शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या रस्त्यांवरचा कचरा दोन दिवसांत उचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:19 IST

शहरातील रस्त्यावर पडलेला कचरा दोन दिवसांत उचला, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देआयुक्त : कचरा प्रक्रियेसाठी निवडलेल्या जागांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील रस्त्यावर पडलेला कचरा दोन दिवसांत उचला, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले. आयुक्तांनी आज सकाळपासून कचरा प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या सात जागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिका-यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी अधिका-यांची बैठक घेऊन समस्यांची वस्तुस्थिती जाणून घेतली.कचºयाचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे शासनाने येथे पाठविले आहे. सर्वांनी मिळून यावर मार्ग काढावा लागेल. येत्या दोन दिवसांत रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्याचे त्यांनी आदेश दिले. आयुक्तांनी मंगळवारी पदभार घेतल्यानंतर बुधवारी सकाळी अधिकाºयांची बैठक घेतली. दुपारनंतर शहरातील प्रमुख अधिकाºयांच्या भेटीही त्यांनी घेतल्या.कचºयाचा प्रश्न सुटल्यावर पाण्याकडे वळणारकचरा प्रश्न सुटल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या विषयाकडे वळू, असे आयुक्तांनी नगरसेवकांना सांगितले. कचरा प्रक्रियेसाठी निवडलेल्या जागांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी सायंकाळी कचरा समस्येचा वॉर्डनिहाय आढावा घेतला. दोन वॉर्डांसाठी ४५ मिनिटांचा वेळ देऊन त्यांनी नगरसेवकांकडूनही काही सूचना मागविल्या. कचºयाची समस्या सुटण्यासाठी काय केले पाहिजे, असे प्रश्न करीत त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली. काही नगरसेवकांनी जागेच्या तर काहींनी पावसाळ्याच्या नियोजनाबाबत समस्या मांडल्या. समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा कसा काढणार असे प्रश्न नगरसेवकांनी केले.डस्टबीनवरून नगरसेवकांची पंचाईतशासनाने डस्टबीन देण्यास बंदी घातल्याने नगरसेवकांची पंचाईत झाली आहे. डस्टबीन देण्याबाबत नगरसेवकांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे. परंतु शासन निर्णयाआधारे आयुक्तांनी बैठकीत डस्टबीन देण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. नगरसेवकांनी स्वेच्छा निधीतून नागरिकांना डस्टबीन देण्याचा निर्णय घेतला होता. काहींच्या वॉर्डातील निविदाही निघाल्या आहेत.जिल्हाधिकाºयांचा वैताग गेलाजिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी १८ एप्रिल ते १५ मेपर्यंत मनपाचे आयुक्तपद प्रभारी म्हणून सांभाळले. त्यांनी महिनाभरात पालिकेत बोटावर मोजण्याइतक्याच बैठका घेतल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगर परिषद हद्दीत कचºयाची विल्हेवाट लावण्याचे यशस्वी प्रयोग झाले.जिल्हाधिकारी येथील कचरा समस्येवर काही तरी तोडगा काढतील, अशी अपेक्षा होती; परंतु त्यांना पालिकेला काहीही वेळ देता आला नाही. मनपा आयुक्तपदाचा पदभार सांभाळणे हे आव्हान असल्याचेही त्यांनी मध्यंतरी स्पष्टपणे सांगितलेहोते.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद