शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

महानगरपालिकेच्या तिजोरीत पैसे ‘असून अडचण, नसून खोळंबा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 16:57 IST

मनपा खरोखरच सुधारणार का?

ठळक मुद्देमहापालिका म्हणजेच अपयश असे समीकरण मागील काही वर्षांमध्ये बनले आहे. १०० कोटींच्या रस्त्यांसाठी निधी पडून आहे, काम होत नाही.

औरंगाबाद : महापालिका म्हणजेच अपयश असे समीकरण मागील काही वर्षांमध्ये बनले आहे. कोणतेही काम हातात घेतले तर त्याला यश कमी अपयश जास्त मिळते. शहर विकासाचा कणा समजली जाणारी महापालिका सुधारणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. १०० कोटींच्या रस्त्यांसाठी निधी पडून आहे, काम होत नाही. महापालिकेच्या तिजोरीत निधी नाही, म्हणून विकास कामे थांबली आहेत. शहर विकासाला गती देण्याचा कोणताच स्तुत्य उपक्रम महापालिकेच्या हाती नाही.

बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त रविवारी रात्री शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते, मनपाचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर होते. सर्वांच्या तोंडी एकच चर्चा होती, ती म्हणजे मनपा होय. खा. इम्तियाज जलील यांनी महापालिका सुधारणार का? असा खोचक प्रश्न करून सत्ताधाऱ्यांवर जोरदार बाऊंसरच टाकला. महापौर नंदकुमार घोडेले, राज्यमंत्री अतुल सावे, माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी या बाऊंसरचा बचाव करण्याचा अतोनात प्रयत्न केला. शेवटी माजी महापौर डॉ. भागवत कराड यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा अहेर दिला.

२२ वर्षांपासून शहर विकास आराखडा रखडला आहे. महापलिकेतील अधिकाऱ्यांच्या दर तीन वर्षांनंतर एका महापालिकेतून दुसऱ्या महापालिकेत बदल्या करायलाच हव्यात, असा निर्णय राज्य शासनाने घेतल्यावरच महापालिकाच काय राज्यातील सर्व महापालिका सुधारतील, असा दावाही त्यांनी केला. नगरविकास विभागाचे राज्यमंत्री योगेश सागर यांनीही मनपा अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर वेगळ्या शब्दांत भाष्य केले. बांधकाम व्यावसायिक एखाद्या प्रकल्पासाठी जेवढा विकासनिधी मनपाला भरतात, त्यापेक्षा जास्त निधी ‘लायझनिंग’वर खर्च करतात. भविष्यात ‘लायझनिंग’ हा प्रकार शून्यावर आणण्याचा दावाही त्यांनी केला.

महापालिकेचे अपयश कुठे-कुठे- १०० कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने रस्त्यांसाठी दिले. जानेवारी महिन्यात कामांचा शुभारंभ झाला. आठ महिन्यांत ३० पैकी एकही रस्ता महापालिकेला पूर्ण करता आला नाही. ही कामे प्रलंबित असल्याने शासन आणखी २०० कोटी रुपये देण्यास तयार नाही. - महापालिकेचे दरमहा उत्पन्न ३१ कोटी आणि खर्च ४५ कोटींवर गेला आहे. जमा आणि खर्चावर वेसण घालण्याचे काम शासनाचे प्रतिनिधी म्हणून आयुक्तांनी करायला हवे. - मागील १५ महिन्यांत आयुक्तांना जमा आणि खर्च याचा मेळच बसविता आला नाही.३५० कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजना राबविण्यात आली. या योजनेला किती टक्के यश आले याचा दावाही आजपर्यंत महापालिका करू शकली नाही. आजही शहरातील सर्व २३ नाल्यांमधून दूषित पाणी वाहत आहे, हे विशेष.- शहराच्या आसपास नवीन २०० पेक्षा अधिक वसाहती निर्माण झाल्या आहेत. या वसाहतींना दहा वर्षांपासून मनपा टँकरने पाणी देते. या वसाहतींमध्ये मूलभूत सोयीसुविधाही नाहीत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादfundsनिधीAurangabadऔरंगाबाद