शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
5
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
6
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
7
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
8
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
10
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
11
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
12
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
13
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
14
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
15
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
16
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
17
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
18
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
20
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

रस्त्यावर येणारा कचरा बंद होईना, आता काय करावे? मनपा प्रशासनाचे डोकेच चालेना!

By मुजीब देवणीकर | Updated: December 4, 2023 19:34 IST

आठ वर्षांत इंदौरचे १० अभ्यास दौरे; सर्व उपाययोजनांवर फेरले जातेय पाणी

छत्रपती संभाजीनगर : शहर इंदौरपेक्षाही अधिक स्वच्छ झाले पाहिजे, स्वच्छ भारत अभियानात देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश झाला पाहिजे म्हणून महापालिका तीन महिन्यांपूर्वी संपूर्ण यंत्रणेसह कामाला लागली. ‘हम होंगे कामयाब’ ही टॅगलाइन निश्चित करण्यात आली. त्यानंतरही शहरातील मुख्य रस्त्यांवर, चौकाचौकांत कचऱ्याचे डोंगर साचतच आहेत. कचरा रस्त्यावर येऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. नागरिकच उघड्यावर कचरा आणून टाकत असल्याचे वारंवार समोर येत असल्याने आता काय करावे?; डोकंच चालत नाही, अशी भावना मनपा प्रशासनाची झाली आहे.

देशात स्वच्छ व सुंदर शहर म्हणून इंदौर शहराची ख्याती आहे. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी मागील आठ वर्षांत इंदौरचे १० अभ्यास दौरे केले. मात्र, ‘इंदौर पॅटर्न’ची अंमलबजावणी महापालिकेला आजपर्यंत करता आली नाही. दरवर्षी महापालिका प्रशासन यंदा शहर इंदौरपेक्षाही अधिक स्वच्छ व सुंदर केले जाईल. तीन महिन्यांपूर्वी प्रशासनाचे अशाच पद्धतीने कंबर कसली. ओला व सुका कचरा वेगळा करण्यावर भर दिला. त्याला ९० टक्के यशही आले. आता ११५ वॉर्डांमधून ९० टक्के कचरा वर्गीकृत होऊनच येत आहे. १० टक्के नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करायला तयार नाहीत. महापालिका त्यांच्याकडून कचरा घेत नाही. त्यामुळे हे नागरिक रस्त्यावर, दुभाजकामध्ये, खुल्या जागांवर कचरा आणून टाकत आहेत. शहर विद्रुपीकरणात रस्त्यावरील कचरा अधिक भर घालत आहे. पर्यटनाच्या राजधानीला हे दृश्य शोभणारे नाही. झोन क्रमांक १, २, ३ मध्ये रस्त्यावर येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यावर कचरा येऊ नये म्हणून जनजागृती केली. दंडात्मक कारवाया केल्या. त्यानंतरही परिस्थिती सुधारणा नाही.

तीन प्रक्रिया केंद्र सुरूहर्सूल, पडेगाव, चिकलठाणा येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाले. त्यामुळे दररोज तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होत आहे. ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती कांचनवाडीत सुरू झाली.

कोट्यवधींचा खर्च तरी...शहरातील कचरा संकलनासाठी रेड्डी कंपनीची नेमणूक केली. दरमहा अडीच ते तीन कोटी रुपये निव्वळ कचरा उचलण्याचा खर्च येतोय. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दरमहा किमान ५० ते ६० लाखांचा खर्च येतोय. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहर स्वच्छ व सुंदर होईना.

शर्थीचे प्रयत्न सुरूरस्त्यावर येणारा कचरा बंद व्हावा, यासाठी महापालिकेने शर्थीचे प्रयत्न काही दिवसांपासून सुरू केले आहेत. एक कचऱ्याचे केंद्र बंद झाले तर दुसरीकडे दुसरे नवीन केंद्र तयार होते. जुन्या शहरात आणि शहराच्या आसपास असलेल्या गुंठेवारी भागात हा प्रश्न अधिक जटिल आहे. आम्ही येणाऱ्या काही दिवसांत यावरही मात करणार आहोत.-सोमनाथ जाधव, उपायुक्त, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न