शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

औरंगाबादच्या रस्त्यांवरचा कचरा दोन दिवसांत उचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:19 IST

शहरातील रस्त्यावर पडलेला कचरा दोन दिवसांत उचला, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देआयुक्त : कचरा प्रक्रियेसाठी निवडलेल्या जागांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील रस्त्यावर पडलेला कचरा दोन दिवसांत उचला, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले. आयुक्तांनी आज सकाळपासून कचरा प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या सात जागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिका-यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी अधिका-यांची बैठक घेऊन समस्यांची वस्तुस्थिती जाणून घेतली.कचºयाचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे शासनाने येथे पाठविले आहे. सर्वांनी मिळून यावर मार्ग काढावा लागेल. येत्या दोन दिवसांत रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्याचे त्यांनी आदेश दिले. आयुक्तांनी मंगळवारी पदभार घेतल्यानंतर बुधवारी सकाळी अधिकाºयांची बैठक घेतली. दुपारनंतर शहरातील प्रमुख अधिकाºयांच्या भेटीही त्यांनी घेतल्या.कचºयाचा प्रश्न सुटल्यावर पाण्याकडे वळणारकचरा प्रश्न सुटल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या विषयाकडे वळू, असे आयुक्तांनी नगरसेवकांना सांगितले. कचरा प्रक्रियेसाठी निवडलेल्या जागांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी सायंकाळी कचरा समस्येचा वॉर्डनिहाय आढावा घेतला. दोन वॉर्डांसाठी ४५ मिनिटांचा वेळ देऊन त्यांनी नगरसेवकांकडूनही काही सूचना मागविल्या. कचºयाची समस्या सुटण्यासाठी काय केले पाहिजे, असे प्रश्न करीत त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली. काही नगरसेवकांनी जागेच्या तर काहींनी पावसाळ्याच्या नियोजनाबाबत समस्या मांडल्या. समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा कसा काढणार असे प्रश्न नगरसेवकांनी केले.डस्टबीनवरून नगरसेवकांची पंचाईतशासनाने डस्टबीन देण्यास बंदी घातल्याने नगरसेवकांची पंचाईत झाली आहे. डस्टबीन देण्याबाबत नगरसेवकांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे. परंतु शासन निर्णयाआधारे आयुक्तांनी बैठकीत डस्टबीन देण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. नगरसेवकांनी स्वेच्छा निधीतून नागरिकांना डस्टबीन देण्याचा निर्णय घेतला होता. काहींच्या वॉर्डातील निविदाही निघाल्या आहेत.जिल्हाधिकाºयांचा वैताग गेलाजिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी १८ एप्रिल ते १५ मेपर्यंत मनपाचे आयुक्तपद प्रभारी म्हणून सांभाळले. त्यांनी महिनाभरात पालिकेत बोटावर मोजण्याइतक्याच बैठका घेतल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगर परिषद हद्दीत कचºयाची विल्हेवाट लावण्याचे यशस्वी प्रयोग झाले.जिल्हाधिकारी येथील कचरा समस्येवर काही तरी तोडगा काढतील, अशी अपेक्षा होती; परंतु त्यांना पालिकेला काहीही वेळ देता आला नाही. मनपा आयुक्तपदाचा पदभार सांभाळणे हे आव्हान असल्याचेही त्यांनी मध्यंतरी स्पष्टपणे सांगितलेहोते.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद