शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
6
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
7
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
8
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
9
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
10
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
11
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
12
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
13
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
15
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
16
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
17
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
18
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
19
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
20
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

G20 Summit: विदेशी पाहुण्यांनी घातली महिलांना जग बदलाची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 13:56 IST

जी-२० चा अंतर्गत भाग असलेल्या वूमन्स- २० हा २०१५ मध्ये स्थापन झालेला जगभरातील २० विकसनशिल देशांचा गट आहे.

छत्रपती संभाजीनगर : जी- २० शिखर परिषदे निमित्त शहरात दाखल झालेल्या १९ देशांतील महिलांनी रविवारी स्थानिक महिलांसोबत संवाद साधत ‘चला जग बदलू या’, अशी साद घातली.

एमजीएमच्या रूख्मिणी सभागृहात जनभागिदारी हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे राेहयोमंत्री संदीपान भुमरे, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल, महिला- २० परिषदेच्या चेअरपर्सन संध्या पुरेचा, समन्वयक धरित्री पटनायक यांच्यासह आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सुमारे एक हजाराहून अधिक महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महागामीच्या कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यानंतर एमजीएमचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. डॉ. संध्या पुरेचा यांनी प्रास्तविक करताना शिखर परिषदेचे महत्त्व सांगितले. काही वर्षांपासून महिलांचा दर्जा उंचावण्यासाठी ही संस्था काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

शिष्टमंडळाच्या नेत्या डॉ. फराहदिभा टेनारिलेम्बा यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधनाता इंडोनिशयाने स्थापन केलेल्या कार्यक्रमामध्ये भारत सातत्य राखेल, अशी आशा व्यक्त केली. डॉ. टेनरिलेम्बा यांनी महिला-२० परिषदेने इंडोनेशियातील नऊ लाख कोटींहून अधिक महिलांवर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. भारत जगातील विकसनशिल देशांचे नेतृत्व राखेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

रशियाच्या प्रतिनिधी, एलेना म्यकोटनिकोवा यांनी हवामान सक्रियतेचे महत्त्व आणि हवामान बदलाचा सामना करण्याची गरज व्यक्त केली. दक्षिण कोरियाच्या एंजेला जू-ह्यून कांग या भारतातील विविध धर्म आणि एकोपा याबद्दल प्रभावित झाल्या. त्यांनी महिलांना समाजाच्या उन्नतीसाठी प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे नमूद केले. जपानच्या प्रतिनिधी सातोको कोनो यांनी महिलांसाठी उद्योजकतेचे महत्त्व आणि आर्थिक स्वातंत्र्यावर भर दिला.

प्रश्नोत्तराच्या फेरीत जाणून घेतल्या समस्याप्रश्नोत्तराच्या फेरीतून आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने स्थानिक महिलांचे प्रश्न जाणून घेतले. प्राचार्य रेखा शेळके यांनी औरंगाबादेतील महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न उपस्थित केला, तर डॉ. कानन येळीकर यांनी महिलांतील रक्तक्षयांकडे लक्ष वेधले. अन्य एका महिलेने बालविवाह, महिला अत्याचारांच्या घटनांकडे प्रकाश टाकला.

काय आहे डब्ल्यू- २०जी-२० चा अंतर्गत भाग असलेल्या वूमन्स- २० हा २०१५ मध्ये स्थापन झालेला जगभरातील २० विकसनशिल देशांचा गट आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येचा ५० टक्के भाग असलेल्या महिलांच्या समस्या, त्यांचे विविध क्षेत्रातील योगदान, त्यांची भरभराट आणि त्यांच्या विकासातील अडथळे दूर करण्यासाठी ही संस्था काम करते. यंदा भारताकडे जी- २० चे अध्यक्षपद आहे. यानिमित्त जगातील १९ देशांतील महिला प्रतिनिधी शहरात दाखल झाले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार