शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जायकवाडी धरणात चार तरुण बुडाले; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:53 IST

जायकवाडी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या औरंगाबाद येथील चार तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला असून, तीन जणांना वाचविण्यात यश आले. रहीम खान अब्बास खान (रा. औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या औरंगाबाद येथील चार तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला असून, तीन जणांना वाचविण्यात यश आले. रहीम खान अब्बास खान (रा. औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद रेल्वेस्टेशनजवळील सादात मोहल्ला, राहुलनगर परिसरातील शेख उमर, शेख गणी शेख अहेमद, रहीम खान अब्बास खान व अन्य एक असे चार तरुण रिक्षाने पैठण येथे पर्यटनासाठी आले होते. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पर्यटक पॉइंट परिसरात ते धरणात पोहण्यासाठी उतरले; परंतु त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात उतरताच बुडायला लागले. हे दृश्य पाहताच धरणावरील पर्यटकांनी आरडाओरड केली. स्थानिक पोहणाऱ्या नागरिकांनी ताबडतोब धरणात उड्या मारून तीन तरुणांना पाण्याबाहेर काढल्याने ते बचावले. रहीमखानला पाण्याबाहेर काढण्यास उशीर झाल्याने तो मरण पावला. मृत तरुणाला घेऊन त्याचे नातेवाईक तातडीने औरंगाबादला रवाना झाले आहेत. पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, फौजदार साहेबराव गिरासे, नामदेव कातडे आदींनी तातडीने घटनास्थळ गाठले व मदतकार्य केले.

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात