसमोर रॅली जाईल. त्यांच्या कार्यालयांवर हल्ला करण्याचा उद्देश नाही. सिल्लोडमध्ये सत्तातरांविरोधात रॅली काढण्यात येईल, असे आ. दानवे म्हणाले.

उद्रेकाचा सामना करावा लागेल : घोसाळकरआ.शिरसाटांचा कारभार एकट्यापुरताच सुरू होता. हे बंडखोर ज्या दिवशी शहरात येतील, त्या दिवशी उद्रेकाचा सामना त्यांना करावा लागेल. त्या बंडखोरांना येथे गाडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत, असे संपर्कप्रमुख घोसाळकर म्हणाले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ