शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

शेतीच्या वादातून हाणामारी प्रकरणात चार जणांना सक्त मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 20:36 IST

२०१२ मध्ये खातखेड शिवारात शेतीच्या वादातून हाणामारी झाली होती.

पिशोर (औरंगाबाद ) :  सात वर्षांपूर्वी शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीच्या गुन्ह्यात खातखेडा ता. कन्नड येथील चार जणांना कन्नड न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.आर.ठाकूर यांनी सहा महिने सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड आणि कलम ५०६ मध्ये पाचशे रुपये दंड तसेच दंड न भरल्यास पंधरा दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

याबाबत सपोनि जगदीश पवार यांनी सांगितले की, २०१२ मध्ये खातखेड शिवारात फिर्यादी शामराव भीमराव पवार आणि भीमराव विनायक पवार, अनिल भीमराव पवार, अर्जुन भीमराव पवार आणि उद्धव भीमराव पवार  आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक यांच्यात शेतीच्या वादातून हाणामारी झाली होती. या मध्ये पिशोर पोलीस ठाण्यात कलम १४३,१४७,१४८,१४९, ५०४, ५०६ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास खांडेकर यांनी तपास करून कन्नड न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी.आर. ठाकूर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी भीमराव पवार, उद्धव पवार, अर्जुन पवार तसेच अनिल पवार यांना कलम ३२३ मध्ये सहा महिने सक्त मजुरी तसेच १००० रुपये दंड आणि कलम ५०६ मध्ये ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली. शासकीय अभियोक्ता म्हणून आर.पी. कुर्लेकर यांनी काम पाहिले तर जमादार आर.एस.आमटे व पो.कॉ. सुशील सुरवाडे यांनी कोर्ट पैरवी केली.

टॅग्स :Courtन्यायालयjailतुरुंगPoliceपोलिस