शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

गाळेधारकांनी घोटला मनपाचा ‘गळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:05 IST

औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार तब्बल ३०० दुकानांना सील ठोकण्यात येणार आहे.

ठळक मुद्देन्यायालयाने आदेश दिले आहेत म्हणून महापालिका कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या भागांत नगर परिषद, महापालिकेने मोठ-मोठे व्यापारी संकुल उभारले आहेत. हे व्यापारी संकुल उभारण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मागील ३० वर्षांमध्ये ज्या व्यापाºयांनी दुकाने घेतली, त्यांनीच महापालिकेला मोठ्या प्रमाणात आर्थिकरीत्या चुना लावल्याचे समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार तब्बल ३०० दुकानांना सील ठोकण्यात येणार आहे. ७ आॅगस्टपासून या कारवाईला सुरुवात होणार आहे.औरंगाबाद खंडपीठाने २००८ मध्ये मनपाच्या गाळ्यांसंदर्भात एक सुमोटी याचिका दाखल करून घेतली होती. याचिका क्रमांक- ६९८९ मध्ये वेळोवेळी सुनावण्या झाल्या. ४ जुलै २०१७ रोजी न्या. एस. सी. धर्माधिकारी, मंगेश पाटील यांच्या पीठाने आदेश दिले की, डिफॉल्टर गाळेधारकांवर त्वरित कारवाई करावी. २१ आॅगस्टपर्यंत कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करावा, असेही न्यायालयाने नमूद केले.न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेच्या मालमत्ता विभागाने जुन्या फायलींचा शोध घेणे, करार शोधून काढणे आदी कामे सुरू केली. ‘लोकमत’ने २५ जुलैच्या अंकात ‘महापालिकेचे ३०० दुकाने बंद होणार’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्तामुळे शहरातील राजकीय मंडळी आणि गाळेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली.वर्षानुवर्षे मनपाकडे भाडे न भरणारे, मनपाच्या दुकानांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून व्यवसाय करणाºयांनी मनपाकडे भाडे भरून घ्या, करार नव्याने करून द्या आदी मागण्या करताना दिसून आले. महापालिकेने यापूर्वी ३०० व्यापाºयांची यादी न्यायालयात सादर केली आहे. या यादीनुसारच आता मनपाला कारवाई करावी लागणार आहे.मालमत्ता अधिकारी वामन कांबळे यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार आणि मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपायुक्त अय्युब खान, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. ३०० गाळेधारकांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे. तीन दिवसांची मुदत देण्यात येईल. त्यानंतर ७ आॅगस्टपासून वेगवेगळे पथक तयार करून कारवाईला प्रारंभ करण्यात येणार आहे.मनपाला नऊ वर्षे डुलकीमहापालिकेचा कारभार म्हणजे आंधळा दळतोय...या प्रमाणे असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा येतो. २००८ मध्ये शहरातील गाळ्यांसंदर्भात खंडपीठात याचिका दाखल झाल्यानंतरही मनपा प्रशासनाने कोणताच बोध घेतला नाही. एकाही गाळेधारकावर कारवाईचा बडगा उगारला नाही. अनेक गाळेधारकांचे करारच संपले आहेत. ज्यांचे करार आहेत, त्यांच्याकडून पैसे भरून घेणे, अनधिकृतपणे मनपाच्या गाळ्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या व्यापाºयांवरही कारवाई केली नाही. आताही न्यायालयाने आदेश दिले आहेत म्हणून महापालिका कारवाई करणार आहे.