शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

औरंगाबाद मनपाच्या तिजोरीवर पदाधिकाऱ्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 14:08 IST

ज्येष्ठता यादी डावलून मुख्य लेखाधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये वाटून टाकल्याने शुक्रवारी संतप्त नगरसेवकांनी लेखा विभागात  ठिय्या आंदोलन केले.

औरंगाबाद : महापालिका दिवाळखोरीत निघाली आहे. १७० कोटींची बिले मागील ७ महिन्यांपासून थकीत आहेत. कंत्राटदार बिलांचे पैसे मिळविण्यासाठी सैरावैरा धावपळ करीत आहेत. मनपा आयुक्तांच्या अनुपस्थितीत मुख्य लेखाधिकारी सु. ग. केंद्रे यांनी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कोट्यवधी रुपयांची बिले वाटप केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्येष्ठता यादी डावलून मुख्य लेखाधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये वाटून टाकल्याने शुक्रवारी संतप्त नगरसेवकांनी लेखा विभागात  ठिय्या आंदोलन केले.

मागील काही दिवसांपासून लेखा विभागात पाच कोटींहून अधिक रक्कम होती. बुधवारी आणि गुरुवारी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कोट्यवधी रुपयांची बिले अदा केली. शुक्रवारी काही नगरसेवकांनी लेखा विभागाकडे चौकशी केली असता तिजोरीत पैसेच नसल्याचे कळाले. त्यामुळे संतप्त नगरसेवकांचा पार अधिक चढला. त्यांनी मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या दालनासमोर घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले. यामध्ये एका पदाधिकाऱ्याचा समावेश होता. या आंदोलक पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून काही बिले काढण्यात आलेली आहेत हे विशेष.

महापौरांना धमकीशुक्रवारी दुपारी ४ वाजता महापौर नंदकुमार घोडेले आपल्या दालनात बसून दैनंदिन कामकाज करीत असताना त्यांच्या मोबाईलवर वक्ते नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने ‘महापालिकेत पैसे नसताना कामे कशाला दिली, कंत्राटदार आत्महत्या करीत आहेत. याला जबाबदार तुम्ही आहात,’ अशा शब्दांत धमकी दिली. महापौरांनीही त्याचा आपल्या पद्धतीने समाचार घेतला. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचे आदेश त्यांनी दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबाद