शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मोक्याच्या जागांवर उद्यानाची आरक्षणे

By admin | Updated: December 30, 2015 00:48 IST

औरंगाबाद : सुधारित शहर विकास आराखड्यात अनेक ठिकाणी मोक्याच्या जागांवर उद्यानाची आरक्षणे टाकण्यात आल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद : सुधारित शहर विकास आराखड्यात अनेक ठिकाणी मोक्याच्या जागांवर उद्यानाची आरक्षणे टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी तर अगदी चौकांमध्येच रस्त्यालगतच्या जागा उद्यानासाठी आरक्षित केल्या आहेत. परिणामी व्यावसायिक वापराच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या जागा हातच्या जाणार आहेत. शहराचा सुधारित विकास आराखडा सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला. आगामी सर्वसाधारण सभेनंतर तो जनतेसाठी प्रसिद्ध होणार आहे. पण तरीही त्यातील अनेक बाबी हळूहळू समोर येत आहेत. सुधारित आराखड्यात गार्डनची आरक्षणे टाकताना जागांचे महत्त्व, त्यांची उपयोगिता याचा विचार झालेला नाही. अनेक ठिकाणी अगदी मोक्याच्या जागांवरच अशा उद्यानांची आरक्षणे टाकली गेली आहेत. नक्षत्रवाडी, मुस्तफाबाद, चिकलठाणा, हर्सूल आदी भागात असे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी चौकांमधील कोपऱ्यावरील जागेत तर काही ठिकाणी दोनशे फूट रुंद रस्त्यालगतच्या जागांमध्ये ही आरक्षणे आहेत. त्यामुळे अशा जमीनमालकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. चौकांमधील किंवा मोठ्या रस्त्यांलगतच्या जागा या व्यावसायिक वापराच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जातात. त्याऐवजी अशी आरक्षणे टाकली गेल्यामुळे त्यावर मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेतले जाण्याची शक्यता आहे. एअरपोर्टसाठी १४० हेक्टर सुधारित विकास आराखड्यात विमानतळाच्या विस्तारीकरणाचाही विचार करण्यात आलेला आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या विनंतीवरून आराखड्यात १४० हेक्टर जागा आरक्षित करण्यात आली आहे. भविष्यात या ठिकाणी विमानतळाचे विस्तारीकरण होणार आहे. विमानतळाच्या भिंतीपासून एसटी कॉलनीच्या दिशेने या जागेचे आरक्षण आहे. मनपाचे प्राणिसंग्रहालय मोठ्या जागेत स्थलांतरित करण्याच्या हालचाली अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्यासाठी मनपाने जिल्हा प्रशासनाकडे जागेची मागणीही नोंदविलेली आहे.४या पार्श्वभूमीवर सुधारित विकास आराखड्यात मिटमिटा परिसरात तब्बल २०० एकर जागा आरक्षित केली आहे. याशिवाय ट्रान्स्पोर्ट नगरसाठी जळगाव रोडवर हर्सूलच्या पुढे जागा आरक्षित करण्यात आली आहे. सुधारित विकास आराखडा मनपाला सादर करण्यात आला असला तरी नगररचना खात्याने विद्यमान जमीन वापराचा नकाशा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे विकास आराखडा प्रसिद्ध झाला तरी सध्या कोणत्या जागेवर काय आहे आणि त्यात कोणता बदल झाला आहे हे नागरिकांना समजू शकणार नाही. त्यामुळे आधी विद्यमान जमीन वापर नकाशा बोर्डवर लावण्याची मागणी होत आहे.