शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

कचराकोंडी@९३ : मार्ग निघेना; बैठकांचे सत्र संपेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:34 IST

शहरातील कचराकोंडी ९३ दिवसांपासून फुटत नाहीय. पावसाळा तोंडावर आला असून, बैठकांचे सत्र आणि अधिकाऱ्यांना झापण्यापलीकडे काहीही हाती लागलेले नाही.

ठळक मुद्देकाही प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग कमी झालेले दिसत असले तरी कचरा पेटविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कुठेही कचरा पेटविल्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. 

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी ९३ दिवसांपासून फुटत नाहीय. पावसाळा तोंडावर आला असून, बैठकांचे सत्र आणि अधिकाऱ्यांना झापण्यापलीकडे काहीही हाती लागलेले नाही. सोमवारी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी कचरा समस्या दूर करण्यासाठी आढावा बैठक घेतली. 

काही प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग कमी झालेले दिसत असले तरी कचरा पेटविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कुठेही कचरा पेटविल्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. घनकचरा संनियंत्रण समितीतर्फे  सातत्याने आढावा घेऊन संपूर्णत: कचरा प्रक्रिया आणि  विलगीकरणाबाबत महापालिका यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर समितीद्वारे कचरा समस्येबाबत संपूर्ण माहिती, पार पाडलेल्या कार्यवाहीबाबत महापालिका आयुक्त डॉ.विनायक  निपुण यांना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आज माहिती दिली.

विभागीय आयुक्त यांच्या दालनात घनकचरा संनियंत्रण समितीची बैठक झाली. कचरा व्यवस्थापन संनियंत्रण समितीने कचरा टाकण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई व्हावी, कचरा समस्या दूर व्हावी यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही समितीने सांगितल्याचे   डॉ.भापकर यांनी आयुक्तांना सांगितले. 

मनपा आयुक्त डॉ. निपुण यांनी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राबवीत असलेल्या आराखड्याची माहिती विभागीय आयुक्तांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

हा सगळा शोध कागदापुरताच चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी, नारेगाव, झाल्टा, मिटमिटा आदी ठिकाणच्या जागा निश्चित केल्या. शहरातील साचलेला कचरा उचलून त्यावर योग्य प्रक्रिया पार पाडून आवश्यक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. मात्र हे सगळे कागदावरच आहे. एकाही जागेवर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक मशिनरी बसविण्यात आलेली नाही. १४८ दिवसांचा अ‍ॅक्शन प्लॅन पालिका १६ फेबु्रवारी रोजी नारेगावातील आंदोलकांना देत होती. त्यातील ९३ दिवस आजवर संपले आहेत. या दिवसांत पालिकेला काहीही करता आलेले नाही. संनियंत्रण समिती बैठका घेण्याशिवाय काहीही करू शकत नसल्यामुळे शहरातील कचरा समस्या तशीच आहे. 

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद