शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

गौताळा अभयारण्याची होतेय कचराकुंडी; क्विंटलभर प्लास्टिक अन् दारूच्या रिकाम्या बाटल्या जमा

By साहेबराव हिवराळे | Updated: October 6, 2022 15:04 IST

हिवरखेडा व पूरणवाडी परिसरात जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा केला.

औरंगाबाद : गौताळा अभयारण्यात शहरातील नागरिकांच्या सहली सर्रास सुरू आहेत. गांधी जयंती आणि वन्यजीव सप्ताहात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी तेथे केरकचरा गोळा करताना त्यांचेही डोळे विस्फारले.

पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून असा कचरा टाकला जातो. त्यामुळे ऑक्सिजन हबदेखील धोक्यात येण्याची भीती आहे. कोरोनाकाळात नागरिकांना ऑक्सिजन हब आणि वृक्षारोपणाची महती समजली; पण आता ते गांभीर्यच जणू हरवले आहे. सामाजिक विषयावर प्रबोधन करणाऱ्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

हिवरखेडा व पूरणवाडी परिसरात जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा केला. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले, वनपाल प्रवीण पारखी, कांतीलाल रायसिंग, सुनील देशमुख आदींनी कचऱ्याच्या ८ ते १० गोण्या भरून जमा केल्या आहेत. हे श्रमदान बुधवारी दिवसभर करण्यात आले.

अनेकांवर दंडात्मक कारवाई...पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी यावे. प्लास्टिक कचरा, दारूच्या बाटल्या टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली होती. त्याचा धसका पर्यटकांनी घेतला होता. पुन्हा तशीच कारवाई करणार आहोत.- राजेंद्र नाळे, वन्यजीव विभाग अधिकारी

वन्यजीव सप्ताह गुपचूप करण्यात काय अर्थ?वन्यजीव सप्ताह सुरू झाला असला तरी त्याचा गवगवा नेहमीसारखा यंदा झालेला नाही. खऱ्या अर्थाने निसर्ग आणि वन्यजीव यांच्याविषयीचे ज्ञान शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठांनाही कळले पाहिजे.- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य

टॅग्स :forest departmentवनविभागAurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न