शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ganesh Visarjan : भाजपने बडविला ढोल; शिवसेनेला कानठळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:23 IST

शहरात शिवसेना आणि भाजपच्या राजकारणाचा गदारोळ सुरू असून, त्याचे पडसाद रविवारच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत उमटले.

औरंगाबाद : शहरात शिवसेना आणि भाजपच्या राजकारणाचा गदारोळ सुरू असून, त्याचे पडसाद रविवारच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत उमटले. भाजपने पश्चिम मतदारसंघाच्या श्री गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी क्रांतीचौकातून स्वतंत्र मिरवणुकीचा ढोल बडविला. त्या आवाजाने शिवसेनेच्या कानठळ्या बसल्या. विसर्जन मिरवणुकीचा नवीन पायंडा यंदाच्या उत्सवातून पडला असून, पुढील वर्षी पश्चिम मतदारसंघाचा स्वतंत्र गणेश मंडळ महासंघ स्थापन करण्याचा निर्णय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला.

संस्थान गणपती येथून पारंपरिक श्री गणेश विसर्जन मिरवणूक निघते. यावर्षीही तेथूनच श्री विसर्जन मिरवणूक निघाली; परंतु पश्चिम मतदारसंघातील गणेश मंडळांनी सिटीचौक ते गुलमंडी मार्गे जि.प.मैदानावर जाण्यास विरोध केला. त्यामागे कारणही तसेच होते, एक ते दीड महिना ढोल-ताशे व इतर कवायतींसाठी मेहनत करायची आणि मंडळांना त्यांचे सादरीकरण करण्यासाठी १० मिनिटेदेखील त्या मार्गावर मिळत नाहीत. मागील काही वर्षांपासून हा सगळा प्रकार घडत असल्यामुळे यंदा पश्चिम मतदारसंघाच्या मंडळांच्या बाजूने भाजपचे किशनचंद तनवाणी, बाळासाहेब गायकवाड, संदीप बारवाल, गजानन बारवाल यांनी ताकद लावली.

दुपारी ३ वा. क्रांतीचौक येथे श्री विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांनी जल्लोषात आगेकूच केली, तेथे पोलिसांनी मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची हमी मिळाल्यानंतर क्रांतीचौकातून जल्लोषात मिरवणूक सुरुवात झाली. सर्व गणेशभक्तांना मंडळांच्या कवायती जवळून पाहता आल्या. पाच ते सहा तासांपर्यंत मंडळाने थकेपर्यंत कवायती सादर करून औरंगाबादमधील श्रीगणेशभक्तांचे पारणे फेडले.

सेनेची झाली कोंडीभाजपने पश्चिम मतदारसंघातील मंडळांच्या मागणीला उचलून धरले. तेथे शिवसेनेची  मात्र गोची झाली. सुरुवातीला आ.संजय शिरसाट क्रांतीचौकात आले, परंतु खा.चंद्रकांत खैरेंनी त्यांना संस्थान गणपती येथे येण्यास सांगितले. तिकडे पक्ष आणि इकडे मतदारसंघ अशा कोंडीत आ.शिरसाट सापडले होते. तनवाणी, गायकवाड, बारवाल यांना खा.खैरे यांनी राजाबाजार येथे बोलावले, मात्र ते काही तिकडे गेले नाहीत. तनवाणी यांनी सांगितले की, क्रांतीचौक ते टिळकपथ मार्गे आलेल्या श्री मंडळांना कवायती सादर करण्याची संधी मागील काही वर्षांत पहिल्यांदाच मिळाली. रस्ता मोठा व रुंद असल्यामुळे सर्व काही सुरळीत पार पडले. पुढील वर्षी परवानगीचा मुद्दा राहणार नाही, तसेच भडकलगेट ते मिल कॉर्नर ते जि.प.मैदान असा नवीन मार्ग पुढच्या वर्षी सुरू केला जाईल. बेगमपुऱ्यातील सर्व मंडळांना त्याचा फायदा होईल.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जनBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद