शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

रस्त्यावर येणारा कचरा बंद होईना, आता काय करावे? मनपा प्रशासनाचे डोकेच चालेना!

By मुजीब देवणीकर | Updated: December 4, 2023 19:34 IST

आठ वर्षांत इंदौरचे १० अभ्यास दौरे; सर्व उपाययोजनांवर फेरले जातेय पाणी

छत्रपती संभाजीनगर : शहर इंदौरपेक्षाही अधिक स्वच्छ झाले पाहिजे, स्वच्छ भारत अभियानात देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश झाला पाहिजे म्हणून महापालिका तीन महिन्यांपूर्वी संपूर्ण यंत्रणेसह कामाला लागली. ‘हम होंगे कामयाब’ ही टॅगलाइन निश्चित करण्यात आली. त्यानंतरही शहरातील मुख्य रस्त्यांवर, चौकाचौकांत कचऱ्याचे डोंगर साचतच आहेत. कचरा रस्त्यावर येऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. नागरिकच उघड्यावर कचरा आणून टाकत असल्याचे वारंवार समोर येत असल्याने आता काय करावे?; डोकंच चालत नाही, अशी भावना मनपा प्रशासनाची झाली आहे.

देशात स्वच्छ व सुंदर शहर म्हणून इंदौर शहराची ख्याती आहे. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी मागील आठ वर्षांत इंदौरचे १० अभ्यास दौरे केले. मात्र, ‘इंदौर पॅटर्न’ची अंमलबजावणी महापालिकेला आजपर्यंत करता आली नाही. दरवर्षी महापालिका प्रशासन यंदा शहर इंदौरपेक्षाही अधिक स्वच्छ व सुंदर केले जाईल. तीन महिन्यांपूर्वी प्रशासनाचे अशाच पद्धतीने कंबर कसली. ओला व सुका कचरा वेगळा करण्यावर भर दिला. त्याला ९० टक्के यशही आले. आता ११५ वॉर्डांमधून ९० टक्के कचरा वर्गीकृत होऊनच येत आहे. १० टक्के नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करायला तयार नाहीत. महापालिका त्यांच्याकडून कचरा घेत नाही. त्यामुळे हे नागरिक रस्त्यावर, दुभाजकामध्ये, खुल्या जागांवर कचरा आणून टाकत आहेत. शहर विद्रुपीकरणात रस्त्यावरील कचरा अधिक भर घालत आहे. पर्यटनाच्या राजधानीला हे दृश्य शोभणारे नाही. झोन क्रमांक १, २, ३ मध्ये रस्त्यावर येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यावर कचरा येऊ नये म्हणून जनजागृती केली. दंडात्मक कारवाया केल्या. त्यानंतरही परिस्थिती सुधारणा नाही.

तीन प्रक्रिया केंद्र सुरूहर्सूल, पडेगाव, चिकलठाणा येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाले. त्यामुळे दररोज तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होत आहे. ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती कांचनवाडीत सुरू झाली.

कोट्यवधींचा खर्च तरी...शहरातील कचरा संकलनासाठी रेड्डी कंपनीची नेमणूक केली. दरमहा अडीच ते तीन कोटी रुपये निव्वळ कचरा उचलण्याचा खर्च येतोय. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दरमहा किमान ५० ते ६० लाखांचा खर्च येतोय. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहर स्वच्छ व सुंदर होईना.

शर्थीचे प्रयत्न सुरूरस्त्यावर येणारा कचरा बंद व्हावा, यासाठी महापालिकेने शर्थीचे प्रयत्न काही दिवसांपासून सुरू केले आहेत. एक कचऱ्याचे केंद्र बंद झाले तर दुसरीकडे दुसरे नवीन केंद्र तयार होते. जुन्या शहरात आणि शहराच्या आसपास असलेल्या गुंठेवारी भागात हा प्रश्न अधिक जटिल आहे. आम्ही येणाऱ्या काही दिवसांत यावरही मात करणार आहोत.-सोमनाथ जाधव, उपायुक्त, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न