शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

'दिल्लीच्या गडकरी राया, खासदार जलीलभैया गोंधळाला या...या...'; वाहतूक समस्यांवर ग्रामस्थांचा जागरण-गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 20:04 IST

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव-औट्रमघाटात दरड कोसळल्याने दोन महिन्यांपासून जड वाहतुकीसाठी घाट बंद आहे.

कन्नड : एरव्ही देवादिकांना जागरण गोंधळाच्या माध्यमातून साकडे घालून धावून येण्याचे आवाहन केले जाते. मात्र, कन्नडमधील औट्रम घाटात ‘दिल्लीच्या गडकरी राया, जागरणाला या या, खासदार जलीलभैया गोंधळाला या या’ असे स्वर आळवून विविध मागण्यांसाठी चक्क लोकप्रतिनिधींना येथे येऊन समस्या सोडविण्याचे आवाहन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आज करण्यात आलेल्या या अनोख्या जागरण गोंधळ आंदोलनाची चर्चा तालुक्यात दिवसभर होत होती.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव-औट्रमघाटात दरड कोसळल्याने दोन महिन्यांपासून जड वाहतुकीसाठी घाट बंद आहे. हा रस्ता सुरू करावा, भुयारी मार्ग पूर्ण करावा, तालुक्यातील जनतेकडून टोल वसुली थांबवावी या मागण्यांसाठी घाटात राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानकडून जागरण-गोंधळ-सत्यनारायण असे गांधीगिरी आंदोलन सोमवारी करण्यात आले. आंदोलनात सकाळी सत्यनारायण पूजा करून नंतर वाघे मंडळाचा जागरणाचा कार्यक्रम रंगला. यावेळी केंद्रीय रस्ते व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवतजी कराड, खा. इम्तियाज जलील यांना गाण्याच्या माध्यमातून जागरणाला येण्याचे साकडे घालण्यात आले. प्रास्ताविक राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सीताराम जाधव यांनी केले. डॉ. प्रशांत अवसोरमल, राजानंद सुरडकर यांची यावेळी भाषणे झाली.

या मागण्यांसाठी केले आंदोलनसोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर आजपर्यंत पाच हजार कोटी खर्च होऊन गेला आहे. मात्र, घाटातील ८ कि.मी. भुयारी रस्ता झाला नाही. तेलवाडीच्या पुढे हे काम थांबविण्यात आले. त्यातच अतिवृष्टीमुळे जुन्या घाट रस्त्यावर दरड कोसळून दोन महिन्यांपासून हा रस्ता जड वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे ही वाहतूक शिऊर बंगला, नांदगाव मार्गे वळवावी लागली. ८ कि.मी. रस्त्याअभावी १२० कि.मी.चा फेरा मारावा लागत असून वेळ, इंधन खर्च वाढला आहे. जनतेकडून करण्यात येणारी टोल वसुली थांबवावी, कामात कुचराई करणाऱ्या रस्त्याच्या गुत्तेदारांवर वन अधिनियमान्वये गुन्हे नोंदवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलील