शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कचराकोंडी@९३ : मार्ग निघेना; बैठकांचे सत्र संपेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:34 IST

शहरातील कचराकोंडी ९३ दिवसांपासून फुटत नाहीय. पावसाळा तोंडावर आला असून, बैठकांचे सत्र आणि अधिकाऱ्यांना झापण्यापलीकडे काहीही हाती लागलेले नाही.

ठळक मुद्देकाही प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग कमी झालेले दिसत असले तरी कचरा पेटविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कुठेही कचरा पेटविल्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. 

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी ९३ दिवसांपासून फुटत नाहीय. पावसाळा तोंडावर आला असून, बैठकांचे सत्र आणि अधिकाऱ्यांना झापण्यापलीकडे काहीही हाती लागलेले नाही. सोमवारी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी कचरा समस्या दूर करण्यासाठी आढावा बैठक घेतली. 

काही प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग कमी झालेले दिसत असले तरी कचरा पेटविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कुठेही कचरा पेटविल्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. घनकचरा संनियंत्रण समितीतर्फे  सातत्याने आढावा घेऊन संपूर्णत: कचरा प्रक्रिया आणि  विलगीकरणाबाबत महापालिका यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर समितीद्वारे कचरा समस्येबाबत संपूर्ण माहिती, पार पाडलेल्या कार्यवाहीबाबत महापालिका आयुक्त डॉ.विनायक  निपुण यांना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आज माहिती दिली.

विभागीय आयुक्त यांच्या दालनात घनकचरा संनियंत्रण समितीची बैठक झाली. कचरा व्यवस्थापन संनियंत्रण समितीने कचरा टाकण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई व्हावी, कचरा समस्या दूर व्हावी यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही समितीने सांगितल्याचे   डॉ.भापकर यांनी आयुक्तांना सांगितले. 

मनपा आयुक्त डॉ. निपुण यांनी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राबवीत असलेल्या आराखड्याची माहिती विभागीय आयुक्तांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

हा सगळा शोध कागदापुरताच चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी, नारेगाव, झाल्टा, मिटमिटा आदी ठिकाणच्या जागा निश्चित केल्या. शहरातील साचलेला कचरा उचलून त्यावर योग्य प्रक्रिया पार पाडून आवश्यक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. मात्र हे सगळे कागदावरच आहे. एकाही जागेवर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक मशिनरी बसविण्यात आलेली नाही. १४८ दिवसांचा अ‍ॅक्शन प्लॅन पालिका १६ फेबु्रवारी रोजी नारेगावातील आंदोलकांना देत होती. त्यातील ९३ दिवस आजवर संपले आहेत. या दिवसांत पालिकेला काहीही करता आलेले नाही. संनियंत्रण समिती बैठका घेण्याशिवाय काहीही करू शकत नसल्यामुळे शहरातील कचरा समस्या तशीच आहे. 

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद