शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर येणारा कचरा बंद होईना, आता काय करावे? मनपा प्रशासनाचे डोकेच चालेना!

By मुजीब देवणीकर | Updated: December 4, 2023 19:34 IST

आठ वर्षांत इंदौरचे १० अभ्यास दौरे; सर्व उपाययोजनांवर फेरले जातेय पाणी

छत्रपती संभाजीनगर : शहर इंदौरपेक्षाही अधिक स्वच्छ झाले पाहिजे, स्वच्छ भारत अभियानात देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश झाला पाहिजे म्हणून महापालिका तीन महिन्यांपूर्वी संपूर्ण यंत्रणेसह कामाला लागली. ‘हम होंगे कामयाब’ ही टॅगलाइन निश्चित करण्यात आली. त्यानंतरही शहरातील मुख्य रस्त्यांवर, चौकाचौकांत कचऱ्याचे डोंगर साचतच आहेत. कचरा रस्त्यावर येऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. नागरिकच उघड्यावर कचरा आणून टाकत असल्याचे वारंवार समोर येत असल्याने आता काय करावे?; डोकंच चालत नाही, अशी भावना मनपा प्रशासनाची झाली आहे.

देशात स्वच्छ व सुंदर शहर म्हणून इंदौर शहराची ख्याती आहे. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी मागील आठ वर्षांत इंदौरचे १० अभ्यास दौरे केले. मात्र, ‘इंदौर पॅटर्न’ची अंमलबजावणी महापालिकेला आजपर्यंत करता आली नाही. दरवर्षी महापालिका प्रशासन यंदा शहर इंदौरपेक्षाही अधिक स्वच्छ व सुंदर केले जाईल. तीन महिन्यांपूर्वी प्रशासनाचे अशाच पद्धतीने कंबर कसली. ओला व सुका कचरा वेगळा करण्यावर भर दिला. त्याला ९० टक्के यशही आले. आता ११५ वॉर्डांमधून ९० टक्के कचरा वर्गीकृत होऊनच येत आहे. १० टक्के नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करायला तयार नाहीत. महापालिका त्यांच्याकडून कचरा घेत नाही. त्यामुळे हे नागरिक रस्त्यावर, दुभाजकामध्ये, खुल्या जागांवर कचरा आणून टाकत आहेत. शहर विद्रुपीकरणात रस्त्यावरील कचरा अधिक भर घालत आहे. पर्यटनाच्या राजधानीला हे दृश्य शोभणारे नाही. झोन क्रमांक १, २, ३ मध्ये रस्त्यावर येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यावर कचरा येऊ नये म्हणून जनजागृती केली. दंडात्मक कारवाया केल्या. त्यानंतरही परिस्थिती सुधारणा नाही.

तीन प्रक्रिया केंद्र सुरूहर्सूल, पडेगाव, चिकलठाणा येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाले. त्यामुळे दररोज तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होत आहे. ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती कांचनवाडीत सुरू झाली.

कोट्यवधींचा खर्च तरी...शहरातील कचरा संकलनासाठी रेड्डी कंपनीची नेमणूक केली. दरमहा अडीच ते तीन कोटी रुपये निव्वळ कचरा उचलण्याचा खर्च येतोय. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दरमहा किमान ५० ते ६० लाखांचा खर्च येतोय. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहर स्वच्छ व सुंदर होईना.

शर्थीचे प्रयत्न सुरूरस्त्यावर येणारा कचरा बंद व्हावा, यासाठी महापालिकेने शर्थीचे प्रयत्न काही दिवसांपासून सुरू केले आहेत. एक कचऱ्याचे केंद्र बंद झाले तर दुसरीकडे दुसरे नवीन केंद्र तयार होते. जुन्या शहरात आणि शहराच्या आसपास असलेल्या गुंठेवारी भागात हा प्रश्न अधिक जटिल आहे. आम्ही येणाऱ्या काही दिवसांत यावरही मात करणार आहोत.-सोमनाथ जाधव, उपायुक्त, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न