शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

निवड होऊन चार महिने उलटले; तलाठी झालेले युवक नियुक्तीपत्राच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 18:39 IST

राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये  निवड झालेल्या उमेदवारांना  नियुक्ती देत सेवेत सामावून घेतले असल्याची माहिती  निवड झालेल्या युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी महसूल सचिवांकडून मार्गदर्शन मागविलेऔरंगाबाद जिल्ह्यातील यातील ५६ पदांची भरती होती.

औरंगाबाद : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तलाठी पदाच्या १,८०० जागांसाठी जुलै २०१९ मध्ये  परीक्षा घेण्यात आली होती. यात औरंगाबाद  जिल्ह्यात ५६ पदांसाठी परीक्षा झाली. यातील गुणवत्ता यादीतील युवकांच्या कागदपत्रांची पडताळणी  ९ ते ११ डिसेंबर २०१९ दरम्यान झाली. यानंतर अंतिम निवड यादी १९ मार्च २०२० रोजी जाहीर करण्यात आली. मात्र, अद्यापही यातील  निवड झालेल्या युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये  निवड झालेल्या उमेदवारांना  नियुक्ती देत सेवेत सामावून घेतले असल्याची माहिती  निवड झालेल्या युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

राज्यात मागील पाच वर्षांपासून नोकरभरतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोकरभरतीवरील बंदी हटविण्यात आली होती. यानुसार  मार्च २०१९ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांत तलाठी पदाच्या १,८०० जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील यातील ५६ पदांची भरती होती. यासाठी हजारो युवकांनी अर्ज दाखल केले होते. जिल्ह्यात २ ते २६ जुलैदरम्यान परीक्षा घेण्यात आली. यानंतर २५ जिल्ह्यांतील निवड प्रक्रिया मार्च महिन्याच्या पूर्वीच पूर्ण झाली आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात मागे आहे.  निवड झालेल्या युवकांना नियुक्ती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप उमेदवारांनी केला आहे. राज्य शासनाने ४ मे २०२० रोजी शासन निर्णय काढून कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर वित्तीय उपाययोजना करण्यासाठी नवीन पदभरती करण्यावर बंदी घातली. मात्र, जिल्हा प्रशासन त्या शासन निर्णयाचा आधार घेऊन नियुक्त्या देत नाही, असा आरोपही युवकांनी केला आहे. मात्र, नाशिक जिल्हा प्रशासनाने या तलाठी भरतीमधील नियुक्त्या २३ जून रोजी दिल्या आहेत. 

पुणे जिल्हा प्रशासनानेही १ जून रोजी नियुक्ती दिल्याकडे निवड झालेल्या युवकांनी लक्ष वेधले आहे. याविषयी युवकांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही नवीन भरतीला स्थगिती दिलेली आहे. जुन्या नियुक्त्यांना बंदी नसल्याचे स्पष्ट केले. तरीही औरंगाबाद जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे युवकांनी सांगितले.

महसूल सचिवांचे मार्गदर्शन मागविलेऔरंगाबाद जिल्हा प्रशासनाने तलाठी भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिवांकडे १८ मे रोजी मार्गदर्शन मागविले आहे. यात ४ मे रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाचा उल्लेख केलेला आहे. यात उमेदवारांनी नियुक्ती देण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशी विनंती जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. यासही महिना होत आला आहे. याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे निवड झालेले विद्यार्थी हवालदिल आहेत. 

टॅग्स :Employeeकर्मचारीAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद