शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांनी घोटला मनपाचा ‘गळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:05 IST

औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार तब्बल ३०० दुकानांना सील ठोकण्यात येणार आहे.

ठळक मुद्देन्यायालयाने आदेश दिले आहेत म्हणून महापालिका कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या भागांत नगर परिषद, महापालिकेने मोठ-मोठे व्यापारी संकुल उभारले आहेत. हे व्यापारी संकुल उभारण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मागील ३० वर्षांमध्ये ज्या व्यापाºयांनी दुकाने घेतली, त्यांनीच महापालिकेला मोठ्या प्रमाणात आर्थिकरीत्या चुना लावल्याचे समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार तब्बल ३०० दुकानांना सील ठोकण्यात येणार आहे. ७ आॅगस्टपासून या कारवाईला सुरुवात होणार आहे.औरंगाबाद खंडपीठाने २००८ मध्ये मनपाच्या गाळ्यांसंदर्भात एक सुमोटी याचिका दाखल करून घेतली होती. याचिका क्रमांक- ६९८९ मध्ये वेळोवेळी सुनावण्या झाल्या. ४ जुलै २०१७ रोजी न्या. एस. सी. धर्माधिकारी, मंगेश पाटील यांच्या पीठाने आदेश दिले की, डिफॉल्टर गाळेधारकांवर त्वरित कारवाई करावी. २१ आॅगस्टपर्यंत कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करावा, असेही न्यायालयाने नमूद केले.न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेच्या मालमत्ता विभागाने जुन्या फायलींचा शोध घेणे, करार शोधून काढणे आदी कामे सुरू केली. ‘लोकमत’ने २५ जुलैच्या अंकात ‘महापालिकेचे ३०० दुकाने बंद होणार’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्तामुळे शहरातील राजकीय मंडळी आणि गाळेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली.वर्षानुवर्षे मनपाकडे भाडे न भरणारे, मनपाच्या दुकानांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून व्यवसाय करणाºयांनी मनपाकडे भाडे भरून घ्या, करार नव्याने करून द्या आदी मागण्या करताना दिसून आले. महापालिकेने यापूर्वी ३०० व्यापाºयांची यादी न्यायालयात सादर केली आहे. या यादीनुसारच आता मनपाला कारवाई करावी लागणार आहे.मालमत्ता अधिकारी वामन कांबळे यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार आणि मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपायुक्त अय्युब खान, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. ३०० गाळेधारकांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे. तीन दिवसांची मुदत देण्यात येईल. त्यानंतर ७ आॅगस्टपासून वेगवेगळे पथक तयार करून कारवाईला प्रारंभ करण्यात येणार आहे.मनपाला नऊ वर्षे डुलकीमहापालिकेचा कारभार म्हणजे आंधळा दळतोय...या प्रमाणे असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा येतो. २००८ मध्ये शहरातील गाळ्यांसंदर्भात खंडपीठात याचिका दाखल झाल्यानंतरही मनपा प्रशासनाने कोणताच बोध घेतला नाही. एकाही गाळेधारकावर कारवाईचा बडगा उगारला नाही. अनेक गाळेधारकांचे करारच संपले आहेत. ज्यांचे करार आहेत, त्यांच्याकडून पैसे भरून घेणे, अनधिकृतपणे मनपाच्या गाळ्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या व्यापाºयांवरही कारवाई केली नाही. आताही न्यायालयाने आदेश दिले आहेत म्हणून महापालिका कारवाई करणार आहे.